शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

जिल्ह्यात सर्वोत्तम विकासकामे

By admin | Updated: January 10, 2015 22:47 IST

अमरावती जिल्हा व विभागीय प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी विकास कामे करण्यास तत्पर आहे. त्यांची कामाची आवड व तयारी लक्षात घेता आगामी काळात अमरावती जिल्ह्यात

अमरावती : अमरावती जिल्हा व विभागीय प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी विकास कामे करण्यास तत्पर आहे. त्यांची कामाची आवड व तयारी लक्षात घेता आगामी काळात अमरावती जिल्ह्यात सर्वोत्तम विकास कामे होतील, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी व्यक्त केला. ना.पोटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, महापालिका आयुक्त अरुण डोंगरे, प्रकल्प अधिकारी संजय मीना, जिल्हा नियोजन अधिकारी काळे अन्य विभागप्रमुख उपस्थित होते. ना.पोटे यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाचा गौरव केला. जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याच्यादृष्टिने जिल्हा प्रशासनाने सुरु केलेला गाव मुक्काम कार्यक्रम प्रशंसनीय आहे. सन २०१४-१५ या वषार्तील खरीप हंगामा १९८१ गावात दुष्काळ जाहीर झाल्यामुळे शासनाकडून ३०२ कोटी रुपये दुष्काळ निधी मंजूर झाला. त्यापैकी १२५ कोटी रुपयांचे वाटप गाव पातळीवर होणार आहे. त्याचा शुभारंभ रविवार ११ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता चांदुर रेल्वे तालुक्यातील धनोडी येथे चावडी वाचनाचा कार्यक्रम होणार आहे. सर्व शेतकरी व ग्रामस्थांनी उपस्थित राहाण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सार्वजनिक हिताची बांधकामे तातडीने पूर्ण करावीत. विद्युत विभागाने बंद ट्रान्सफार्मर तातडीने दुरुस्त करावेत, शेतकऱ्यांची कोणतीही अडचण वा तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी जादा ट्रान्सफार्मर ठेवावेत. उद्योग विभागातील अधिकाऱ्यांनी पाच लक्ष ते पाच कोटी गुंतवणुकीच्या उद्योगांची यादी तयार करुन त्यातील उद्योगांच्या संधी तसेच उत्पादनाचा तपशील बेरोजगार युवकांच्या माहितीसाठी दर्शनीय भागात ठेवावा. योजनांची माहिती बेरोजगारांना तत्परतेने देण्यात यावी. आपणास सर्वांना घेऊन ग्राम पातळीपर्यंत शासनाच्या विकास योजना घेऊन जावयाच्या आहेत. उद्योगात महिलांना प्राधान्य देण्याच्या दृष्टिने उद्योग विभागातील अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. शहर सौंदर्यीकरणाच्या कामे जे लोक किंवा स्वयंसेवी संस्था इच्छूक असतील त्यांना निमंत्रित करुन नियोजन करावे, सध्या टंचाई परिस्थिती असून सर्व अधिकाऱ्यांनी गांभीर्याने आपापल्या विभागाची कामे पूर्ण करावीत, असेही ते म्हणाले.यावेळी पालकमंत्र्यांनी अंगणवाडी बांधकाम, रस्त्यांची पूर्ण झालेली व प्रगतीपथावरील कामे, सामूहिक विवाह, वैयक्तिक लाभाच्या योजना, ग्रामीण भागातील वाहतूक सुधारणा, नाला खोलीकरण, नदी खोलीकरणाची कामे, जलसंवर्धनासाठी बांधकाम परवानगी देताना रेन हार्वेस्टिंग सक्तीचे करणे, आदी कामांचा तपशीलवार आढावा घेऊन मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)