शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडूंच्या बैठकीवर अभियंत्यांचा बहिष्कार

By admin | Updated: July 22, 2015 00:35 IST

आ. बच्चू कडू यांनी रविवारी परतवाडा येथील वाघामाता संस्थानमध्ये आयोजित विद्युत ग्राहक तक्रार निवारण मेळाव्यात अभियंत्यांना अर्वाच्य शिवीगाळ केली.

अर्वाच्च शिवीगाळ : तक्रार निवारण मेळाव्यातील प्रकारअचलपूर : आ. बच्चू कडू यांनी रविवारी परतवाडा येथील वाघामाता संस्थानमध्ये आयोजित विद्युत ग्राहक तक्रार निवारण मेळाव्यात अभियंत्यांना अर्वाच्य शिवीगाळ केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येस वितरण कंपनीचे अभियंताच जबाबदार असून तेच शेतकऱ्यांना त्रास देतात. त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. त्यांना धारेवर धरू, असे वक्तव्य आ. बच्चू कडू यांनी केल्याचा निषेध करीत अभियंता संघटनेने निषेध करीत आमदाराच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. अचलपूर मतदारसंघातील विद्युत ग्राहक तक्रार निवारण मेळावा परतवाडा येथे रविवारी पार पडला. दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत सदर मेळाव्यात नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती. मेळाव्यासाठी अचलपूर, मोर्शी येथील कार्यकारी अभियंत्यांसह उपविभागातील मोठ्या संख्येने अभियंते उपस्थित होते. शेतकरी वीजग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यात येत होते. अशातच आ. बच्चू कडू यांनी मेळाव्याच्या सुरुवातीलाच विद्युत वितरण कंपनीचे अभियंतेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येस जबाबदार असून त्यांना धारेवर धरले जाईल. शेतकऱ्यांना त्रास देतात. आताची ओव्हरलोडिंगची परिस्थिती अभियंत्यांमुळे आली आहे, असे वक्तव्य भाषणात वारंवार केल्याचे निवेदन सबआॅर्डिनेट इंजिनिअरिंग असोसिएननचे वरिष्ठांना पाठविल्याचे म्हटले आहे. वीज वितरण कंपनीचा अभियंता शेण व घाण खातो. त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. तक्रार निवारण मेळाव्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.भ्रष्ट अभियंत्याला घरात घुसून मारु : बच्चू कडूअचलपूर : शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या वीज कंपनीतील भ्रष्ट शेण खाणाऱ्या अभियंत्यांना घरात घुसून ठोकू, असे वक्तव्य आ. बच्चू कडू यांनी परतवाडा येथे रविवारी आयोजित तक्रार निवारण मेळाव्यात केले. आपण विद्युत ग्राहक मेळाव्यात एकाही अभियंत्याला बोलावले नव्हते. जिल्ह्यात १७८ डी.बी. ओव्हरलोड आहेत. जेथे १० कनेक्शन पाहिजे होते तेथे २० देण्यात आलेत. हे शेण कुणी खाल्ले याची चौकशी करावी, असे आ. बच्चू कडू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. माझ्या शिव्या झोंबत असेल तर शेतकऱ्यांचा जीव जातोय त्याचं काय? येथे माणसं मरत असताना भ्रष्ट अभियंत्यांनी २०११ मध्ये पैसे भरणाऱ्यांना कनेक्शन न देता बिल दिले व २०१२ मध्ये अर्ज करणाऱ्यांना कनेक्शन हा कुठला प्रकार आहे. या सर्व बाबींचे उत्तर मागणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले.