शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बर्ड फ्लूचे सावट, यंत्रणा बेसावध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 01:36 IST

जिल्ह्यातील काही पोल्ट्री फार्म व्यवसायीकांजवळील कोंबड्याचे संशयास्पद मृत्यू होत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. मात्र, व्यवसायीकांनी चुप्पी साधल्यामुळे कोंबड्यांच्या मृत्यूचे निश्चित कारण बाहेर येत नसल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देकोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू : पोल्ट्री व्यावसायिकांची चुप्पी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील काही पोल्ट्री फार्म व्यवसायीकांजवळील कोंबड्याचे संशयास्पद मृत्यू होत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. मात्र, व्यवसायीकांनी चुप्पी साधल्यामुळे कोंबड्यांच्या मृत्यूचे निश्चित कारण बाहेर येत नसल्याचे दिसून येत आहे. पोल्टी फार्म व्यवसायीकांनी बर्ड फ्ल्यूचा संशय व्यक्त केला आहे. मात्र, अधिकृत तक्रार केली जात नसल्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून दखल घेतली जात नसल्याचे दिसून येते.अंजनगाव बारी परिसरातील एका युवा शेतकरी व पोल्ट्री फार्म व्यावसायिकाने नाव न छापण्याच्या अटीवर कोंबड्यांचा मृत्यू होत असल्याची माहिती दिली. सुमारे दीड हजार कोंबड्यांचे मृत्यू झाल्यामुळे तो युवा शेतकरी चिंतातुर झाला. मात्र, अन्य कोंबड्या सहीसलामत असल्यामुळे दिलासासदा मिळाला आहे. अंजनगाव बारीप्रमाणे जिल्ह्यातील अन्य ठिकाणीसुद्धा कोबंड्यांचे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप शेतकऱ्यांकडून अधिकृत तक्रार न झाल्यामुळे कोबंड्या दगावल्याची माहिती दडपली जात आहे. बर्ड फ्ल्यू हा घातक आजार असून तो कोबंड्याच्या संपर्कातील मानवापर्यंत पोहोचू शकतो. या मृत्यूमुळे पोल्ट्री फार्म व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोंबड्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पशुसंवर्धन विभागानेच पाऊल उचलावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे.कंपन्यांकडून मोबदला घेण्यासाठीचा प्रकारपोल्ट्री फार्म व्यावसायिक ज्या कंपन्यांकडून कोबंड्यांची खरेदी करतात, त्यांच्याकडून दगावलेल्या कोंबड्यांचा मोबदला मिळतो. सोबतच कोंबड्यांना खाद्यसुद्धा कंपनीकडून पुरविले जाते. त्यामुळे काही वेगळ्या कारणास्तव जर कोंबड्यांचा मृत्यू होत असेल, तर कंपनीकडून भरपाई दिली जाते. कंपनीची बदनामी होऊ नये व मोबदला मिळत राहावा, या दृष्टीने पोल्टी फार्म व्यावसायिक पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे.शीतलहरीने मरतात कोंबड्यापोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांच्या पालनपोषणात काही कमतरता असल्यास कोंबड्या मरू शकतात. थंड वाºयाचा प्रभावात तापमान कमी-अधिक झाल्यासही कोंबड्या दगावू शकतात, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त आर.एस.पेठे यांनी दिली.जंगलात फेकतात मृत कोंबड्यापोल्ट्री फार्ममध्ये दगावलेल्या कोंबड्यांना शेताच्या धुऱ्यावर किंवा जंगलात फेकल्यास मानवी आरोग्यास धोका पोहोचू शकते. मृत कोबंड्या १० फुटापर्यंत खड्यात पुरणे आवश्यक आहे. मात्र, अनेक ठिकाणी पोल्ट्री फार्ममधील मृत कोंबड्यांना उघड्यावर फेकल्या जात असल्याचे दिसून आले आहे.शवविच्छेदनानंतरच कारण होईल स्पष्टकोंबड्या मृत्यूचे निश्चित कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होऊ शकत असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी सांगत आहे. ज्या शेतकºयांच्या कोंबड्या दगावत आहे, त्यांनी अधिकृत तक्रार करावी किंवा कोंबड्यांच्या शवविच्छेदनासाठी पुढे येण्याची तयारी दर्शवावी, असे आवाहन पशसंवर्धन अधिकाऱ्यांनी केले आहे. मृत पावलेल्या कोंबड्यांचे प्रयोगशाळेत शवविच्छेदन केल्यानंतरच दगावल्याचे कारण स्पष्ट होईल.सोशल मीडियावर अफवाबर्ड फ्ल्यूने कोंबड्यांचा मृत्यू होत असून कुणीही त्यांचे मास खाऊ नये, असा इशारा देत काही छायाचित्रे सोशल मीडियावर पसरविले जात आहे. ही अफवा असून बर्ड फ्लूविषयी कोणतीही बाब अद्याप पुढे आली नसल्याची ग्वाही पशुसंर्वधन अधिकारी देत आहे. सोशल मीडियावरील छायाचित्रे व इशारा ही केवळ अफवा असल्याची माहिती विभागाच्या आयुक्तांनी दिली आहे.