शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

कपाशीवर बोंडअळीचा प्रकोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST

दर्यापूर तालुक्यातील येवदा, पिंपळोद, उमरी, वडनेर गंगाई, येरंडगाव, राजखेड, वरूड कुलट, घोडचंदी शहीद, सांगळूद, तेलखेडा, कातखेडा आदी शिवारांमध्ये बोंडअळीची लागण झाल्याची माहिती आहे. खारपाणपट्ट्यात मूग, उडीद, कपाशी, तूर ही प्रमुख पिके आहेत. मूग पावसाच्या विलंबाने गारद झाले, तर शेतातील सोयाबीन अतिपावसाने शेतामध्येच कुजले.

ठळक मुद्देपीक केले हद्दपार : शेतकरी पुन्हा संकटात, तुरीच्या मुकण्या होणार

अनंत बोबडे।लोकमत न्यूज नेटवर्कयेवदा : खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका यंदाच्या खरीप हंगामात अव्याहत सुरू आहे. आता ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव अधिकच वाढला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कपाशीचे पीक कापून शेतातून हद्दपार केले आहे.दर्यापूर तालुक्यातील येवदा, पिंपळोद, उमरी, वडनेर गंगाई, येरंडगाव, राजखेड, वरूड कुलट, घोडचंदी शहीद, सांगळूद, तेलखेडा, कातखेडा आदी शिवारांमध्ये बोंडअळीची लागण झाल्याची माहिती आहे. खारपाणपट्ट्यात मूग, उडीद, कपाशी, तूर ही प्रमुख पिके आहेत. मूग पावसाच्या विलंबाने गारद झाले, तर शेतातील सोयाबीन अतिपावसाने शेतामध्येच कुजले. आता बोंडअळीने कपाशीवर हल्ला केला आहे.येवदा येथील एकनाथ नामदेव बोरकर, संदीप चोरे, गजानन शिंगाडे, संदीप वडतकर, सावतराम कुरेकर, वरूड कुलट येथील जगदीश बगले, येरंडगाव येथील अमोल पुरी यांसारख्या अनेक शेतकºयांनी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दृष्टीस पडताच आपल्या शेतातील उभे पीक उपटून काढले आहे. काही पिके बोंडअळीच्या सावटात असल्याने तीसुद्धा शेतकºयांनी उपडून फेकण्यास सुरूवात केली आहे. एकरी १५ ते २० क्विंटल कापूस उत्पादनाचे स्वप्न डोळ्यांदेखत विरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.येवदा परिसरात अनेक शेतकºयांच्या घरांमध्ये अद्यापही कापूस आलेला नाही. त्यातच तूर पिकावरसुद्धा ढगाळ वातावरणामुळे अळ्यांचा प्रादुर्भाव होत आहे. शेतकºयांना आज सर्वंकष मदतीची गरज असताना शासन मदतीचा हात देईल का, याकडे आशेने जगत आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी