शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बिल्दोरी पुलाची समस्या निकाली

By admin | Updated: July 24, 2016 00:03 IST

तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर-अंजनसिंगी मार्गावरील बिल्दोरी पुलाची समस्या निकाली निघाली आहे.

वाहतुकीसाठी खुला : एकाच परिवारातील चौघांचा घेतला होता बळीअमरावती : तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर-अंजनसिंगी मार्गावरील बिल्दोरी पुलाची समस्या निकाली निघाली आहे. या आठवड्यात हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या नाल्यावर पूल नसल्याने ४ आॅगस्ट २०१५ रोजी नाल्याच्या पुरात यवतमाळ येथील आजनकर परिवारातील ४ जणांचा बळी गेला. तत्कालीन विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर व आ. यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे ही समस्या मार्गी लागली आहे. गतवर्षी ५ व ६ आॅगस्ट रोजी जिल्ह्यासह तिवसा तालुक्यात अतिवृष्टी झाली होती व उर्ध्व वर्धा धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने वर्धा नदीला पूर आला होता. त्यात हा अपघात घडला होता.युद्धस्तरावर कामाचे आदेशअमरावती : असलेला बिल्दोरी नाल्याचे पाणी थोपविल्यामुळे कौंडण्यपूर ते अंजनसिंगी हा मार्ग बंद होता. ६ आॅगस्ट रोजी वळणावर व खोलगट भागात असलेल्या या नाल्यावरील पुलावर किती पाणी आहे याचा अंदाज न आल्यामुळे यवतमाळ येथून आर्वी येथे लग्नाला निघालेल्या आजनकर परिवारातील ४ सदस्य असलेली कार ६ आॅगस्टला पुरात फसली व यामध्ये सर्वांचा दुर्दैवी अंत झाला होता. ‘हे तर प्रशासनाचेच नरबळी’ या अर्थाने ‘लोकमत’ने ही समस्या लावून धरली होती. तत्कालीन विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी ही जीवघेणी समस्या गांभीर्याने घेऊन या पुलासाठी निधी तत्काळ उपलब्ध करण्याचे आदेश सिंचन महामंडळाला व त्वरीत निविदा काढण्याचे आदेश विशेष प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला दिले होते. या कामाचा कार्यारंभ २९ आॅक्टोबर २०१५ रोजी काढण्यात आला व आठ महिन्याच्या अवधीत हे काम पूर्ण करण्यात आले. मुख्य अभियंता सी. व्ही. लुंगे यांनी सातत्याने या कामाचा आढावा घेतला. कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, उपअभियंता दिनकर माहुरे यांच्या मार्गदर्शनात ५ कोटी १४ लाख रुपयांच्या या भव्य पुलाचे काम अल्पावधीत पूर्ण करण्यात आले व हा पूल नागरिकांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. युद्धस्तरावर काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेशएकाच परिवारातील चार निष्पापांचा बळी घेणाऱ्या या बिल्दोरी पुलाचे काम युद्धस्तर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश होते. पालकमंत्री प्रवीण पोटे व आ. यशोमती ठाकूर यांनीदेखील ही समस्या मार्गी लागावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर ९ महिन्यांच्या कालावधीत ही समस्या मार्गी लागली आहे. चार व्यक्तींचा करूण अंत होणे ही दुर्दैवी घटना होती. असे प्रसंग पुन्हा घडू नयेत यासाठी स्वत: जातीने लक्ष घातले. प्रशासनाच्या सर्व विभागाच्या मदतीने काम पूर्ण झाले याचा आनंद आहे.- ज्ञानेश्वर राजूरकर,माजी विभागीय आयुक्त.