शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

कपाशीवर बोंडअळीचा प्रकोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST

दर्यापूर तालुक्यातील येवदा, पिंपळोद, उमरी, वडनेर गंगाई, येरंडगाव, राजखेड, वरूड कुलट, घोडचंदी शहीद, सांगळूद, तेलखेडा, कातखेडा आदी शिवारांमध्ये बोंडअळीची लागण झाल्याची माहिती आहे. खारपाणपट्ट्यात मूग, उडीद, कपाशी, तूर ही प्रमुख पिके आहेत. मूग पावसाच्या विलंबाने गारद झाले, तर शेतातील सोयाबीन अतिपावसाने शेतामध्येच कुजले.

ठळक मुद्देपीक केले हद्दपार : शेतकरी पुन्हा संकटात, तुरीच्या मुकण्या होणार

अनंत बोबडे।लोकमत न्यूज नेटवर्कयेवदा : खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका यंदाच्या खरीप हंगामात अव्याहत सुरू आहे. आता ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव अधिकच वाढला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कपाशीचे पीक कापून शेतातून हद्दपार केले आहे.दर्यापूर तालुक्यातील येवदा, पिंपळोद, उमरी, वडनेर गंगाई, येरंडगाव, राजखेड, वरूड कुलट, घोडचंदी शहीद, सांगळूद, तेलखेडा, कातखेडा आदी शिवारांमध्ये बोंडअळीची लागण झाल्याची माहिती आहे. खारपाणपट्ट्यात मूग, उडीद, कपाशी, तूर ही प्रमुख पिके आहेत. मूग पावसाच्या विलंबाने गारद झाले, तर शेतातील सोयाबीन अतिपावसाने शेतामध्येच कुजले. आता बोंडअळीने कपाशीवर हल्ला केला आहे.येवदा येथील एकनाथ नामदेव बोरकर, संदीप चोरे, गजानन शिंगाडे, संदीप वडतकर, सावतराम कुरेकर, वरूड कुलट येथील जगदीश बगले, येरंडगाव येथील अमोल पुरी यांसारख्या अनेक शेतकºयांनी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दृष्टीस पडताच आपल्या शेतातील उभे पीक उपटून काढले आहे. काही पिके बोंडअळीच्या सावटात असल्याने तीसुद्धा शेतकºयांनी उपडून फेकण्यास सुरूवात केली आहे. एकरी १५ ते २० क्विंटल कापूस उत्पादनाचे स्वप्न डोळ्यांदेखत विरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.येवदा परिसरात अनेक शेतकºयांच्या घरांमध्ये अद्यापही कापूस आलेला नाही. त्यातच तूर पिकावरसुद्धा ढगाळ वातावरणामुळे अळ्यांचा प्रादुर्भाव होत आहे. शेतकºयांना आज सर्वंकष मदतीची गरज असताना शासन मदतीचा हात देईल का, याकडे आशेने जगत आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी