शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
2
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करांना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
3
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
4
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
5
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि ज्यू सैन्यावरही परिणाम
6
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
7
कोजागरी पौर्णिमा २०२५: कोजागरी ते लक्ष्मीपूजन, आर्थिक वृद्धीसाठी सलग १५ दिवस म्हणा 'हे' लक्ष्मी मंत्र!
8
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
9
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
10
Tarot Card: येत्या आठवड्यात प्रवास योग आणि आप्तेष्टांच्या भेटी सुखावतील; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
11
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
12
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
13
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
14
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
15
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
16
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
17
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
18
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
19
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
20
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव

-अन् वधू निघाली अल्पवयीन, लग्न पुढे ढकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:01 IST

तळेगाव मोहना येथील श्री संत गुणवंतबाबा विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी, उपविभागीय अधिकाऱ्यांना २४ जूनला पाठविलेल्या पत्रात त्या वधूची जन्मतारीख ७ मे २००३ दाखविली आहे. दाखल्यावरून वधूचे वय केवळ १७ वर्षे ठरत असल्यामुळे प्रशासनाने पुढाकार घेत चालवलेली लग्नाची तयारी आता थांबविली आहे. दुसरीकडे वधूचे वय केवळ १७ वर्षे असल्यामुळे क्वारंटाईन सेंटरला अडकलेल्या नवरदेवाला व त्याच्या नातेवाइकांना लग्न थांबविण्याचा, लग्न पुढे ढकलण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची सतर्कता : क्वारंटाईन सेंटरमध्ये होणार होते लग्न, नवरदेवाला करावी लागणार पुन्हा प्रतीक्षा

अनिल कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शहरातील कल्याण मंडपम् या क्वारंटाईन सेंटरला अडकलेल्या नवरदेवाचे २५ जूनचे लग्न आता पुढे ढकलण्यात आले आहे. नियोजित वधूचे वय १७ वर्षे असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे होऊ घातलेला हा बालविवाह टळला आहे.प्रशासनाकडून २५ जूनला हे लग्न लावले जाणार होते. या लग्नाची तयारी सुरू करण्यात आली होती. अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार मुलाची, तर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी मुलीची बाजू सांभाळण्याचे निश्चित केले होते. भडजीसह नवरदेव नवरीचे हार आणि बुके नगरपालिकेचे करनिरीक्षक रोहन राठोड आणणार होते. नवरदेवाचे कपडे, खुर्च्या, मंडप, नाष्टा, चहा, साऊंड सिस्टीमही सांगण्यात आली होती.दरम्यान, मुलीचे नेमके वय जाणून घेण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला. वधुपक्षाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे तीही जाणून घेत, वधूच्या वयाविषयी विचारपूस करण्यात आली. यात वेगवेगळी माहिती प्रशासनाला मिळाली. पण, यावर विश्वास न ठेवता प्रशासनाने त्या वधूचा शाळेकडून दाखला मिळविला. तळेगाव मोहना येथील श्री संत गुणवंतबाबा विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी, उपविभागीय अधिकाऱ्यांना २४ जूनला पाठविलेल्या पत्रात त्या वधूची जन्मतारीख ७ मे २००३ दाखविली आहे. दाखल्यावरून वधूचे वय केवळ १७ वर्षे ठरत असल्यामुळे प्रशासनाने पुढाकार घेत चालवलेली लग्नाची तयारी आता थांबविली आहे. दुसरीकडे वधूचे वय केवळ १७ वर्षे असल्यामुळे क्वारंटाईन सेंटरला अडकलेल्या नवरदेवाला व त्याच्या नातेवाइकांना लग्न थांबविण्याचा, लग्न पुढे ढकलण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.अचलपूरच्या ठिकरीपुऱ्यातील मूळ रहिवासी असलेला हा २७ वर्षीय नवरदेव मुलगा लग्नाच्या १५ दिवसांपूर्वी दिल्लीवरून १० जूनला शहरात दाखल झाला होता. कोरोनासंबंधी प्रशासकीय नियमानुसार त्याला कल्याण मंडपम्ला क्वारंटाईन करण्यात आले. २५ जूनला त्याला सुटी दिली जाणार आहे आणि त्याच दिवशी सकाळी ११ वाजता त्याचे लग्न होते. म्हणून त्याच्या बाजूने प्रशासनाने उभे ठाकले खरे, पण नवरी अल्पवयीन निघाल्यामुळे प्रशासनाने हा विवाहच थांबविला आहे.प्रशासनाच्या पुढाकारातून क्वारंटाईन असलेल्या नवरदेवाचे होणारे लग्न थांबविण्यात आले आहे. वधूचे वय १७ वर्षे निघाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह टळला आहे.- रोहन राठोड, करनिरीक्षकनगर परिषद, अचलपूर

टॅग्स :marriageलग्न