शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

स्थायी समितीत बोगस बियाणे गाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:00 IST

पावसाचे दिवस सुरू झाल्याने शेतकरी वर्ग खरीप पेरणीच्या तयारीला लागला आहे. खरिपाला सुरुवात होत नाही तोच बाजारपेठेत बोगस बियाण्याचा शिरकाव झाल्याचे प्रकार उघडकीस आले. यामध्ये धामणगाव तालुक्यात कृषी व पोलीस विभागाने देवगाव फाटा, तळणी, निंभारी, दत्तापूर आदी ठिकाणी बोलगार्ड-३ बीटी बियाणे पकडले आहे. या बनावट बियाण्यांत शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : पदाधिकारी, सदस्यांनी कृषी विभागाकडे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. अशातच आता पेरणीच्या तयारीला वेग येत असताना, धामणगाव रेल्वे तालुक्यात बनावट बीटी कपाशी बियाणे विकले जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या मुद्द्यावर जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला.जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा व्हिडीओ कॉफरन्सिंगद्वारे डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात शुक्रवारी अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, प्रियंका दगडकर, पूजा आमले, विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे, सदस्य सुहासिनी ढेपे, अभिजित बोके, सुनील डिके, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे, कॅफो दत्तात्रय फिसके आदी सभागृहात उपस्थित होते.पावसाचे दिवस सुरू झाल्याने शेतकरी वर्ग खरीप पेरणीच्या तयारीला लागला आहे. खरिपाला सुरुवात होत नाही तोच बाजारपेठेत बोगस बियाण्याचा शिरकाव झाल्याचे प्रकार उघडकीस आले. यामध्ये धामणगाव तालुक्यात कृषी व पोलीस विभागाने देवगाव फाटा, तळणी, निंभारी, दत्तापूर आदी ठिकाणी बोलगार्ड-३ बीटी बियाणे पकडले आहे. या बनावट बियाण्यांत शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. त्यामुळे अशा प्रकाराला आळा घालणे आवश्यक असल्याचा मुद्दा मांडून यावर कृषी विभागाकडून काय उपाययोजना केल्यात, याची जाब सदस्य सुनील डिके यांनी कृषी अधिकाऱ्यांना विचारला. यासोबतच सोयाबीन बियाणे, सिंगल सुपर फॉस्फेट या खतांच्या किमतीत तफावत येत आहे. हा मुद्दा सुहासिनी ढेपे यांनी उपस्थित केला. कृषिसेवा केंद्रांमध्ये बियाण्यांचे दरपत्रक, स्टॉकची नोंद, विक्री केलेल्या मालाची पावती आदींची तपासणी कृषी विभागाकडून होत नसल्याचे विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.दरम्यान, या सर्व मुद्द्यांवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा कृषिविकास अधिकारी यांना बोगस बियाणे धामणगाव तालुक्यात पकडण्यात आले असल्याचे सभागृहात सांगितले. खरीप हंगामात कुठल्याही शेतकऱ्याची फसवणूक होवू नये, किमतीही नियंत्रणात राहाव्यात, यासाठी कृषी विभागाने या प्रकारांना आळा घालावा, अशा सूचना अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केल्या. शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे, खते खरेदी करावी व त्याची पावती घ्यावी, असे आवाहन कृषी सभापती विठ्ठल चव्हाण व पदाधिकाऱ्यांनी केले. सभेत इतर मुद्यांवरही चर्चा करून सर्व विषय मंजूर करण्यात आले.बांधकाम, पशुसंवर्धनचे विषयही चर्चेतपरतवाडा-अकोला या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी चिखलदरा तालुक्यातील बोराळा या गावाच्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात गिट्टी, मुरुमाची वाहतुक सुरू आहे. यामुळे हा रस्ता पूर्णत: खराब झाला आहे. वाहतुकीसाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची परवानगी घेतली नाही. त्यामुळे संबंधिताकडून रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी सभापती दयाराम काळे यांनी केली. पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती मिळत नसल्याचे सदस्य महेंद्र गैलवार यांनी सांगितले. यापुढे योजना राबविताना सदस्यांना माहिती देण्याचे आदेश सभापती बबलू देशमुख यांनी दिले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदagricultureशेती