शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

भाजपच्या आशा पल्लवित; काँग्रेस सावध

By admin | Updated: January 6, 2017 00:23 IST

नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या यशाने भाजपाच्या आशा पल्लवित झाल्या असतानाच गेली अनेक

निवडणूक : जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी व्यूहरचना अमरावती : नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या यशाने भाजपाच्या आशा पल्लवित झाल्या असतानाच गेली अनेक वर्षे पारंपारिक बालेकिल्यात फटका बसल्याने काँग्रेसचे नेते आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अधिक सावध झाले आहेत. काँग्रेसची पिछेहाट होत असताना ती जागा भरून काढता येईल का, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. तर भाजपाकडून कशी सन्मानाची वागणूक मिळते या प्रतिक्षेत शिवसेना आहे. लातूर जिल्हा परिषदेत स्थापनेपासून काँग्रेसची सत्ता आहे. काही वेळा राजकिय परिस्थितीमुळे विरोधकांचे केवळ संख्याबळ वाढले. मात्र त्यांना सत्वेचा सोपान गाठता आला नाही. सद्याच्या जिल्हा परिषदेत ५९ सदस्यांपैकी २५ सदस्या एकट्या काँग्रेसचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ७, भाजप ९, शिवसेना ८, बसपा २, रिपाइं १, प्रहार ४, जनसंग्राम २, अपक्ष १ सदस्य आहेत. तर १४ पंचायत समितीमध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस, बसपा, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षाचे सभापती आहेत. देशात व राज्यात भाजपाची सत्ता, नगरपालिका निवडणुकीत जनतेने भाजपाच्या बाजूने दिलेला कौल पाहता जिल्हा परिषद व पंचायत समितीत सत्तास्थापनेसाठी भाजपाची मंडळी वेगवेगळ्या व्यूहरचना आखत आहेत. प्आगामी निवडणुकीत एकदिलाने काम झाले तर भाजपाची सत्ता येऊ शकते, असा विश्वास भाजपाचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. या निवडणुकीदरम्यान युतीबाबतचे चित्र मात्र अस्पष्ट आहे. त्यामुळे शिवसेनेची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे, तर काँग्रेस पक्षाने नगरपालिकेतील निकालाची दखल घेत सावधतेचा पवित्रा घेत आगामी निवडणुका पूर्ण ताकदीने लढवून जि. प., पं. स.च्या निवडणुकीत सत्तेची परंपरा या स्थानिक स्वराज्य संस्थेवर फडकविण्याची काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. (प्रतिनिधी)