शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

सरळसेवेतील आरएफओंच्या बढतीमागे मोठे अर्थकारण? उच्च न्यायालयातील याचिका दुर्लक्षित

By गणेश वासनिक | Updated: March 10, 2024 18:48 IST

राज्यात १७५ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना सहायक वनसंरक्षक पदावर बढती देण्याकरिता महसूल विभाग वाटप करण्यात आले आहे.

अमरावती: राज्यात १७५ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना सहायक वनसंरक्षक पदावर बढती देण्याकरिता महसूल विभाग वाटप करण्यात आले आहे. मात्र, सहायक वनसंरक्षकांच्या पदोन्नतीला ‘ब्रेक’ लागण्याची दाट शक्यता असून, ही बढती रोखण्यासाठी खासदार-आमदार पुढे सरसावले आहेत. कारण आरएफओंचा १८ महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी हा सेवेत धरण्यात आल्यामुळे अनेकांना ५ वर्षांत बढती मिळेल, तर इतरांवर अन्याय होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.राज्याच्या वन विभागात सन २०१६ मध्ये सरळसेवेने दाखल झालेल्या १६४ आरएफओंना महाराष्ट्र, उत्तराखंड, आसाम येथे १८ महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. तर त्यानंतर ५५ प्राप्त उमेदवारांना कोईम्बतूर, दार्जिलिंग येथे प्रशिक्षणास पाठवले होते. 

या आरएफओंना १८ महिन्यांचा सेवा कालावधी गृहित धरून २१९ जणांना सहायक वनसंरक्षक पदावर बढती दिली जात असल्याने वन विभागात असंतोष निर्माण झाला आहे. यासंदर्भात सहायक वनसंरक्षक प्रशिक्षण कालावधी सेवा गृहित धरण्याकरिता न्यायालयात गेलेले असताना न्यायालयाने याचिका फेटाळून प्रशिक्षण काळ हा सेवाकाळ म्हणून ग्राह्य धरण्यास नकार दिलेला आहे. परंतु, असे असताना राज्यात २४९ आरएफओंना बढती देताना प्रशिक्षण कालावधी सेवाकाळात धरण्यात येत असल्याने पदोन्नत आरएफओंवर याचा प्रभाव पडलेला आहे. आनंद गायेंके यांनी या प्रकरणी संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात रिट पिटीशन क्रमांक ३५१८/२०२० ही दाखल असताना आरएफओंना पदोन्नती देण्याचा घाट रचला जात आहे. आर्थिक उलाढालीची शक्यता?आरएफओंना बढती देताना १८ महिन्यांआ प्रशिक्षण कालावधी हा सेवाकाळात धरण्यात आल्यामुळे सरळसेवेतील २१९ आरएफओंना पदोन्नतीचा लवकरच लाभ मिळणार आहे. सेवाकाळ कालावधी गृहित धरावा, यासाठी काहींनी थेट मंत्रालयात ‘फिल्डिंग’ लावली असून, प्रशिक्षणाचा काळ सेवाकाळात बदल करण्यासाठी लक्ष्मीदर्शन जोरात सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे. वनपालांना एक वर्षाचे प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांचा सेवाकाळ गृहित धरला यात नाही. मात्र, सरळसेवेतील आरएफओंना वेगळी नियमावली लावण्यात येत असल्यामुळे शंका उपस्थित होत आहे. खासदार, आमदारांनीही दिले पत्र सरळसेवेतील आरएफओंना १८ महिन्यांचे प्रशिक्षण कालावधी हा सेवाकाळ ग्राह्य मानून सहायक वनसंरक्षक पदावर बढती देण्यासाठी वनविभागाने अंंतिम टप्पा गाठला आहे. मात्र, ही बाब नियमबाह्य असल्याप्रकरणी याविरोधात खा. डॉ अनिल बोंडे, आ. बच्चू कडू, आ. रवी राणा, आ. प्रताप अडसड, आ. देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री, वनमंत्र्यांना पत्राद्वारे ही बढती थांबविण्याची मागणी केली आहे. सेवा ज्येष्ठता डावलून केवळ ५ वर्षे सेवा झालेल्या आरएफओंना बढती देण्याचा कुटील डाव वनविभागाने घातला असला तरी लोकप्रतिनिधींनी याबाबत आवाज उठवला आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती