शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

सोफियाकडून विश्वासघात, शेतकरी देशोधडीला

By admin | Updated: March 28, 2016 00:02 IST

जिल्ह्यातील ५८ हजार एकर सिंचनाचे पाणी बेमालुमपणे पळविणाऱ्या ‘सोफिया’च्या व्यवस्थापनाचा ‘बनेलपणा’ आता ग्रामस्थांना पदोपदी जाणवू लागला आहे.

जमीन कसायची कशी ? : वाघोली-माहुली ग्रामस्थांचा सवालप्रदीप भाकरे अमरावतीजिल्ह्यातील ५८ हजार एकर सिंचनाचे पाणी बेमालुमपणे पळविणाऱ्या ‘सोफिया’च्या व्यवस्थापनाचा ‘बनेलपणा’ आता ग्रामस्थांना पदोपदी जाणवू लागला आहे. सामाजिक बांधिलकीचा भंपक दावा करणाऱ्या सोफियाच्या विश्वासघातामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. हक्काच्या जमिनीचे सोफियामुळे दोन फाड झालेत. आता ही जमीन कसायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर ‘आ’वासून उभा आहे. नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीमध्ये वाघोलीजवळ सोफिया औष्णिक विद्युत प्रकल्प आकारास आला. हळूहळू याचे दुष्परिणाम ग्रामस्थांना जाणवू लागले असून आता करायचे तरी काय, असा प्रश्न निर्माण झालाय.रेल्वे ट्रॅकमुळे शेती विभागलीअमरावती : सोफिया औष्णिक विद्युत प्रकल्पाला कोळसा पुरविण्यासाठी वाघोली ते वलगाव रेल्वे ट्रॅक बनविण्यात आला. प्रकल्पस्थळापासून ट्रॅकच्या सभोवतालची जमीन संपादित करण्यात आली. मात्र, ज्यांची शेती या रेल्वे ट्रॅकने विभागली गेली त्यांची मोठी ससेहोलपट झाली आहे. या ट्रॅकमुळे अलीकडच्या शेतीत तब्बल ३ किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते. त्यामुळे शेतजमीन कसायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. वहिवाटीचा रस्ता बंदरेल्वेगेट आणि ट्रॅकला चहुबाजूने काटेरी कुंपण घालण्यात आल्याने रस्ता बंद झाला आहे. फेन्सिंग टाकल्याने पलीकडच्या शेतीत या शेतकऱ्यांना पायदळदेखील जाता येत नाही. अगदी गावानजीक असलेल्या शेतशिवारात वाघोली ते माहुली किंवा अन्य मार्गाने तीन किलोमीटरचा वळसा घालून जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे बैलजोडी, ट्रॅक्टर शेतापर्यंत पोहोचत नाहीत. तूर असो वा कापूस डोक्यावरून वाहून आणावा लागतो. १०० एकर शेत बाधितसोफियाच्या रेल्वे ट्रॅकच्या अलीकडे आणि पलीकडे वाघोली आणि माहुली जहांगीर येथील ग्रामस्थांची १०० एकरपेक्षा अधिक जमीन आहे. ही जमीन रेल्वे ट्रॅकमुळे विभागले गेल्याने ‘सब-वे’ मध्ये पाणी भरल्याने ही जमीन कशी करायची, असा प्रश्न येथील ग्रामस्थांनी ‘लोकमत’कडे उपस्थित केला. सोफिया रेल्वे ट्रॅकपलीकडे सहा एकर ओलिताची शेती आहे. कुंपण भिंतीचा अडसर आणि ‘सब-वे’ मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेती करायची अशी, हा प्रश्नच असून तीन किलोमीटरचा वळसा घेऊनही शेतापर्यंत बैलगाडी पोहोचत नाही.- सुधाकर हरडे, शेतकरी, वाघोली‘सब-वे’ गेला पाण्यातवाघोली ग्रामस्थांना त्यांच्या शेतात जाता यावे, यासाठी रेल्वे ट्रॅकखालून ‘सब-वे’ बनविण्यात आला. मात्र, या रस्त्याची १० ते १२ फुटाची खोली लक्षात घेता बैलबंडी वा अन्य वाहतूक कशी होणार होती, हा संशोधनाचा विषय होता. मात्र, तत्पूर्वी या ‘सब-वे’मध्ये तूर्तास ८ ते १० फूट पाणी साचल्याने हा मार्ग शेतकऱ्यांसाठी बंद आहे. वाघोली येथील रामू खंडारे आणि शुभम राठोड या तरुणांनी धाडस करुन पाण्याची खोली दाखविली. सोफिया प्रकल्पातून बाहेर पडणारे लाखो लिटर पाणी शेतकऱ्यांसाठी बनविलेल्या या ‘सब-वे’ मध्ये साचल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. उगाच या ‘सब-वे’ चे ढोंग कशाला रचले? असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.