शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

-अन् वधू निघाली अल्पवयीन, लग्न पुढे ढकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:01 IST

तळेगाव मोहना येथील श्री संत गुणवंतबाबा विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी, उपविभागीय अधिकाऱ्यांना २४ जूनला पाठविलेल्या पत्रात त्या वधूची जन्मतारीख ७ मे २००३ दाखविली आहे. दाखल्यावरून वधूचे वय केवळ १७ वर्षे ठरत असल्यामुळे प्रशासनाने पुढाकार घेत चालवलेली लग्नाची तयारी आता थांबविली आहे. दुसरीकडे वधूचे वय केवळ १७ वर्षे असल्यामुळे क्वारंटाईन सेंटरला अडकलेल्या नवरदेवाला व त्याच्या नातेवाइकांना लग्न थांबविण्याचा, लग्न पुढे ढकलण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची सतर्कता : क्वारंटाईन सेंटरमध्ये होणार होते लग्न, नवरदेवाला करावी लागणार पुन्हा प्रतीक्षा

अनिल कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शहरातील कल्याण मंडपम् या क्वारंटाईन सेंटरला अडकलेल्या नवरदेवाचे २५ जूनचे लग्न आता पुढे ढकलण्यात आले आहे. नियोजित वधूचे वय १७ वर्षे असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे होऊ घातलेला हा बालविवाह टळला आहे.प्रशासनाकडून २५ जूनला हे लग्न लावले जाणार होते. या लग्नाची तयारी सुरू करण्यात आली होती. अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार मुलाची, तर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी मुलीची बाजू सांभाळण्याचे निश्चित केले होते. भडजीसह नवरदेव नवरीचे हार आणि बुके नगरपालिकेचे करनिरीक्षक रोहन राठोड आणणार होते. नवरदेवाचे कपडे, खुर्च्या, मंडप, नाष्टा, चहा, साऊंड सिस्टीमही सांगण्यात आली होती.दरम्यान, मुलीचे नेमके वय जाणून घेण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला. वधुपक्षाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे तीही जाणून घेत, वधूच्या वयाविषयी विचारपूस करण्यात आली. यात वेगवेगळी माहिती प्रशासनाला मिळाली. पण, यावर विश्वास न ठेवता प्रशासनाने त्या वधूचा शाळेकडून दाखला मिळविला. तळेगाव मोहना येथील श्री संत गुणवंतबाबा विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी, उपविभागीय अधिकाऱ्यांना २४ जूनला पाठविलेल्या पत्रात त्या वधूची जन्मतारीख ७ मे २००३ दाखविली आहे. दाखल्यावरून वधूचे वय केवळ १७ वर्षे ठरत असल्यामुळे प्रशासनाने पुढाकार घेत चालवलेली लग्नाची तयारी आता थांबविली आहे. दुसरीकडे वधूचे वय केवळ १७ वर्षे असल्यामुळे क्वारंटाईन सेंटरला अडकलेल्या नवरदेवाला व त्याच्या नातेवाइकांना लग्न थांबविण्याचा, लग्न पुढे ढकलण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.अचलपूरच्या ठिकरीपुऱ्यातील मूळ रहिवासी असलेला हा २७ वर्षीय नवरदेव मुलगा लग्नाच्या १५ दिवसांपूर्वी दिल्लीवरून १० जूनला शहरात दाखल झाला होता. कोरोनासंबंधी प्रशासकीय नियमानुसार त्याला कल्याण मंडपम्ला क्वारंटाईन करण्यात आले. २५ जूनला त्याला सुटी दिली जाणार आहे आणि त्याच दिवशी सकाळी ११ वाजता त्याचे लग्न होते. म्हणून त्याच्या बाजूने प्रशासनाने उभे ठाकले खरे, पण नवरी अल्पवयीन निघाल्यामुळे प्रशासनाने हा विवाहच थांबविला आहे.प्रशासनाच्या पुढाकारातून क्वारंटाईन असलेल्या नवरदेवाचे होणारे लग्न थांबविण्यात आले आहे. वधूचे वय १७ वर्षे निघाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह टळला आहे.- रोहन राठोड, करनिरीक्षकनगर परिषद, अचलपूर

टॅग्स :marriageलग्न