शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम प्रक्रियेतून दिला दुर्मिळ बिनविषारी सापांना जन्म, भारतातील पहिलाच प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 14:54 IST

भारतातून केवळ महाराष्ट्रात क्वचितच भागात आढळणारा पिवळ्या ठिपक्याचा कवड्या बिनविषारी सापाच्या अंडी कृत्रिमरीत्या उबवून पिलांना जन्म दिला. हा प्रकार अमरावती येथील सर्पमित्रांनी १० जून रोजी केला.

- इंदल चव्हाण

अमरावती : भारतातून केवळ महाराष्ट्रात क्वचितच भागात आढळणारा पिवळ्या ठिपक्याचा कवड्या बिनविषारी सापाच्या अंडी कृत्रिमरीत्या उबवून पिलांना जन्म दिला. हा प्रकार अमरावती येथील सर्पमित्रांनी १० जून रोजी केला. दोन दिवसांनंतर वनाधिका-यांच्या समक्ष त्यांना जंगलात सोडण्यात आले. भारतातील हा पहिलाच प्रयोग असल्याची प्रतिक्रिया उपवनसंरक्षकांनी दिली.दोन महिन्यांपूर्वी पिवळ्या ठिपक्याचा कवड्या अतिशय दुर्मिळ असलेला बिनविषारी साप अमरावतीतील नवसारी भागात आढळला. नागरिकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, तो थोडाफार जखमी झाला. साप पडण्यासंदर्भात हेल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष रत्नदीप वानखडे यांना कळविण्यात आले. सदस्य श्रीकांत गावंडे, शुभम गायकवाड, विक्की गावंडे यांनी घटनास्थळी जाऊन साप पकडला. त्या मादी सापाला घरी नेले. त्याच रात्री १६ एप्रिल २०१८ रोजी तिने चार अंडी दिली. त्यानंतर सात तेथून निघून गेला. त्यातील दोन अंडी अनमॅच्युअर निघाल्याने खराब झाल्या. उर्वरित दोन अंडींना सर्पतज्ज्ञांच्या मार्गदर्शनात ह्युमिडिटी बॉक्समध्ये ठेवण्यात आले. शिवाय अंड्यांना बुरशी लागू नये म्हणून हेल्प फाऊंडेशनचे सदस्य अक्षय होले, राम करूले, सुमेध गवई, पवन गायकवाड, उमंग सवाई, संदीप सोळंके आदींनी त्याच्या प्रजननाबद्दलची अचूक माहिती गोळा करून विशेष काळजी घेतली. साधारणत: २१ ते २४ डिग्री सेल्सिअस तापमान कायम राहण्यासाठी त्यांनी माती ओली करून ठेवली. ७ जून रोजी अंडी फुटून सापाचा जन्म झाला. त्यांना वनाधिकाºयांच्या मार्गदर्शनात जंगलात सोडण्यात आले. त्याप्रीत्यर्थ आरएफओंनी त्यांचा प्रोत्साहन दिले.

५१ दिवसांचा कालावधीपिवळ्या ठिपक्याचा कवड्या साप भारतात तसा दुर्मिळच. अंडी दिल्यानंतर तेथून साप निघून जाते. पुन्हा त्या अंडींकडे फिरकत नाही. मात्र, ती अंडी विशिष्ट तापमानात रहावी, याचे भान ठेवूनच ती अंडी घालतात. ती अंडी ५१ दिवसांपर्यंत उबवली जाते. त्यानंतर त्यातून पिलं बाहेर पडते. त्यानंतर तो पिलू स्वत:चे भक्ष्य स्वत:च टिपतो. त्यामुळे त्याला मातेच्या सहकार्याची गरज भासत नाही. जानेवारी ते मार्च प्रजनन काळहा सात महाराष्ट्रातील काही भागातच आस्रढळत असून, त्यांचा प्रजनन काळ जानेवारी ते मार्च दरम्यान राहतो. मार्चमध्ये अंडी घालून ते ४८ दिवसांपर्यंत उबवण्याची प्रक्रिया होते. त्यानंतर ५१ दिवसांनी म्हणजेच जूनच्या पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात पिल बाहेर येतात.हा साप नवसारी भागातून ताब्यात घेतला. त्याने दिलेली अंडी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात विशिष्ट तापमानात ठेवली व काळजी घेतली. पिलू बाहेर येताच उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांना कळविले. त्यांनी आमच्या कार्याची प्रशंसा केली. हे महत्त्वपूर्ण कार्य असल्याचे ते म्हणाले.- रत्नदीप वानखडे, अध्यक्ष, हेल्प फाऊंडेशन, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती