शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भाजपचे 'अच्छे दिन'

By admin | Updated: October 16, 2014 23:17 IST

बुधवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात आठ मतदार संघांपैकी भाजपला सर्वाधिक पाच जागा मिळेल, असा अहवाल राज्य गुप्तचर वार्ता विभागाने शासनाला कळविला आहे.

जिल्ह्यात पाच जागा?: राज्य गुप्तचर वार्ता विभागाचा अहवालअमरावती : बुधवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात आठ मतदार संघांपैकी भाजपला सर्वाधिक पाच जागा मिळेल, असा अहवाल राज्य गुप्तचर वार्ता विभागाने शासनाला कळविला आहे. शिवसेना, काँग्रेस, अपक्ष व रिपाइंला प्रत्येकी एक जागा मिळेल, असा अंदाज आहे.राज्यात १५ वर्षे सत्तेत राहणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने पहिल्यांदाच स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढविली. अशातच २५ वर्षांपूर्र्वींची युती संपुष्टात आल्यामुळे भाजप, सेना विधानसभा निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरे गेले. या निवडणुकीत आघाडी शासनाविरोधी वातावरण असल्याने भाजपने ही संधी चांगल्या पद्धतीने ‘कॅश’ केली. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे स्टार प्रचारक म्हणून राज्य प्रचाराने पिंजून काढला. भाजपमय वातावरण निर्माण करण्यात मोदींना यशदेखील आल्याचे झालेल्या मतदानानंतरचे चित्र पाहावयास मिळाले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपला खातेही उघडता आले नव्हते, हे खरे आहे. मात्र, यावेळच्या विधानसभा निवडणुकीत चक्क चार ते पाच जागा भाजपच्या वाट्याला येतील, असे मतदानानंतरचे चित्र आहे. चार जागांवर विजयी होणाऱ्या काँग्रेसला मोठ्या प्रमाणात पराभवाचा सामना करावा लागेल, असा अंदाज राज्य गुप्तचर वार्ता विभागाचा आहे. तिवसा मतदार संघाच्या काँग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांचा निसटता विजय होईल, असा अंदाज बांधला जात आहे. यशोमती ठाकूर यांना शिवसेनेचे दिनेशनाना वानखडे, भाजपच्या निवेदिता चौधरी यांच्याशी कडवी झुंज द्यावी लागेल, असे अहवाल म्हटले आहे.अमरावती मतदारसंघातून भाजपचे सुनील देशमुख हे सरशी ठरतील, असे गृहीत आहे. मात्र काँग्रेसचे रावसाहेब शेखावत यांना मुस्लिम, हिंदी भाषिक मते तर शिवसेनेचे प्रदीप बाजड यांनी मराठी मते घेतली. बसपचे मिर्झा नईम बेग, मुस्लिम लिगचे इमरान अशरफी यांनी मुस्लिम मतांचे विभाजन केल्यामुळे अमरावतीत धक्कादायक निकाल लागण्याचे संकेत आहे. बडनेरा मतदार संघातून अपक्ष रवी राणा यांची बाजू भक्कम असल्याचा अंदाज आहे. परंतु काँग्रेसच्या सुलभा खोडके, शिवसेनेचे संजय बंड, भाजपचे तुषार भारतीय यांचे राणांना तगडे आव्हान आहे. मोर्शीत अनिल बोंडे यांच्या बाजूने निकाल लागेल, असा अंदाज आहे. परंतु शिवसेनेचे उमेश यावलकर, राष्ट्रवादीचे हर्षवर्धन देशमुख, काँग्रेसचे नरेशचंद्र ठाकरे हेसुद्धा शर्यतीत आहेत. धामणगाव रेल्वे मतदारसंघात भाजपचे अरुण अडसड आणि काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांच्यात थेट लढत असली तरी मोदी यांची चांदूररेल्वेत सभा झाल्यानंतर या मतदार संघात वातावरण बदलले. मागे पडलेले अरुण अडसड मतदानानंतर अव्वलस्थानी असल्याचा अंदाज आहे. अडसड यांना काँग्रेसचे वीरेंद्र जगताप, बसपचे अभिजित ढेपे तर शिवसेनेचे सिद्धेश्वर चव्हाण यांचे आव्हान आहे.