शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

२०० जणांच्या उपस्थितीत होऊद्या आता शुभमंगल सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 05:01 IST

आता संक्रमण ओसरत असल्याचे पाहून सोमवारी महाराष्ट्र शासनाने अनेक निर्बंध शिथिल केले असल्यामुळे लग्नसोहळ्यांकरिता हॉल, लॉन्स व पटांगणातील क्षमतेच्या २५ टक्के वा जास्तीत जास्त २०० आमंत्रितांना परवानगी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे मंगल कार्यालये व नियोजित विवाह सोहळे असलेल्या कुटुंबीयांमध्ये उत्साह संचारला आहे.

मनीष तसरे लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दोन वर्षापासून सततच्या निर्बंधांमुळे लग्नसोहळ्यावर विरजण पडले होते. त्यातच लग्नसोहळ्यावर विसंबून असणाऱ्या व्यावसायिकांचेसुध्दा व्यवसाय डबघाईस आले होते. काेरोना संक्रमणाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या निर्बंधांमुळे मंगल कार्यालय, लॉन्सचा व्यवसाय पूर्णत: चौपट झाला आहे. थोडी उसंत मिळताच संक्रमणाचा वेग वाढल्यामुळे शासनाला नाईलाजाने पुन्हा निर्बंध लावावे लागले. त्यामुळे मंगल कार्यालय व्यावसायिकांवर पुन्हा संकट ओढावले होते.आता संक्रमण ओसरत असल्याचे पाहून सोमवारी महाराष्ट्र शासनाने अनेक निर्बंध शिथिल केले असल्यामुळे लग्नसोहळ्यांकरिता हॉल, लॉन्स व पटांगणातील क्षमतेच्या २५ टक्के वा जास्तीत जास्त २०० आमंत्रितांना परवानगी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे मंगल कार्यालये व नियोजित विवाह सोहळे असलेल्या कुटुंबीयांमध्ये उत्साह संचारला आहे. नातेवाईकांना सोयीचे होईल अशा ठिकाणी विवाह सोहळ्याचे आयोजन करता येणार असल्याने लग्न समारंभात उत्साह दिसून येणार आहे. 

फेब्रुवारीतील लग्नाचे मुहूर्त फेब्रुवारी — ५,६,७,१०, १६,१७,२१, २४,२५,२८मार्च — १४,२३,२५,२६,२८,२९

वधू-वर पित्यांची चिंता मिटलीलग्नात नातेवाइकांना बोलावले तर आनंद वाटतो, मात्र निर्बंधामुळे आम्हाला चिंता वाटायला लागली होती. मात्र आता सूट मिळाल्याने बरे झाले. - रमेश तायडे (वधूपिता ) 

निर्बंधामुळे ५० लोकांमध्ये लग्न कसे करायचे हाच प्रश्न आम्हाला पडला होता. कुणाला बोलावयाचे कुणाला नाही याचे गणितच जुळत नव्हते. आता २०० लोकांची परवानगी मिळाल्याने बरे झाले आहे. -प्रकाश गतफणे, (वरपिता )  

मंगल कार्यालयात २५ टक्के अथवा २०० जण महाराष्ट्रातील संक्रमण ओसरत असल्याने शासनाने सोमवारी अनेक निर्बंध शिथिल केले असून,लग्नसोहळ्यांना हॉल,लॉन्स व पटागंणातील क्षमतेच्या २५ टक्के वा जास्तीत जास्त २०० आमंत्रितांना परवानगी जाहीर केली आहे.

गेल्या दोन वर्षापासून मंगल कार्यालय व्यावसायिकांवर फार वाईट दिवस आले आहे. ५० लोकांमध्ये लग्न सोहळा पार पाडतांना बऱ्याच लोकांनी मंगल कार्यालयाकडे येऊनसुध्दा पाहिले नाही, आता निर्बंध हटविल्याने लोक मंगल कार्यालयात येऊन लग्न करतील.-आकाश  देशमुख,  (मंगल कार्यालय संचालक)  

विवाह सोहळ्यांच्या आयोजनावर ज्यांचे रोजगार होते, त्यांच्यावर गेल्या दोन वर्षात अत्यंत वाईट दिवस आले आहेत. निर्बंधांमुळे व्यवसाय बुडाले नाही. आता निर्बंध हटल्यामुळे व्यवसाय होतील, अशी अपेक्षा आहे. -अमोल देशमुख,  (मंगल कार्यालय चालक)  

 

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या