शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत टॉवर विरोधात बळीराजा आक्रमक

By admin | Updated: February 4, 2015 23:07 IST

महाराष्ट्रभरात विद्युत टॉवर कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात फसवणुक करीत आहे, असा आरोप राष्ट्रवादी क्रॉग्रेस पक्ष व महासम्राट बळीराजा शेतकरी संघटनेने केला

अमरावती : महाराष्ट्रभरात विद्युत टॉवर कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात फसवणुक करीत आहे, असा आरोप राष्ट्रवादी क्रॉग्रेस पक्ष व महासम्राट बळीराजा शेतकरी संघटनेने केला असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वाढवून देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा शेतकरी लाक्षणिक उपोषण करणार असा इशारा मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेतून संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विद्युत लाईनचे कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. हे कामे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण व वितरण कंपनी तसेच महाराष्ट्र ईस्टर्न ग्रीड पॉवर ट्रान्समिशन कंपनी लि., पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लि. व धुळे ट्रान्समिशन कंपनी लि. अश्या ११ कंपन्या करीत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात पुर्ण टॉवर आल्यास त्यांना किती रक्कम द्यावी याबद्दल कंपनीकडे कोणतेही निकष नाहीत असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. जी रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येते ती रक्कम शेकतऱ्यांसाठी अतिशय कमी आहे. नुकसान भरपाईची रक्कम अतिशय कमी असल्याच्या अनेक तक्रारी राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस मिलींद पाटील व महासम्राट बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अनिल नागरे यांच्याकडे आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम वाढून देण्यात यावी असे पत्र शासनाला देण्यात आले आहे. अनेकदा पत्र देऊनही कंपनीने कोणतेही उत्तर अद्यापर्यंत दिले नाही. त्यामुळे औरंगाबाद येथील विधीज्ञ बिपीन पाटील यांच्या मार्फत सर्वच कंपन्याना व शासनाला संघटनेच्यावतीने नोटीस पाठविण्यात आली आहे. या समस्येवर उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ४ बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांने न्याय मिळावा या उद्देशाने राष्ट्रवादी कॉग्रेंस पक्ष व महासम्राट बळीराजा शेतकरी संघटना सरसावली आहेत. अशी माहिती विजय पाटील, अनिल नागरे व दिनेश व पात्रे यांनी पत्रपरिषदेत दिली.