शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

एसटी कर्मचाऱ्यांचं हे वागणं बरं नव्हं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 05:00 IST

एसटी कर्मचाऱ्यांनी आजवर अडचणीचा सामना करून कर्तव्य बजावले आहे. त्यांना कमी वेतनात संसार करणे  जिकरीचे जात आहे. हे सर्वानाच मान्य आहे. त्यामुळे संप करणे काहीच गैर नाही. मात्र, या संपाची शासनाने दखल घेतलेली आहे. त्यांनी वेतनवाढीचा प्रस्ताव देऊन वाढ केली. वेळेवर वेतन करण्याची हमी घेतली आहे. तरी संप मागे घेण्यात आलेला नाही. यामुळे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गत ५८ दिवसांपासून संप पुकारला आहे. राज्य शासनाने  विविध टप्प्यात वेतनवाढ जाहीर केली. दरमहा दहा तारखेच्या आत वेतन करण्याबाबत हमी घेतली आहे. तरीही कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचं हे वागणं बरे नव्हे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आजवर अडचणीचा सामना करून कर्तव्य बजावले आहे. त्यांना कमी वेतनात संसार करणे  जिकरीचे जात आहे. हे सर्वानाच मान्य आहे. त्यामुळे संप करणे काहीच गैर नाही. मात्र, या संपाची शासनाने दखल घेतलेली आहे. त्यांनी वेतनवाढीचा प्रस्ताव देऊन वाढ केली. वेळेवर वेतन करण्याची हमी घेतली आहे. तरी संप मागे घेण्यात आलेला नाही. यामुळे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे संप कोठे तरी मिटविणे गरजेचे आहे.

दिवसभरात २२८७ जणांचा एस.टी.ने प्रवास-  अमरावती विभागातील आठपैकी तीन  आगारांमधून बुधवारी काही एसटी बस सोडण्यात आल्या. या माध्यमातून २२८७ जणांनी प्रवास केला. - अमरावती  विभागातील  अमरावती, मोर्शी, वरूड या तीन आगारातून बुधवारी १६ बस सोडण्यात आल्यात. मात्र, इतर आगारातून एकही बस सुटलेली नाही.

शासन सेवेत घेतल्याशिवाय माघार नाहीअतिशय तोकड्या पगारावर काम करून सेवा दिली आहे. अशा स्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा लढा हा हक्कासाठी सुरू आहे. जोपर्यंत एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण होणार नाही, तोपर्यंत लढा चालूच राहील.- सतीश कडू, एसटी कर्मचारी

प्रवासी आमचे दैवत समजून सेवा केली आहे. ज्येष्ठापासून शालेय विद्यार्थ्यांपर्यंत प्रामाणिक सेवा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन महामंडळाचे शासनात विलिनीकरण करून आमचा विश्वास सार्थ करावा व न्याय द्यावा. - श्रीकांत रोहनकर, वाहक 

आतापर्यंत २७० निलंबित

संपात सहभागी झालेल्या अमरावती विभागातील २७० कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय सहा कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. ११६ जण बडतर्फ केले आहे.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप