शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

विद्युत टॉवर विरोधात बळीराजा आक्रमक

By admin | Updated: February 4, 2015 23:07 IST

महाराष्ट्रभरात विद्युत टॉवर कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात फसवणुक करीत आहे, असा आरोप राष्ट्रवादी क्रॉग्रेस पक्ष व महासम्राट बळीराजा शेतकरी संघटनेने केला

अमरावती : महाराष्ट्रभरात विद्युत टॉवर कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात फसवणुक करीत आहे, असा आरोप राष्ट्रवादी क्रॉग्रेस पक्ष व महासम्राट बळीराजा शेतकरी संघटनेने केला असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वाढवून देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा शेतकरी लाक्षणिक उपोषण करणार असा इशारा मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेतून संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विद्युत लाईनचे कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. हे कामे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण व वितरण कंपनी तसेच महाराष्ट्र ईस्टर्न ग्रीड पॉवर ट्रान्समिशन कंपनी लि., पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लि. व धुळे ट्रान्समिशन कंपनी लि. अश्या ११ कंपन्या करीत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात पुर्ण टॉवर आल्यास त्यांना किती रक्कम द्यावी याबद्दल कंपनीकडे कोणतेही निकष नाहीत असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. जी रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येते ती रक्कम शेकतऱ्यांसाठी अतिशय कमी आहे. नुकसान भरपाईची रक्कम अतिशय कमी असल्याच्या अनेक तक्रारी राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस मिलींद पाटील व महासम्राट बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अनिल नागरे यांच्याकडे आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम वाढून देण्यात यावी असे पत्र शासनाला देण्यात आले आहे. अनेकदा पत्र देऊनही कंपनीने कोणतेही उत्तर अद्यापर्यंत दिले नाही. त्यामुळे औरंगाबाद येथील विधीज्ञ बिपीन पाटील यांच्या मार्फत सर्वच कंपन्याना व शासनाला संघटनेच्यावतीने नोटीस पाठविण्यात आली आहे. या समस्येवर उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ४ बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांने न्याय मिळावा या उद्देशाने राष्ट्रवादी कॉग्रेंस पक्ष व महासम्राट बळीराजा शेतकरी संघटना सरसावली आहेत. अशी माहिती विजय पाटील, अनिल नागरे व दिनेश व पात्रे यांनी पत्रपरिषदेत दिली.