शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सावधान... विजेपुढे चुकीला क्षमा नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:07 IST

तापमान वाढल्याने कूलरचा वापर सुरू झाला आहे. पाण्यातून वीज प्रवाहित होऊ शकते. अशा वेळी विजेपुढे चुकेला क्षमा नाही, हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे कूलर लावताना तसेच त्यात पाणी भरताना सुरक्षेची योग्य खबरदारी घणे महत्त्वाचे ठरते.

ठळक मुद्देमहावितरणचे आवाहन : निष्काळजीपणामुळे जीव जाऊ शकतो

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तापमान वाढल्याने कूलरचा वापर सुरू झाला आहे. पाण्यातून वीज प्रवाहित होऊ शकते. अशा वेळी विजेपुढे चुकेला क्षमा नाही, हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे कूलर लावताना तसेच त्यात पाणी भरताना सुरक्षेची योग्य खबरदारी घणे महत्त्वाचे ठरते.कधी कूलरजवळ खेळताना विजेचा धक्का बसल्याने, तर कधी टुल्लू पंप सुरू करतेवेळी विजेचा शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना सातत्याने घडतात. यांसारखे अनेक अपघात उन्हाळ्याच्या दिवसांत होतात. ते टाळण्यासाठी ग्राहकांनी कूलरचा वापर सदैव थ्री-पीन प्लगवरच करावा. घरात अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर्स बसवून घ्यावे. बाजारात हे उपकरण सहजरीत्या उपलब्ध आहे. विजेचा धक्का बसताच या उपकरणामुळे वीज प्रवाह खंडित होऊन पुढील अनर्थ टाळता येतो तसेच घरातील अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करून घ्यावी.कूलरच्या लोखंडी बाह्यभागात वीजपुरवठा येऊ नये, याकरिता कूलरचा थेट जमिनीसोबत संपर्क येईल अशी व्यवस्था करावी, जेणेकरून कूलरच्या लोखंडी बाह्यभागात वीज प्रवाहित झाल्यास त्याचा धक्का लागणार नाही. कूलरमध्ये पाणी भरतेवेळी आधी कूलरचा वीज प्रवाह बंद करून प्लग काढावा व त्यानंतरच त्यात पाणी भरावे. कूलरच्या आतील वीज तार पाण्यात बुडालेली नसल्याची खात्री करून घ्यावी. कूलरमधील पाणी खाली जमिनीवर सांडणार नाही याची काळजी घ्यावी. अशाप्रकारे वीज प्रवाहाच्या संपर्कापासून मुक्त राहता येईल, असे महावितरणच्या अमरावती परिमंडळाने कळविले आहे.ओल्या हाताने स्पर्श टाळावाओल्या हाताने कूलरला स्पर्श करू नये. कूलरची वायर सदैव तपासून बघावी. फायबर बाह्यभाग असलेल्या व चांगल्या प्रतीच्या कूलरचा वापर प्राधान्याने करणे महत्त्वाचे आहे. घरातील मुले व इतर सदस्य कूलरच्या सान्निध्यात येणार नाही, याची खबरदारी घेऊनच कूलर ठेवण्यात यावा.पंपातून पाणी येत नसेल, तर वीजपुरवठा आधी बंद करून प्लग काढल्यानंतरच पंपाला हात लावावा. पंप पाण्यात बुडला नसल्याची खात्री करून घ्यावी. पंपाला वीज पुरवठा करणारी वायर पाण्यात बुडाली नसावी. पंपाचे अर्थिंग योग्य असल्याचे तपासून घ्यावे. पंपातून नळ वाहिनीत वीज प्रवाहित होणार नसल्याची काळजी घ्यावी.