शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

विद्युत टॉवर विरोधात बळीराजा आक्रमक

By admin | Updated: February 4, 2015 23:07 IST

महाराष्ट्रभरात विद्युत टॉवर कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात फसवणुक करीत आहे, असा आरोप राष्ट्रवादी क्रॉग्रेस पक्ष व महासम्राट बळीराजा शेतकरी संघटनेने केला

अमरावती : महाराष्ट्रभरात विद्युत टॉवर कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात फसवणुक करीत आहे, असा आरोप राष्ट्रवादी क्रॉग्रेस पक्ष व महासम्राट बळीराजा शेतकरी संघटनेने केला असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वाढवून देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा शेतकरी लाक्षणिक उपोषण करणार असा इशारा मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेतून संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विद्युत लाईनचे कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. हे कामे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण व वितरण कंपनी तसेच महाराष्ट्र ईस्टर्न ग्रीड पॉवर ट्रान्समिशन कंपनी लि., पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लि. व धुळे ट्रान्समिशन कंपनी लि. अश्या ११ कंपन्या करीत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात पुर्ण टॉवर आल्यास त्यांना किती रक्कम द्यावी याबद्दल कंपनीकडे कोणतेही निकष नाहीत असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. जी रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येते ती रक्कम शेकतऱ्यांसाठी अतिशय कमी आहे. नुकसान भरपाईची रक्कम अतिशय कमी असल्याच्या अनेक तक्रारी राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस मिलींद पाटील व महासम्राट बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अनिल नागरे यांच्याकडे आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम वाढून देण्यात यावी असे पत्र शासनाला देण्यात आले आहे. अनेकदा पत्र देऊनही कंपनीने कोणतेही उत्तर अद्यापर्यंत दिले नाही. त्यामुळे औरंगाबाद येथील विधीज्ञ बिपीन पाटील यांच्या मार्फत सर्वच कंपन्याना व शासनाला संघटनेच्यावतीने नोटीस पाठविण्यात आली आहे. या समस्येवर उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ४ बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांने न्याय मिळावा या उद्देशाने राष्ट्रवादी कॉग्रेंस पक्ष व महासम्राट बळीराजा शेतकरी संघटना सरसावली आहेत. अशी माहिती विजय पाटील, अनिल नागरे व दिनेश व पात्रे यांनी पत्रपरिषदेत दिली.