शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

लागवडीच्या कांद्याला२० वर्षातील सर्वाधिक भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 01:09 IST

जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या उन्हाळी पांढºया कांद्याला शनिवारी २० वर्षांतील उच्चांकी दर मिळाला. चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटल १००० ते १३०० रुपये भाव मिळाल्याचे कांदा व्यापारी सतीश कावरे यांनी सांगितले.

ठळक मुद्देउत्पादकांना दिलासा । १००० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल

संदीप मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या उन्हाळी पांढºया कांद्याला शनिवारी २० वर्षांतील उच्चांकी दर मिळाला. चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटल १००० ते १३०० रुपये भाव मिळाल्याचे कांदा व्यापारी सतीश कावरे यांनी सांगितले. रोपांच्या लागवडीपासून तयार केल्या जाणाºया कांद्यासाठी हा दर देण्यात आला.ट्रॅक्टरने किंवा हाताने बी फेकून उत्पादित केलेला कांदा हा हलक्या प्रतीचा असतो. या कांद्याला अद्याप २०० ते ३०० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. लाला कांद्याला ४०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव आहे.जिल्ह्यातील अंजनगाव, परतवाडा, चांदूर रेल्वे, दर्यापूर, चांदूर बाजार, नांदगाव खंडेश्वर येथून अमरावतीच्या कृषिउत्पन्न बाजार समितीच्या भाजी बाजारात कांदा आणला जात असल्याची माहिती कावरे यांनी दिली. शेतकऱ्यांनी आणलेल्या कांद्याचा याच ठिकाणी लिलाव करण्यात येतो. काही वर्षांत एप्रिल महिन्यात येणाºया लागवडीच्या स्थानिक काद्यांला ३०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळायचे. यंदा मात्र पहिल्यांदाच प्रतिकिलो दहा रुपयांवर मिळाला आहे.रोपे उगवून पुन्हा लागवडीचा कांदा चांगल्या प्रतीचा मानला जातो. त्याचे उत्पादनसुद्धा चांगले होते. तो कांदा भरीव असतो. मात्र, ट्रॅक्टरने बी फेकून उगवलेला कांदा चांगल्या प्रतीचा येत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्याचे उत्पादनही कमी होते. त्याकारणाने शेतकºयांनी काद्यांची रोपे तयार करून त्यांची पेरपेरणी हातानी करावी असे तज्ज्ञांचे मत आहे.शहरात काद्यांचे दहा ठोक व्यापारी आहेत. त्यापैकी प्रत्येकी एका व्यापाºयाकडे रोज किमान ५०० ते १००० हजार क्विंटलपर्यंत काद्यांची खरेदी होते. कांद्याची आवक बºयापैकी असल्याचे सतीश कावरे यांनी सांगितले.गेल्या २० वर्षातील सर्वाधिक भाव यंदा उन्हाळी काद्यांला मिळाला आहे. सद्यस्थितीत चांगल्या प्रतीच्या कांद्याला १००० ते १३०० प्रतिक्विंटल भाव मिळाला असून, त्याकारणाने स्थानिक शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे.- सतीश कावरे, ठोक कांदा विक्रेता, अमरावती.हलक्या कांद्याची पावडरहलक्या प्रतीच्या व बियाणे फेकून उत्पादित झालेल्या कांद्याला भाव कमी मिळतो. लंबगोल असलेल्या या कांद्याला पोंगा असे म्हटले जाते. एक ते तीन रुपये किलोप्रमाणे त्या काद्यांची खरेदी केली जाते. त्या काद्यांला अंत्यंत कमी दरात खरेदी करून अमरावतीतून गुजरात राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या कंपन्यांमध्ये पावडर करण्यासाठी पाठविण्यात येत असल्याची माहिती आहे.कांदा आणणार डोळ्यांत पाणीयंदा कांद्याची आवक कमी झाली आहे. त्याकारणाने उन्हाळी काद्यांला चांगला भाव मिळाला आहे. या कांद्याच्या किमती पुढे वाढत जाऊन २० रुपये किलो स्तरावरदेखील जाऊ शकतात. त्याकारणाने कांद्याची साठवणूक करण्याकडे ठोक व किरकोळ व्यापाºयांचा कल आहे. किरकोळ व्यापारी हाच कांदा उत्पादन थांबल्यानंतर ४० रुपये किलो दराने विक्रीला काढतील. त्याकारणाने काद्यांमुळे वांदा होणार असून, कांदा लोकांच्या डोळ्यांत पाणी आणण्याची शक्यता असल्याचे कांदा व्यापाºयांचे मत आहे.खंडीचे व्यवहारदोन क्विंटल म्हणजे एक खंडी. या खंडीचा व्यवहार थेट शेतकरी व व्यापाºयांमध्ये होतो, मात्र केवळ शेतातच. शेतात कांद्याचे पीक तयार होताच हे व्यवहार करण्यात येतात. यामध्ये व्यापारी थेट शेतकºयांच्या शेतापर्यंत जातो. मात्र, बाजार समितीत खंडीचे व्यवहार होत नाहीत.

टॅग्स :onionकांदा