शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

ब्रम्हपुरीची ई-'वन वाघीण' मेळघाटात, आता राज्यातील वाघांची संख्या वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 18:16 IST

मेळघाटची दीडशे वाघांची क्षमता

अनिल कडू

परतवाडा (अमरावती) : मेळघाटच्या जंगलाची दीडशे वाघांचा सांभाळ करण्याची क्षमता आहे. आजमित्तीला तेथे 50 ते 52 वाघ आहेत. मेळघाटातील वाघांची संख्या वाढावी यासाठी ब्रम्हपुरीच्या ई-वन वाघिणीला मेळघाटात पाठविण्यात आले आहे. दोन वर्ष वयाची ही वाघीण जंगल वास्तव्यात सक्षम आहे. तिचे वय बघता ती मेळघाटात अनेक शावकांना जन्मास घालू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. यातून मेळघाटात वाघांची संख्या वाढणार आहे.

चंद्रपूर-ताडोबात वाघांची संख्या वाढत आहे. वाघांची संख्या वाढल्यामुळे ते ब्रम्हपुरीच्या जंगलासह लगतच्या क्षेत्रातील गाव आणि शेत शिवाराकडे फिरकत आहेत. यात मानव वन्यजीव संघर्ष उद्भवत आहे. हा संघर्ष कमी करण्यासाठी, ज्या व्याघ्र क्षेत्रात वाघांची संख्या कमी आहे. त्या क्षेत्रात त्यांची संख्या वाढावी म्हणून या वाढत्या, जास्तीच्या वाघांना स्थलांतरित करण्याचे मंथन अभ्यासकांमध्ये सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून प्रथमच ब्रम्हपुरीच्या ई-वन वाघिणीला मेळघाटात पाठविण्यात आले आहे. ब्रम्हपुरीहून ही वाघीण व्हाया गोरेवाडा-नागपूरमार्गे मेळघाटात पोहचली. मेळघाटात दाखल होण्यापूर्वी ती गोरेवाडा प्राणी संग्रहालयात मुक्कामाला होती. 

देहरादुनहून नजरकॉलर आयडीसह मेळघाटात दाखल या ई-वन वाघिणीच्या प्रत्येक हालचालीवर, वन्यजीव संस्था देहरादून येथील डॉ. बीलाल हबीब यांच्या मार्गदर्शनात विशेष लक्ष दिले जाणार आहे. याकरिता देहरादूनहून खास तज्ज्ञ मेळघाटात नियुक्त केले जातील. हे तज्ज्ञ सॅटेलाईटच्या मदतीने त्या कॉलर आयडीवरून तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवणार आहेत. नोंदी घेणार आहेत. यात गुगामल वन्यजीव विभागाचीही जबाबदारी वाढली आहे. कॉलर आयडी असलेली आणि आपले लोकेशन देणारी ही मेळघाटातील पहिली वाघीण ठरली आहे.

राज्यातील वाघांची संख्याराज्यात वाघांची वस्तीस्थाने वाढली आहेत. यात वाघांची संख्याही वाढली आहे. 2006 मध्ये राज्यात 103 वाघ होते. 2010 मध्ये ती 169 वर पोहचली. 2014 मध्ये राज्यात 190 वाघ नोंदल्या गेले. 2018 मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेची आकडेवारी जाहीर व्हायची असली तरी 2014 नंतर राज्यात वाघांच्या संख्येची स्थिती सुधारली आहे. सन 2014 च्या आकडेवारीत ताडोबातील सर्वाधिक म्हणजे 100 ते 110 वाघ, मेळघाटातील 45 ते 50 वाघ आणि पेंचमधील 25 ते 30 वाघांचा समावेश आहे.

देशातील वाघांची संख्यादेशात 2006 मध्ये 1 हजार 411 वाघ नोंदल्या गेलेत. 2010 मध्ये 1 हजार 706 तर 2014 मध्ये 2 हजार 226 वाघ आढळून आले आहेत. देशपातळीवरही वाघांची संख्या वाढत आहे. वाघ ही भारताची ओळख असून जगातील 3 हजार 890 वाघांपैकी 57 टक्के वाघ भारतात आहेत.मेळघाटच्या जंगलाची दीडशे वाघ सांभाळण्याची क्षमता आहे. मावन व वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता, जेथे वाघांची संख्या कमी आहे तेथे वाघांची संख्या वाढविण्याकरिता, ज्या भागात वाघ अधिक आहे, तेथील वाघांचे स्थलांतर करण गरजेचे आहे. - जयंत वडतकर, मानद वन्यजीव रक्षक, अमरावती 

टॅग्स :Tigerवाघchandrapur-pcचंद्रपूरTadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प