शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

जिल्ह्यात सर्वोत्तम विकासकामे

By admin | Updated: January 10, 2015 22:47 IST

अमरावती जिल्हा व विभागीय प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी विकास कामे करण्यास तत्पर आहे. त्यांची कामाची आवड व तयारी लक्षात घेता आगामी काळात अमरावती जिल्ह्यात

अमरावती : अमरावती जिल्हा व विभागीय प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी विकास कामे करण्यास तत्पर आहे. त्यांची कामाची आवड व तयारी लक्षात घेता आगामी काळात अमरावती जिल्ह्यात सर्वोत्तम विकास कामे होतील, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी व्यक्त केला. ना.पोटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, महापालिका आयुक्त अरुण डोंगरे, प्रकल्प अधिकारी संजय मीना, जिल्हा नियोजन अधिकारी काळे अन्य विभागप्रमुख उपस्थित होते. ना.पोटे यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाचा गौरव केला. जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याच्यादृष्टिने जिल्हा प्रशासनाने सुरु केलेला गाव मुक्काम कार्यक्रम प्रशंसनीय आहे. सन २०१४-१५ या वषार्तील खरीप हंगामा १९८१ गावात दुष्काळ जाहीर झाल्यामुळे शासनाकडून ३०२ कोटी रुपये दुष्काळ निधी मंजूर झाला. त्यापैकी १२५ कोटी रुपयांचे वाटप गाव पातळीवर होणार आहे. त्याचा शुभारंभ रविवार ११ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता चांदुर रेल्वे तालुक्यातील धनोडी येथे चावडी वाचनाचा कार्यक्रम होणार आहे. सर्व शेतकरी व ग्रामस्थांनी उपस्थित राहाण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सार्वजनिक हिताची बांधकामे तातडीने पूर्ण करावीत. विद्युत विभागाने बंद ट्रान्सफार्मर तातडीने दुरुस्त करावेत, शेतकऱ्यांची कोणतीही अडचण वा तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी जादा ट्रान्सफार्मर ठेवावेत. उद्योग विभागातील अधिकाऱ्यांनी पाच लक्ष ते पाच कोटी गुंतवणुकीच्या उद्योगांची यादी तयार करुन त्यातील उद्योगांच्या संधी तसेच उत्पादनाचा तपशील बेरोजगार युवकांच्या माहितीसाठी दर्शनीय भागात ठेवावा. योजनांची माहिती बेरोजगारांना तत्परतेने देण्यात यावी. आपणास सर्वांना घेऊन ग्राम पातळीपर्यंत शासनाच्या विकास योजना घेऊन जावयाच्या आहेत. उद्योगात महिलांना प्राधान्य देण्याच्या दृष्टिने उद्योग विभागातील अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. शहर सौंदर्यीकरणाच्या कामे जे लोक किंवा स्वयंसेवी संस्था इच्छूक असतील त्यांना निमंत्रित करुन नियोजन करावे, सध्या टंचाई परिस्थिती असून सर्व अधिकाऱ्यांनी गांभीर्याने आपापल्या विभागाची कामे पूर्ण करावीत, असेही ते म्हणाले.यावेळी पालकमंत्र्यांनी अंगणवाडी बांधकाम, रस्त्यांची पूर्ण झालेली व प्रगतीपथावरील कामे, सामूहिक विवाह, वैयक्तिक लाभाच्या योजना, ग्रामीण भागातील वाहतूक सुधारणा, नाला खोलीकरण, नदी खोलीकरणाची कामे, जलसंवर्धनासाठी बांधकाम परवानगी देताना रेन हार्वेस्टिंग सक्तीचे करणे, आदी कामांचा तपशीलवार आढावा घेऊन मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)