शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

भाजपचे 'अच्छे दिन'

By admin | Updated: October 16, 2014 23:17 IST

बुधवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात आठ मतदार संघांपैकी भाजपला सर्वाधिक पाच जागा मिळेल, असा अहवाल राज्य गुप्तचर वार्ता विभागाने शासनाला कळविला आहे.

जिल्ह्यात पाच जागा?: राज्य गुप्तचर वार्ता विभागाचा अहवालअमरावती : बुधवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात आठ मतदार संघांपैकी भाजपला सर्वाधिक पाच जागा मिळेल, असा अहवाल राज्य गुप्तचर वार्ता विभागाने शासनाला कळविला आहे. शिवसेना, काँग्रेस, अपक्ष व रिपाइंला प्रत्येकी एक जागा मिळेल, असा अंदाज आहे.राज्यात १५ वर्षे सत्तेत राहणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने पहिल्यांदाच स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढविली. अशातच २५ वर्षांपूर्र्वींची युती संपुष्टात आल्यामुळे भाजप, सेना विधानसभा निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरे गेले. या निवडणुकीत आघाडी शासनाविरोधी वातावरण असल्याने भाजपने ही संधी चांगल्या पद्धतीने ‘कॅश’ केली. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे स्टार प्रचारक म्हणून राज्य प्रचाराने पिंजून काढला. भाजपमय वातावरण निर्माण करण्यात मोदींना यशदेखील आल्याचे झालेल्या मतदानानंतरचे चित्र पाहावयास मिळाले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपला खातेही उघडता आले नव्हते, हे खरे आहे. मात्र, यावेळच्या विधानसभा निवडणुकीत चक्क चार ते पाच जागा भाजपच्या वाट्याला येतील, असे मतदानानंतरचे चित्र आहे. चार जागांवर विजयी होणाऱ्या काँग्रेसला मोठ्या प्रमाणात पराभवाचा सामना करावा लागेल, असा अंदाज राज्य गुप्तचर वार्ता विभागाचा आहे. तिवसा मतदार संघाच्या काँग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांचा निसटता विजय होईल, असा अंदाज बांधला जात आहे. यशोमती ठाकूर यांना शिवसेनेचे दिनेशनाना वानखडे, भाजपच्या निवेदिता चौधरी यांच्याशी कडवी झुंज द्यावी लागेल, असे अहवाल म्हटले आहे.अमरावती मतदारसंघातून भाजपचे सुनील देशमुख हे सरशी ठरतील, असे गृहीत आहे. मात्र काँग्रेसचे रावसाहेब शेखावत यांना मुस्लिम, हिंदी भाषिक मते तर शिवसेनेचे प्रदीप बाजड यांनी मराठी मते घेतली. बसपचे मिर्झा नईम बेग, मुस्लिम लिगचे इमरान अशरफी यांनी मुस्लिम मतांचे विभाजन केल्यामुळे अमरावतीत धक्कादायक निकाल लागण्याचे संकेत आहे. बडनेरा मतदार संघातून अपक्ष रवी राणा यांची बाजू भक्कम असल्याचा अंदाज आहे. परंतु काँग्रेसच्या सुलभा खोडके, शिवसेनेचे संजय बंड, भाजपचे तुषार भारतीय यांचे राणांना तगडे आव्हान आहे. मोर्शीत अनिल बोंडे यांच्या बाजूने निकाल लागेल, असा अंदाज आहे. परंतु शिवसेनेचे उमेश यावलकर, राष्ट्रवादीचे हर्षवर्धन देशमुख, काँग्रेसचे नरेशचंद्र ठाकरे हेसुद्धा शर्यतीत आहेत. धामणगाव रेल्वे मतदारसंघात भाजपचे अरुण अडसड आणि काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांच्यात थेट लढत असली तरी मोदी यांची चांदूररेल्वेत सभा झाल्यानंतर या मतदार संघात वातावरण बदलले. मागे पडलेले अरुण अडसड मतदानानंतर अव्वलस्थानी असल्याचा अंदाज आहे. अडसड यांना काँग्रेसचे वीरेंद्र जगताप, बसपचे अभिजित ढेपे तर शिवसेनेचे सिद्धेश्वर चव्हाण यांचे आव्हान आहे.