शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम प्रक्रियेतून दिला दुर्मिळ बिनविषारी सापांना जन्म, भारतातील पहिलाच प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 14:54 IST

भारतातून केवळ महाराष्ट्रात क्वचितच भागात आढळणारा पिवळ्या ठिपक्याचा कवड्या बिनविषारी सापाच्या अंडी कृत्रिमरीत्या उबवून पिलांना जन्म दिला. हा प्रकार अमरावती येथील सर्पमित्रांनी १० जून रोजी केला.

- इंदल चव्हाण

अमरावती : भारतातून केवळ महाराष्ट्रात क्वचितच भागात आढळणारा पिवळ्या ठिपक्याचा कवड्या बिनविषारी सापाच्या अंडी कृत्रिमरीत्या उबवून पिलांना जन्म दिला. हा प्रकार अमरावती येथील सर्पमित्रांनी १० जून रोजी केला. दोन दिवसांनंतर वनाधिका-यांच्या समक्ष त्यांना जंगलात सोडण्यात आले. भारतातील हा पहिलाच प्रयोग असल्याची प्रतिक्रिया उपवनसंरक्षकांनी दिली.दोन महिन्यांपूर्वी पिवळ्या ठिपक्याचा कवड्या अतिशय दुर्मिळ असलेला बिनविषारी साप अमरावतीतील नवसारी भागात आढळला. नागरिकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, तो थोडाफार जखमी झाला. साप पडण्यासंदर्भात हेल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष रत्नदीप वानखडे यांना कळविण्यात आले. सदस्य श्रीकांत गावंडे, शुभम गायकवाड, विक्की गावंडे यांनी घटनास्थळी जाऊन साप पकडला. त्या मादी सापाला घरी नेले. त्याच रात्री १६ एप्रिल २०१८ रोजी तिने चार अंडी दिली. त्यानंतर सात तेथून निघून गेला. त्यातील दोन अंडी अनमॅच्युअर निघाल्याने खराब झाल्या. उर्वरित दोन अंडींना सर्पतज्ज्ञांच्या मार्गदर्शनात ह्युमिडिटी बॉक्समध्ये ठेवण्यात आले. शिवाय अंड्यांना बुरशी लागू नये म्हणून हेल्प फाऊंडेशनचे सदस्य अक्षय होले, राम करूले, सुमेध गवई, पवन गायकवाड, उमंग सवाई, संदीप सोळंके आदींनी त्याच्या प्रजननाबद्दलची अचूक माहिती गोळा करून विशेष काळजी घेतली. साधारणत: २१ ते २४ डिग्री सेल्सिअस तापमान कायम राहण्यासाठी त्यांनी माती ओली करून ठेवली. ७ जून रोजी अंडी फुटून सापाचा जन्म झाला. त्यांना वनाधिकाºयांच्या मार्गदर्शनात जंगलात सोडण्यात आले. त्याप्रीत्यर्थ आरएफओंनी त्यांचा प्रोत्साहन दिले.

५१ दिवसांचा कालावधीपिवळ्या ठिपक्याचा कवड्या साप भारतात तसा दुर्मिळच. अंडी दिल्यानंतर तेथून साप निघून जाते. पुन्हा त्या अंडींकडे फिरकत नाही. मात्र, ती अंडी विशिष्ट तापमानात रहावी, याचे भान ठेवूनच ती अंडी घालतात. ती अंडी ५१ दिवसांपर्यंत उबवली जाते. त्यानंतर त्यातून पिलं बाहेर पडते. त्यानंतर तो पिलू स्वत:चे भक्ष्य स्वत:च टिपतो. त्यामुळे त्याला मातेच्या सहकार्याची गरज भासत नाही. जानेवारी ते मार्च प्रजनन काळहा सात महाराष्ट्रातील काही भागातच आस्रढळत असून, त्यांचा प्रजनन काळ जानेवारी ते मार्च दरम्यान राहतो. मार्चमध्ये अंडी घालून ते ४८ दिवसांपर्यंत उबवण्याची प्रक्रिया होते. त्यानंतर ५१ दिवसांनी म्हणजेच जूनच्या पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात पिल बाहेर येतात.हा साप नवसारी भागातून ताब्यात घेतला. त्याने दिलेली अंडी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात विशिष्ट तापमानात ठेवली व काळजी घेतली. पिलू बाहेर येताच उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांना कळविले. त्यांनी आमच्या कार्याची प्रशंसा केली. हे महत्त्वपूर्ण कार्य असल्याचे ते म्हणाले.- रत्नदीप वानखडे, अध्यक्ष, हेल्प फाऊंडेशन, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती