शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

लोकाभिमुख प्रशासनामुळे योजनांचा लाभ गरजूंपर्यंत

By admin | Updated: September 8, 2015 00:14 IST

शासकीय अधिकारी व कर्मचारी मनापासून काम करीत आहेत. परिणामी प्रशासन लोकाभिमुख झाले असून विविध योजनांचे लाभ गरजूंपर्यंत पोहोचत आहेत,..

पालकमंत्र्यांचे प्रतिपादन : अचलपूर येथे समाधान शिबिर, प्रमाणपत्रांचे वितरण अमरावती : शासकीय अधिकारी व कर्मचारी मनापासून काम करीत आहेत. परिणामी प्रशासन लोकाभिमुख झाले असून विविध योजनांचे लाभ गरजूंपर्यंत पोहोचत आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी रविवारी अचलपूर येथे केले. महाराजस्व अभियान अंतर्गत अचलपूर येथे कल्याण मंडळ सभागृहात आयोजित समाधान शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर अध्यक्षस्थानी होते. अचलपूरचे नगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी, पंचायत समितीच्या सभापती सोनाली देशमुख, जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपविभागीय अधिकारी श्यामकांत मस्के उपस्थित होते. पालकमंत्री पुढे म्हणाले की, शासनाच्या विविध योजना आहेत. त्या योजनांचा लाभ महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराद्वारे एकाच छत्राखाली दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांचे अनेक प्रश्न निकाली निघत आहेत. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान लोकसहभागामुळे यशस्वी झाले आहे. सुमारे २४२ टीएमसी जलसाठा जलशिवारव्दारे उपलब्ध झाला असून त्याचा फायदा साडेदहा हजार हेक्टर सिंचन क्षेत्रासाठी होणार आहे. शेतकरी, विद्यार्थी आणि विविध योजनांच्या लाभार्थ्यांसाठी ज्या योजना आहेत त्या योजनांची त्यांनी संबंधितांकडून माहिती घेऊन योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. शिबिरानिमित्त वन, कृषी, आरोग्य, पशुसंवर्धन, महिला व बालविकास, पालकमंत्र्यांचा जनसंपर्क कक्ष आदी स्टॉल उभारण्यात आले होते. पालकमंत्र्यांच्या जनता टेली सचिवालयाचे उदघाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरानिमित्त लाभार्थींना विविध योजनांच्या धनादेशांचे व जात प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. समाधान शिबिरामुळे विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांचे प्रश्न सुटत आहेत, असे प्रतिपादन नगराध्यक्ष नंदवंशी यांनी केले. अचलपूर तालुक्याचा परिसर संत्रा आणि सोयाबिन उत्पादकांचा आहे. त्यामुळे या भागात प्रक्रिया उद्योग उभे झाले पाहिजेत, अशी विनंती नंदवंशी यांनी पालकमंत्र्यांना केली. अध्यक्षीय मार्गदर्शन विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी केले. विद्यार्थ्यांसह प्रत्येक नागरिकांनी शासनाच्या योजनेचे लाभ घेण्यासाठी आधारकार्डची नोंदणी करावी. शासनाने आता सेवा हमी कायदा लागू केला आहे. या माध्यमातून विहित कालावधीमध्ये नागरिकांचे प्रश्न सुटणार आहेत. लाभार्थींना अन्नसुरक्षा योजना, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना व इतर योजनांचे लाभ चांगल्या प्रकारे दिले जात आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्तांनी यावेळी दिली. शासनाच्या विविध विभागांच्या योजना सर्वसामन्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मंडळ स्तरावर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली. अचलपूर विभागातील तहसील महाआॅनलाईन कार्यक्रमांतर्गत आॅनलाईन झाल्यात. शेतकऱ्यांना सातबारा, जातप्रमाणपत्र, विद्यार्थी, नागरिकांना इतर प्रमाणपत्रे संबंधितांना तात्काळ उपलब्ध करून दिली जात आहेत. शेतकऱ्यांच्या योगदानामुळे १३६ पाणंद रस्ते तयार करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी श्यामकांत मस्के यांनी प्रास्ताविकात दिली. संचालन अनिरूध्द पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)