शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

आत्महत्या रोखण्यासाठी ‘बळीराजा चेतना अभियान’

By admin | Updated: July 28, 2015 00:27 IST

तीन वर्षांपासून नापिकीचे सत्र आणि दुष्काळ शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला आहे.

महसूल विभागाचा निर्णय : शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी उपक्रमअमरावती : तीन वर्षांपासून नापिकीचे सत्र आणि दुष्काळ शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला आहे. उत्पादन खर्च अधिक आणि उत्पन्न कमी या विरोधाभासामुळे कर्ज वाढते. परिणामी विदर्भ व मराठवाड्यात नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी जिल्हास्तरावर ‘बळीराजा चेतना अभियान’ राबविण्याचा निर्णय राज्याच्या महसूल विभागाने शुक्रवारी घेतला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शासनस्तरावरून अनेक उपक्रम वेळोवेळी राबवीत असताना शासन यंत्रणेला यश आलेले नाही. यासाठी शासनाने विशेष मदतीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. नैराश्य आलेल्या शेतकऱ्यांची आत्महत्येची मानसिकता घालवून त्यांचे मनोबल उंचावण्याकरिता ‘बळीराजा चेतना अभियान’ राबविण्यात येणार आहे. सुरुवातीला यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात हा प्रयोग राबविण्यात येईल व नंतर हे अभियान राज्यभर राबविण्यात येणार आहे. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून शासन हा उपक्रम राबविणार आहे.या अभियानांतर्गत त्रस्त शेतकरी कुटुंब ओळखण्यासाठी ग्रामस्तरीय समितीमार्फत सर्वेक्षण करून शेतकऱ्यांची यादी बनविण्यात येणार आहेत. त्यांना शेतीविषयक शासकीय योजना तसेच कमी खर्चाच्या कोरडवाहू शेतीबाबत माहिती देण्यात येईल. सामूहिक विवाहाचे महत्त्व, व्यसनमुक्तीबाबत भजन, कीर्तने व पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. त्रस्त शेतकरी कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे समुपदेशनही करण्यात येणार आहे. बहुतांश शेतकरी कुटुंबांनी या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)लोकमतशुभवर्तमान