शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

२०० जणांच्या उपस्थितीत होऊद्या आता शुभमंगल सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 05:01 IST

आता संक्रमण ओसरत असल्याचे पाहून सोमवारी महाराष्ट्र शासनाने अनेक निर्बंध शिथिल केले असल्यामुळे लग्नसोहळ्यांकरिता हॉल, लॉन्स व पटांगणातील क्षमतेच्या २५ टक्के वा जास्तीत जास्त २०० आमंत्रितांना परवानगी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे मंगल कार्यालये व नियोजित विवाह सोहळे असलेल्या कुटुंबीयांमध्ये उत्साह संचारला आहे.

मनीष तसरे लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दोन वर्षापासून सततच्या निर्बंधांमुळे लग्नसोहळ्यावर विरजण पडले होते. त्यातच लग्नसोहळ्यावर विसंबून असणाऱ्या व्यावसायिकांचेसुध्दा व्यवसाय डबघाईस आले होते. काेरोना संक्रमणाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या निर्बंधांमुळे मंगल कार्यालय, लॉन्सचा व्यवसाय पूर्णत: चौपट झाला आहे. थोडी उसंत मिळताच संक्रमणाचा वेग वाढल्यामुळे शासनाला नाईलाजाने पुन्हा निर्बंध लावावे लागले. त्यामुळे मंगल कार्यालय व्यावसायिकांवर पुन्हा संकट ओढावले होते.आता संक्रमण ओसरत असल्याचे पाहून सोमवारी महाराष्ट्र शासनाने अनेक निर्बंध शिथिल केले असल्यामुळे लग्नसोहळ्यांकरिता हॉल, लॉन्स व पटांगणातील क्षमतेच्या २५ टक्के वा जास्तीत जास्त २०० आमंत्रितांना परवानगी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे मंगल कार्यालये व नियोजित विवाह सोहळे असलेल्या कुटुंबीयांमध्ये उत्साह संचारला आहे. नातेवाईकांना सोयीचे होईल अशा ठिकाणी विवाह सोहळ्याचे आयोजन करता येणार असल्याने लग्न समारंभात उत्साह दिसून येणार आहे. 

फेब्रुवारीतील लग्नाचे मुहूर्त फेब्रुवारी — ५,६,७,१०, १६,१७,२१, २४,२५,२८मार्च — १४,२३,२५,२६,२८,२९

वधू-वर पित्यांची चिंता मिटलीलग्नात नातेवाइकांना बोलावले तर आनंद वाटतो, मात्र निर्बंधामुळे आम्हाला चिंता वाटायला लागली होती. मात्र आता सूट मिळाल्याने बरे झाले. - रमेश तायडे (वधूपिता ) 

निर्बंधामुळे ५० लोकांमध्ये लग्न कसे करायचे हाच प्रश्न आम्हाला पडला होता. कुणाला बोलावयाचे कुणाला नाही याचे गणितच जुळत नव्हते. आता २०० लोकांची परवानगी मिळाल्याने बरे झाले आहे. -प्रकाश गतफणे, (वरपिता )  

मंगल कार्यालयात २५ टक्के अथवा २०० जण महाराष्ट्रातील संक्रमण ओसरत असल्याने शासनाने सोमवारी अनेक निर्बंध शिथिल केले असून,लग्नसोहळ्यांना हॉल,लॉन्स व पटागंणातील क्षमतेच्या २५ टक्के वा जास्तीत जास्त २०० आमंत्रितांना परवानगी जाहीर केली आहे.

गेल्या दोन वर्षापासून मंगल कार्यालय व्यावसायिकांवर फार वाईट दिवस आले आहे. ५० लोकांमध्ये लग्न सोहळा पार पाडतांना बऱ्याच लोकांनी मंगल कार्यालयाकडे येऊनसुध्दा पाहिले नाही, आता निर्बंध हटविल्याने लोक मंगल कार्यालयात येऊन लग्न करतील.-आकाश  देशमुख,  (मंगल कार्यालय संचालक)  

विवाह सोहळ्यांच्या आयोजनावर ज्यांचे रोजगार होते, त्यांच्यावर गेल्या दोन वर्षात अत्यंत वाईट दिवस आले आहेत. निर्बंधांमुळे व्यवसाय बुडाले नाही. आता निर्बंध हटल्यामुळे व्यवसाय होतील, अशी अपेक्षा आहे. -अमोल देशमुख,  (मंगल कार्यालय चालक)  

 

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या