शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

बच्चू कडूंच्या बैठकीवर अभियंत्यांचा बहिष्कार

By admin | Updated: July 22, 2015 00:35 IST

आ. बच्चू कडू यांनी रविवारी परतवाडा येथील वाघामाता संस्थानमध्ये आयोजित विद्युत ग्राहक तक्रार निवारण मेळाव्यात अभियंत्यांना अर्वाच्य शिवीगाळ केली.

अर्वाच्च शिवीगाळ : तक्रार निवारण मेळाव्यातील प्रकारअचलपूर : आ. बच्चू कडू यांनी रविवारी परतवाडा येथील वाघामाता संस्थानमध्ये आयोजित विद्युत ग्राहक तक्रार निवारण मेळाव्यात अभियंत्यांना अर्वाच्य शिवीगाळ केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येस वितरण कंपनीचे अभियंताच जबाबदार असून तेच शेतकऱ्यांना त्रास देतात. त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. त्यांना धारेवर धरू, असे वक्तव्य आ. बच्चू कडू यांनी केल्याचा निषेध करीत अभियंता संघटनेने निषेध करीत आमदाराच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. अचलपूर मतदारसंघातील विद्युत ग्राहक तक्रार निवारण मेळावा परतवाडा येथे रविवारी पार पडला. दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत सदर मेळाव्यात नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती. मेळाव्यासाठी अचलपूर, मोर्शी येथील कार्यकारी अभियंत्यांसह उपविभागातील मोठ्या संख्येने अभियंते उपस्थित होते. शेतकरी वीजग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यात येत होते. अशातच आ. बच्चू कडू यांनी मेळाव्याच्या सुरुवातीलाच विद्युत वितरण कंपनीचे अभियंतेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येस जबाबदार असून त्यांना धारेवर धरले जाईल. शेतकऱ्यांना त्रास देतात. आताची ओव्हरलोडिंगची परिस्थिती अभियंत्यांमुळे आली आहे, असे वक्तव्य भाषणात वारंवार केल्याचे निवेदन सबआॅर्डिनेट इंजिनिअरिंग असोसिएननचे वरिष्ठांना पाठविल्याचे म्हटले आहे. वीज वितरण कंपनीचा अभियंता शेण व घाण खातो. त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. तक्रार निवारण मेळाव्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.भ्रष्ट अभियंत्याला घरात घुसून मारु : बच्चू कडूअचलपूर : शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या वीज कंपनीतील भ्रष्ट शेण खाणाऱ्या अभियंत्यांना घरात घुसून ठोकू, असे वक्तव्य आ. बच्चू कडू यांनी परतवाडा येथे रविवारी आयोजित तक्रार निवारण मेळाव्यात केले. आपण विद्युत ग्राहक मेळाव्यात एकाही अभियंत्याला बोलावले नव्हते. जिल्ह्यात १७८ डी.बी. ओव्हरलोड आहेत. जेथे १० कनेक्शन पाहिजे होते तेथे २० देण्यात आलेत. हे शेण कुणी खाल्ले याची चौकशी करावी, असे आ. बच्चू कडू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. माझ्या शिव्या झोंबत असेल तर शेतकऱ्यांचा जीव जातोय त्याचं काय? येथे माणसं मरत असताना भ्रष्ट अभियंत्यांनी २०११ मध्ये पैसे भरणाऱ्यांना कनेक्शन न देता बिल दिले व २०१२ मध्ये अर्ज करणाऱ्यांना कनेक्शन हा कुठला प्रकार आहे. या सर्व बाबींचे उत्तर मागणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले.