शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
2
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
3
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
4
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
5
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
6
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
7
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
8
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
9
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
10
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
11
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
12
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
13
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
14
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
15
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
16
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
17
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
18
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
19
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
20
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!

विमाधारक नसणाऱ्या शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ

By admin | Updated: April 20, 2016 00:24 IST

जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापसाचा विमा उतरविला आहे, त्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे.

शासन आदेशाची प्रतीक्षा : पिकांच्या नुकसानीसाठी मिळणार निम्मी रक्कमअमरावती : जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापसाचा विमा उतरविला आहे, त्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी या दोन्ही पिकांचा विमा काढला नाही, अशाही शेतकऱ्यांना विमा रकमेचा ५० टक्के रक्कम मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ऐन खरिपाच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ३ लाख २९ हजार २१४ हेक्टरवर सोयाबीन व १ लाख ८६ हजार ६६५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. अशी एकूण ५ लाख १५ हजार ८७९ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. यापैकी ६० ते ७० टक्के क्षेत्राचा विमा काढण्यात आला म्हणजेच तीन लाख हेक्टर सोयाबीन व कपाशीचे क्षेत्र विमा संरक्षित आहे. या क्षेत्रासह उर्वरित २ लाख हेक्टर विमा न काढलेल्या क्षेत्रालादेखील या शासन योजनेचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी २ मार्च २०१६ रोजी शासनाने हा निर्णय घेतला. मात्र यासाठी अजूनही मंडळनिहाय पीक विमा न काढलेले क्षेत्राच्या नोंदी घेण्याचे काम सुरू झालेले नाही. महसूल व कृषी विभागाला अद्याप याविषयीचे आदेश प्राप्त नाही. शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील क्षेत्र आणि पिकांची नोंद ग्राह्य धरून शेतकऱ्यांना पिकांची ५० टक्के नुकसान भरपाई मिळणार आहे. जास्तीत जास्त २ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंतही रक्कम मिळणार आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात पेरणी काळात अत्यल्प पाऊस व नंतर दीर्घकाळ पावसाची दडी यामुळे सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्यांना क्विंटलऐवजी किलोची झडती आली. जमिनीत आर्द्रता नसल्याने कपाशीची वाढ खुंटली व लाल्याचा प्रादुर्भाव यामुळे कापसाच्या सरासरी उत्पन्नात ४० टक्क्यांनी घट झाली. उत्पादन खर्च अधिक वाढल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी ऐच्छिक स्वरुपाचा विमा काढला नाही. या शेतकऱ्यांना शासनाच्या या निर्णयाचा फायदा मिळणार आहे. तसेच पीक कर्जदार शेतकरी सभासदांसाठी पीक विमा योजना सक्तीची असल्याने त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. (प्रतिनिधी)अशी मिळणार मदतकापसाच्या नुकसान भरपाईपोटी विमा काढलेल्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ११ हजार रुपये व विमा न काढलेल्या शेतकऱ्यांच्या निम्मे म्हणजे साडेपाच हजार रुपये नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे. यंदाच्या खरीप पेरणीच्या पूर्व शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. असा आहे २ मार्चचा शासन निर्णयअमरावती व नागपूर विभागातील सोयाबीन व कापूस पिकांसाठी पीक विमा योजनेची मंडळनिहाय मदत जाहीर झाल्यानंतर विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना पीक योजनेनुसार मदत देण्यात येईल व ज्या शेतकऱ्यांनी विमा काढलेला नाही, अशा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची मंडळनिहाय जाहीर केलेल्या रकमेच्या ५० टक्के शासनाकडून देण्यात येईल.