शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
3
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
4
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
5
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
6
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
7
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
9
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
10
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
11
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
12
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
13
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
14
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
15
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
16
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
17
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
18
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
19
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
20
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी

नुकसान मोठे, पंचनामे खोटे

By admin | Updated: March 10, 2016 00:26 IST

जिल्ह्यात २७ फेब्रुवारीपासून वादळी पाऊस व गारपिटीने कहर केला. निसर्गाचे हे थैमान ६ मार्चपर्यंत सुरू होते.

अमरावती : जिल्ह्यात २७ फेब्रुवारीपासून वादळी पाऊस व गारपिटीने कहर केला. निसर्गाचे हे थैमान ६ मार्चपर्यंत सुरू होते. यामध्ये किमान २४ हजार ११५ क्षेत्रामधील फळ व शेतीपिकांच्या नुकसानीचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. शासनाने आता ३३ टक्क्यांवरील नुकसानग्रस्त पिकेच बाधित असल्याचा निकष ठरविलेला आहे. वास्तविक आपत्तीप्रवण क्षेत्रातील सरसकट पिकांचा बाधित क्षेत्रात समावेश होणे महत्त्वाचे असताना अनेक ठिकाणी तसे झालेले नाही त्यामुळे मदतीपासून अनेक शेतकरी वंचित राहू शकतात.जिल्ह्यात चार दिवसांत २४ हजारांवर क्षेत्राची हानी झाली. वीज पडून ३ व्यक्ती दगावल्या तर लहान-मोठ्या ६ गुरांचा मृत्यू झाला. जिल्हा प्रशासनाने तत्काळ प्राथमिक सर्वेक्षणाचे निर्देश दिले. मात्र, गावस्तरावरील यंत्रणेने कागदी घोडेच नाचविले. तिवसा तालुक्यातील १० गावांचे नुकसान झाले असताना केवळ दोन गावांमधील ८४ हेक्टर शेतीपिकांच्या नुकसानीचा अहवाल महसूल विभागाने दिला. मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असूनही महसूल यंत्रणा कमी नुकसान दाखवित असल्यामुळे राजकीय पक्षांनी फेरसर्वेक्षण करण्याची मागणीकेली आहे. पारदर्शी व वस्तुनिष्ठ सर्वेक्षणानुसार अंतिम अहवालात नोंद न झाल्यास भरपाईपासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे.