शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

कौंडण्यपूर नदीवरील पूल जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 22:54 IST

अमरावती-वर्धा जिल्ह्यांना जोडणारा श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील वर्धा नदीवरील पूल क्षतिग्रस्त झाला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष : रस्त्यावरील लोखंडी सळाखी उघड्या

रितेश नारळे ।लोकमत न्यूज नेटवर्ककुºहा : अमरावती-वर्धा जिल्ह्यांना जोडणारा श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील वर्धा नदीवरील पूल क्षतिग्रस्त झाला आहे. पुलावरील असलेले सिमेंटच्या रस्त्यातील लोखंडी सळाखी उघड्या पडल्या असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, तर संरक्षक लोखंडी कठडे चोरून नेले असून येथे अपघात झाल्यास ते सरळ मृत्यूला निमंत्रण देणारेच ठरणार आहे.वर्धा नदीवर असलेले वरूड बगाजी (निम्नवर्धा) धरणाची थोप कोंडण्यपूरपर्यंत आहे. यामुळे नदीला वर्षभर भरपूर पाणी असते. पुलावरून अधिक जड वाहने गेल्यामुळे तो खळखिळा झाल्याचे जाणवते. अनेकदा जड वाहनांच्या भारामुळे पूल हलल्याने येथे वाहनचालकांचे नियंत्रण सुटले आहे. पुलाची अवस्था दयनीय झाली असतानादेखील याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसते. यासंदर्भात अनेकदा मागणी करूनही या पुलाची दुरुस्ती करण्यात आली नाही. कोणतेही अधिकारी पुलाच्या पाहणीसाठी ईकडे फिरकतही नाहीत. या पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे कधीही अपघात होण्याची दाट शक्यता नाकारतात येत नाही. उघड्या सळाखी दुचाकीच्या चाकात घुसल्यास व संरक्षक कठडे आधीच तुटले असल्यामुळे चालक थेट नदीत पडतील, अशी अवस्था आहे.भाविकांची वर्दळ अन पुलाची चर्चादेवी रुक्मिणीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाºया कौंडण्यपूर येथे वर्धा व नागपूर जिल्ह्यातून येणारे भाविक वर्धा नदीवरील हा पूल ओलांडूनच येतात. यामुळे वर्धा जिल्ह्यापर्यंत सुखकर असणारा प्रवास केवळ या पुलामुळे वाईट अनुभव देऊन जातो. येथे येणारे भाविक या पुलाची दुरुस्ती व्हावी, अशी चर्चा स्थानिकांशी करताना दिसतात. यामुळे देव दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या मनात प्रशासनाची खराब प्रतिमा तयार होत आहे.अमरावती येथील बियाणी चौक ते कौंडण्यपूरपर्यंत या मार्गासाठी शासनाने १३० कोटींचा निधी मंजूर केला. दिवाळीनंतर काम सुरु होईल. कठठ्यांचे काम त्यात आहे. पूलदुरुस्तीसाठी आता निधी मंजूर होत नाही. तरीही आम्ही पुलावरील खड्डे बुजविण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू.- दिनकर माहुरे, उपविभागीय अभियंता, सां.बा.वि.