शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक बंदीविरोधात मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 22:40 IST

सरसकट प्लास्टिक बंदीमुळे कचरा व्यवस्थापनाची समस्या सुटणार नाहीत, उलट वाढणार आहेत. मुळात ही समस्या प्लास्टिकची नसून, कचरा वर्गीकरण आणि हाताळण्याची आहे.

ठळक मुद्देखासदार, आमदारांची बैठक : पुनर्विचारासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सरसकट प्लास्टिक बंदीमुळे कचरा व्यवस्थापनाची समस्या सुटणार नाहीत, उलट वाढणार आहेत. मुळात ही समस्या प्लास्टिकची नसून, कचरा वर्गीकरण आणि हाताळण्याची आहे. त्यामुळे प्रस्तावित प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला विरोध करीत असल्याचे मत शुक्रवारी आयोजित बैठकीत अमरावती प्लास्टिक असोसिएशनने मांडले. खा. आनंदराव अडसूळ व आ. सुनील देशमुख यांच्या उपस्थितीत सर्कीट हाऊसला ही बैठक पार पडली.प्लास्टिक बंदीमुळे जनसामान्याचे जीवन आणि व्यापार कोलमडतील. प्लास्टिक मानवी जीवनासाठी अत्यावश्यक गरजेचे साधन बनले आहे. प्लास्टिक पॅकिंगची व्याप्ती खूप मोठी झाली असून, दैनदिन जीवनात प्लास्टिक पॅकिंगशिवाय पर्याय उरला नाही. प्लास्टिक बंदीमुळे किराणा माल, मिठाई दुकान, हॉटेल, धनधान्यांचे नुकसान, फूड प्रोसेसिंग इंडस्टिज आणि साठा, शॉपींग मॉल, महिला गृहउद्योग, गारमेंट इंडस्ट्रिज, साडी, ड्रेड मटेरियल, सैनिक भोजनाचे पॅकिंग, शालेय पोषण आहार, सैन्याच्या दारूगोळा, फ्लेक्स बोर्ड, स्टेशनरी यावर मोठा परिणाम पडणार आहे. यावर पर्याय म्हणून कागदी व कापडाचा वापर करणे हे पर्यावरणासाठी अधिक धोकादायक ठरणार आहे. कागदाचा उपयोग केल्यास वृक्षतोड अधिक होईल तसेच ग्लोबल वॉर्मिंग मोठी समस्या येईल. प्लास्टिक बंदीमुळे बेरोजगारी वाढेल आणि करविषयक आर्थिक नुकसानाचा होईल आदी मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी खा. अडसूळ व आ. देशमुख यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करीत यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. प्लास्टिक असोसिएशनचे विनोद सावरा, महेंद्र दलवानी, जयराम चव्हाण, पवन कुकरेजा, संदीप इंगोले, दामोदर बजाज, महेश सारडा, मनोज कोठारी, दीपक पाटमासे, इंदर सेपानी, प्रिंटिंग असोसिएशनचे रणजित मेश्राम, राजू शेरेकर, कमलेश घायर, दीपक पाटे, संजय बारड, गणेश, तडोकार, दिलीप वंजारे, सचिन सोनोने, योगेश जवंजाळ आदी उपस्थित होते.दुग्धव्यवसायावर परिणामप्लास्टिक बंदीमुळे शहरातील बहुतांश व्यवसाय २२ मार्चपासून बंद ठेवण्यात आले आहेत. दूध विक्रेता, डेअरीवाले प्लास्टिक बंदीच्या विरोधात एकत्र येऊन पंधरा दिवसानंतर डेअरी बंद ठेवण्याच्या विचारात आहे. दुधासारख्या नाशवंत पदार्थ विक्रीसाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर अधिक केला जातो. त्यामुळे बंदीचा प्रभाव दुग्धव्यवसायावर होणार आहे.