शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

आचारसंहितेमुळे कामांना ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:28 IST

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची आदर्श आचारसंहिता २० एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे. या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर काही विभागांतून होणाºया कामांना ब्रेक लागला आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : लोकप्रतिनिधींकडून अधिकाऱ्यांना विचारणा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची आदर्श आचारसंहिता २० एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे. या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर काही विभागांतून होणाºया कामांना ब्रेक लागला आहे. ग्रामीण भागातून विविध कामे घेऊन लोकप्रतिनिधी शासकीय कार्यालयात येत आहेत. मात्र, अधिकारी आचारसंहितेची अडचण पुढे करीत आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अमरावती मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता सध्या सुरू आहे. २१ मे रोजी मतदान, तर २४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदारांवर प्रभाव पडेल व सत्ताधाºयांच्या पथ्यावर पडेल अशा कामांना २४ मेपर्यंत ब्रेक लागला आहे. आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सभापती, सरपंच यांच्यासह इतरांनी मंजूर करून आणलेल्या योजना, विकास योजना, जिल्हा परिषद व मंत्रालयातील कामेही थांबली आहेत. सार्वत्रिक निवडणुका जवळ येत असल्याने विकासकामांसाठी लोकप्रतिनिधी जोरदार प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीत सुरू असलेली कामे तूर्तास थांबवावी लागली आहेत.नागरिकांच्या कार्यालयांमध्ये वाढल्या चकराआचारसंहिता सुरू असली तरी महत्त्वाची कामे करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त इतर कामे करण्यात मात्र नियमांची अडचण आहे. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होईल अशी कामे करू नयेत, अशा सूचना जिल्हा परिषदेने विभागप्रमुखांना दिल्या आहेत. ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी, नागरिक जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती खेटे घालताहेत. अधिकारी आचारसंहितेक डे बोट दाखवीत आहेत.