शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गुरुकुंज उपसा सिंचन योजनेचा लाभ सर्व गावांना समप्रमाणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 05:01 IST

याबाबत पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या, अडीचशे कोटी खर्चाच्या या योजनेतून गुरुदेवनगर, मोझरी, माळेगाव, शिवगाव, शिरजगाव मोझरी, शेंदोळा खुर्द, शेंदोला बुद्रुक, घोटा, भांबोरा, कोडवन, अनकवाडी, रघुनाथपूर, मालधूर, वऱ्हा, वाठोडा खुर्द, रंभापूर, फत्तेपूर आदी गावांना लाभ मिळणार आहे. या योजनेतून अंदाजे ७ हजार १०९ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. या योजनेतून सर्व गावांना समप्रमाणात पाणी मिळणार आहे, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. याबाबत कुठल्याही प्रकारे संभ्रम कुणीही बाळगू नये, असेही त्या म्हणाल्या.

ठळक मुद्दे यशोमती ठाकूर, १७,५६७ एकर शेतीचे सिंचन, २५० कोटींचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ७ हजार १०९ हेक्टर सिंचनक्षमता असलेल्या व सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्चाच्या गुरुकुंज उपसा सिंचन योजनेचा लाभ सर्वच गावांतील शेतीला समप्रमाणात होणार आहे, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी बुधवारी दिली.मोर्शी स्थित अप्पर वर्धा धरणाच्या तिवसा तालुक्यातून गेलेल्या उजव्या मुख्य कालव्यातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळावे, या हेतूने गुरुकुंज उपसा सिंचन योजना आकारास येत आहे. त्यासाठी पालकमंत्री ठाकूर यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा होत आहे. याबाबत पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या, अडीचशे कोटी खर्चाच्या या योजनेतून गुरुदेवनगर, मोझरी, माळेगाव, शिवगाव, शिरजगाव मोझरी, शेंदोळा खुर्द, शेंदोला बुद्रुक, घोटा, भांबोरा, कोडवन, अनकवाडी, रघुनाथपूर, मालधूर, वऱ्हा, वाठोडा खुर्द, रंभापूर, फत्तेपूर आदी गावांना लाभ मिळणार आहे. या योजनेतून अंदाजे ७ हजार १०९ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. या योजनेतून सर्व गावांना समप्रमाणात पाणी मिळणार आहे, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. याबाबत कुठल्याही प्रकारे संभ्रम कुणीही बाळगू नये, असेही त्या म्हणाल्या.माजी आमदार भैयासाहेब ठाकूर यांनी १९८४ मध्ये शेतकरी बांधवांना धरणाचे पाणी मिळण्यासाठी मागणी केली होती. त्यानुसार अप्पर वर्धा धरण प्रकल्प प्रशासनाने सर्वेक्षणसुद्धा केले होते. तथापि, ज्या गावातील शेतकऱ्यांनी ही मागणी केली होती, ती गावे उंच भागावर, तर कालवा सखल भागात असल्याने कालव्यातून पाणी देण्याबाबत तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. मात्र, शेतकरीहितासाठी कायम कटिबद्धता ठेवून शेतकऱ्यांच्या पाण्यावरील हक्कासाठी सातत्याने भूमिका मांडली. विधिमंडळात पाठपुरावा केला. त्यानुसार ‘मोझरी गुरुकुंज उपसा सिंचन योजना’ आकारास आली, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भरघोस शेती उत्पादन घेण्याचा ‘स्पार्क’ आहे.  ही योजना त्यांच्या परिश्रमाचे चीज करेल, अशी अपेक्षा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. 

जलसंपदा मंत्र्यांसोबत लवकरच बैठकयोजनेची चाचणीसुद्धा पालकमंत्री ठाकूर यांच्या हस्ते यावर्षी ३१ जुलै रोजी घेण्यात आली. पंप हाऊस व इतर सर्व कामे झाली, तर वितरणाची पन्नास टक्के काम पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे पूर्ण होण्यासाठीही सातत्याने पाठपुरावा होत आहे. ही योजना पूर्णत्वास जाण्यासाठी येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत विशेष बैठक लवकरच होणार आहे. यावेळी सर्व अडचणी दूर करण्याबाबत निर्णय होईल, अशी माहितीही पालकमंत्री ठाकूर यांनी दिली.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प