शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

विमाधारक नसणाऱ्या शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ

By admin | Updated: April 20, 2016 00:24 IST

जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापसाचा विमा उतरविला आहे, त्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे.

शासन आदेशाची प्रतीक्षा : पिकांच्या नुकसानीसाठी मिळणार निम्मी रक्कमअमरावती : जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापसाचा विमा उतरविला आहे, त्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी या दोन्ही पिकांचा विमा काढला नाही, अशाही शेतकऱ्यांना विमा रकमेचा ५० टक्के रक्कम मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ऐन खरिपाच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ३ लाख २९ हजार २१४ हेक्टरवर सोयाबीन व १ लाख ८६ हजार ६६५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. अशी एकूण ५ लाख १५ हजार ८७९ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. यापैकी ६० ते ७० टक्के क्षेत्राचा विमा काढण्यात आला म्हणजेच तीन लाख हेक्टर सोयाबीन व कपाशीचे क्षेत्र विमा संरक्षित आहे. या क्षेत्रासह उर्वरित २ लाख हेक्टर विमा न काढलेल्या क्षेत्रालादेखील या शासन योजनेचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी २ मार्च २०१६ रोजी शासनाने हा निर्णय घेतला. मात्र यासाठी अजूनही मंडळनिहाय पीक विमा न काढलेले क्षेत्राच्या नोंदी घेण्याचे काम सुरू झालेले नाही. महसूल व कृषी विभागाला अद्याप याविषयीचे आदेश प्राप्त नाही. शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील क्षेत्र आणि पिकांची नोंद ग्राह्य धरून शेतकऱ्यांना पिकांची ५० टक्के नुकसान भरपाई मिळणार आहे. जास्तीत जास्त २ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंतही रक्कम मिळणार आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात पेरणी काळात अत्यल्प पाऊस व नंतर दीर्घकाळ पावसाची दडी यामुळे सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्यांना क्विंटलऐवजी किलोची झडती आली. जमिनीत आर्द्रता नसल्याने कपाशीची वाढ खुंटली व लाल्याचा प्रादुर्भाव यामुळे कापसाच्या सरासरी उत्पन्नात ४० टक्क्यांनी घट झाली. उत्पादन खर्च अधिक वाढल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी ऐच्छिक स्वरुपाचा विमा काढला नाही. या शेतकऱ्यांना शासनाच्या या निर्णयाचा फायदा मिळणार आहे. तसेच पीक कर्जदार शेतकरी सभासदांसाठी पीक विमा योजना सक्तीची असल्याने त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. (प्रतिनिधी)अशी मिळणार मदतकापसाच्या नुकसान भरपाईपोटी विमा काढलेल्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ११ हजार रुपये व विमा न काढलेल्या शेतकऱ्यांच्या निम्मे म्हणजे साडेपाच हजार रुपये नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे. यंदाच्या खरीप पेरणीच्या पूर्व शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. असा आहे २ मार्चचा शासन निर्णयअमरावती व नागपूर विभागातील सोयाबीन व कापूस पिकांसाठी पीक विमा योजनेची मंडळनिहाय मदत जाहीर झाल्यानंतर विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना पीक योजनेनुसार मदत देण्यात येईल व ज्या शेतकऱ्यांनी विमा काढलेला नाही, अशा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची मंडळनिहाय जाहीर केलेल्या रकमेच्या ५० टक्के शासनाकडून देण्यात येईल.