शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

शरीरसौष्ठवपटू विजय भोयर टायगर अ‍ॅम्बेसिडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 01:47 IST

येथील शरीरसौष्ठवपटू विजय भोयर याला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने टायगर अ‍ॅम्बेसिडर म्हणून नियुक्त केले आहे. तो वाघांचे संगोपन, संरक्षणासाठी प्रचार व प्रसार करणार असून, लवकरच तसा करार होणार आहे.

ठळक मुद्देबँकॉक येथे रजतपदक विजेता : वाघांचे संगोपन, संरक्षणासाठी करणार प्रचार व प्रसार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील शरीरसौष्ठवपटू विजय भोयर याला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने टायगर अ‍ॅम्बेसिडर म्हणून नियुक्त केले आहे. तो वाघांचे संगोपन, संरक्षणासाठी प्रचार व प्रसार करणार असून, लवकरच तसा करार होणार आहे.वाघांचे संंगोपन आणि संरक्षणासाठी प्रचार व प्रसार जोरकसपणे करता यावा, याकरिता मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी यांनी स्थानिक शरीरसौष्ठवपटू विजय भोयर यांची टायगर अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. विजय भोयर याने बँकाँक येथे नुकतेच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत भारताला सिल्व्हर पदक मिळवून दिले आहे. तो स्पर्धेत दुसºया क्रमांकावर होता. भोयर हा अतिशय सामान्य कुटुंबातील आहे. त्याने मिळविलेल्या सिल्व्हर पदकपदकाने अमरावतीचे नाव देशपातळीवर मानाने घेतले जात आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने ‘टायगर टेक’ प्रमोशनसाठी भोयर याची निवड केल्यामुळे स्थानिक क्रीडापटुला नवी संधी मिळाली आहे. वाघांचे संरक्षण, संगोपनासह मानवी साखळीत वाघ का आवश्यक असल्याचा प्रसार, प्रचार करताना तो कर्मचाºयांना शरीरयष्टी सुखरूप ठेवण्याचे टीप्स देणार आहे. विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे जवानांना व्याघ्र सीमेवर वाघांची तस्करी, शिकार रोखण्यासाठी भोयर मार्गदर्शन करणार आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाघ, जंगलाप्रती प्रेम,आस्था निर्माण करण्यासाठी कार्यशाळा, चर्चांमध्ये तो आवर्जून सहभागी राहणार आहे. मानधनावर त्याची टायगर अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली जाणार असून लवकरच करार होईल, असे व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी यांनी सांगितले.व्याघ्र प्रकल्प मुख्यमंत्री कार्यालयाशी अटॅचमेळघाट व्याघ्र प्रकल्प हा ‘टायगर टेक’ अंतर्गत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मीडिया सेलशी जोडण्यात आला आहे. वाघांबाबतच्या घडामोडी, संरक्षण आणि संवर्धनाची माहिती कळवावी लागते. व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन, वाघांची वाढती संख्या अन्य दैंनदिन घडामोडी सीएम कार्यालयाला कळवाव्या लागतात, अशी माहिती टायगर क्राईम सेलचे उपवनसंरक्षक माळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.