शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

भाजपचे 'अच्छे दिन'

By admin | Updated: October 16, 2014 23:17 IST

बुधवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात आठ मतदार संघांपैकी भाजपला सर्वाधिक पाच जागा मिळेल, असा अहवाल राज्य गुप्तचर वार्ता विभागाने शासनाला कळविला आहे.

जिल्ह्यात पाच जागा?: राज्य गुप्तचर वार्ता विभागाचा अहवालअमरावती : बुधवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात आठ मतदार संघांपैकी भाजपला सर्वाधिक पाच जागा मिळेल, असा अहवाल राज्य गुप्तचर वार्ता विभागाने शासनाला कळविला आहे. शिवसेना, काँग्रेस, अपक्ष व रिपाइंला प्रत्येकी एक जागा मिळेल, असा अंदाज आहे.राज्यात १५ वर्षे सत्तेत राहणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने पहिल्यांदाच स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढविली. अशातच २५ वर्षांपूर्र्वींची युती संपुष्टात आल्यामुळे भाजप, सेना विधानसभा निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरे गेले. या निवडणुकीत आघाडी शासनाविरोधी वातावरण असल्याने भाजपने ही संधी चांगल्या पद्धतीने ‘कॅश’ केली. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे स्टार प्रचारक म्हणून राज्य प्रचाराने पिंजून काढला. भाजपमय वातावरण निर्माण करण्यात मोदींना यशदेखील आल्याचे झालेल्या मतदानानंतरचे चित्र पाहावयास मिळाले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपला खातेही उघडता आले नव्हते, हे खरे आहे. मात्र, यावेळच्या विधानसभा निवडणुकीत चक्क चार ते पाच जागा भाजपच्या वाट्याला येतील, असे मतदानानंतरचे चित्र आहे. चार जागांवर विजयी होणाऱ्या काँग्रेसला मोठ्या प्रमाणात पराभवाचा सामना करावा लागेल, असा अंदाज राज्य गुप्तचर वार्ता विभागाचा आहे. तिवसा मतदार संघाच्या काँग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांचा निसटता विजय होईल, असा अंदाज बांधला जात आहे. यशोमती ठाकूर यांना शिवसेनेचे दिनेशनाना वानखडे, भाजपच्या निवेदिता चौधरी यांच्याशी कडवी झुंज द्यावी लागेल, असे अहवाल म्हटले आहे.अमरावती मतदारसंघातून भाजपचे सुनील देशमुख हे सरशी ठरतील, असे गृहीत आहे. मात्र काँग्रेसचे रावसाहेब शेखावत यांना मुस्लिम, हिंदी भाषिक मते तर शिवसेनेचे प्रदीप बाजड यांनी मराठी मते घेतली. बसपचे मिर्झा नईम बेग, मुस्लिम लिगचे इमरान अशरफी यांनी मुस्लिम मतांचे विभाजन केल्यामुळे अमरावतीत धक्कादायक निकाल लागण्याचे संकेत आहे. बडनेरा मतदार संघातून अपक्ष रवी राणा यांची बाजू भक्कम असल्याचा अंदाज आहे. परंतु काँग्रेसच्या सुलभा खोडके, शिवसेनेचे संजय बंड, भाजपचे तुषार भारतीय यांचे राणांना तगडे आव्हान आहे. मोर्शीत अनिल बोंडे यांच्या बाजूने निकाल लागेल, असा अंदाज आहे. परंतु शिवसेनेचे उमेश यावलकर, राष्ट्रवादीचे हर्षवर्धन देशमुख, काँग्रेसचे नरेशचंद्र ठाकरे हेसुद्धा शर्यतीत आहेत. धामणगाव रेल्वे मतदारसंघात भाजपचे अरुण अडसड आणि काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांच्यात थेट लढत असली तरी मोदी यांची चांदूररेल्वेत सभा झाल्यानंतर या मतदार संघात वातावरण बदलले. मागे पडलेले अरुण अडसड मतदानानंतर अव्वलस्थानी असल्याचा अंदाज आहे. अडसड यांना काँग्रेसचे वीरेंद्र जगताप, बसपचे अभिजित ढेपे तर शिवसेनेचे सिद्धेश्वर चव्हाण यांचे आव्हान आहे.