शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

कृत्रिम प्रक्रियेतून दिला दुर्मिळ बिनविषारी सापांना जन्म, भारतातील पहिलाच प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 14:54 IST

भारतातून केवळ महाराष्ट्रात क्वचितच भागात आढळणारा पिवळ्या ठिपक्याचा कवड्या बिनविषारी सापाच्या अंडी कृत्रिमरीत्या उबवून पिलांना जन्म दिला. हा प्रकार अमरावती येथील सर्पमित्रांनी १० जून रोजी केला.

- इंदल चव्हाण

अमरावती : भारतातून केवळ महाराष्ट्रात क्वचितच भागात आढळणारा पिवळ्या ठिपक्याचा कवड्या बिनविषारी सापाच्या अंडी कृत्रिमरीत्या उबवून पिलांना जन्म दिला. हा प्रकार अमरावती येथील सर्पमित्रांनी १० जून रोजी केला. दोन दिवसांनंतर वनाधिका-यांच्या समक्ष त्यांना जंगलात सोडण्यात आले. भारतातील हा पहिलाच प्रयोग असल्याची प्रतिक्रिया उपवनसंरक्षकांनी दिली.दोन महिन्यांपूर्वी पिवळ्या ठिपक्याचा कवड्या अतिशय दुर्मिळ असलेला बिनविषारी साप अमरावतीतील नवसारी भागात आढळला. नागरिकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, तो थोडाफार जखमी झाला. साप पडण्यासंदर्भात हेल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष रत्नदीप वानखडे यांना कळविण्यात आले. सदस्य श्रीकांत गावंडे, शुभम गायकवाड, विक्की गावंडे यांनी घटनास्थळी जाऊन साप पकडला. त्या मादी सापाला घरी नेले. त्याच रात्री १६ एप्रिल २०१८ रोजी तिने चार अंडी दिली. त्यानंतर सात तेथून निघून गेला. त्यातील दोन अंडी अनमॅच्युअर निघाल्याने खराब झाल्या. उर्वरित दोन अंडींना सर्पतज्ज्ञांच्या मार्गदर्शनात ह्युमिडिटी बॉक्समध्ये ठेवण्यात आले. शिवाय अंड्यांना बुरशी लागू नये म्हणून हेल्प फाऊंडेशनचे सदस्य अक्षय होले, राम करूले, सुमेध गवई, पवन गायकवाड, उमंग सवाई, संदीप सोळंके आदींनी त्याच्या प्रजननाबद्दलची अचूक माहिती गोळा करून विशेष काळजी घेतली. साधारणत: २१ ते २४ डिग्री सेल्सिअस तापमान कायम राहण्यासाठी त्यांनी माती ओली करून ठेवली. ७ जून रोजी अंडी फुटून सापाचा जन्म झाला. त्यांना वनाधिकाºयांच्या मार्गदर्शनात जंगलात सोडण्यात आले. त्याप्रीत्यर्थ आरएफओंनी त्यांचा प्रोत्साहन दिले.

५१ दिवसांचा कालावधीपिवळ्या ठिपक्याचा कवड्या साप भारतात तसा दुर्मिळच. अंडी दिल्यानंतर तेथून साप निघून जाते. पुन्हा त्या अंडींकडे फिरकत नाही. मात्र, ती अंडी विशिष्ट तापमानात रहावी, याचे भान ठेवूनच ती अंडी घालतात. ती अंडी ५१ दिवसांपर्यंत उबवली जाते. त्यानंतर त्यातून पिलं बाहेर पडते. त्यानंतर तो पिलू स्वत:चे भक्ष्य स्वत:च टिपतो. त्यामुळे त्याला मातेच्या सहकार्याची गरज भासत नाही. जानेवारी ते मार्च प्रजनन काळहा सात महाराष्ट्रातील काही भागातच आस्रढळत असून, त्यांचा प्रजनन काळ जानेवारी ते मार्च दरम्यान राहतो. मार्चमध्ये अंडी घालून ते ४८ दिवसांपर्यंत उबवण्याची प्रक्रिया होते. त्यानंतर ५१ दिवसांनी म्हणजेच जूनच्या पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात पिल बाहेर येतात.हा साप नवसारी भागातून ताब्यात घेतला. त्याने दिलेली अंडी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात विशिष्ट तापमानात ठेवली व काळजी घेतली. पिलू बाहेर येताच उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांना कळविले. त्यांनी आमच्या कार्याची प्रशंसा केली. हे महत्त्वपूर्ण कार्य असल्याचे ते म्हणाले.- रत्नदीप वानखडे, अध्यक्ष, हेल्प फाऊंडेशन, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती