शहरं
Join us  
Trending Stories
1
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
2
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
3
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
4
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
5
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
6
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
7
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
8
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
9
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
10
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
11
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
12
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
13
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
14
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
15
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
16
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
17
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
18
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
19
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
20
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा

शेतकऱ्यांसाठी आरपारची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:06 IST

सततची नापिकी, अस्मानी संकट, शेतमालाला हमीभाव नाही, कर्जाचा डोंगर, शासन-प्रशासनाकडून सातत्याने अन्याय अशा विविध समस्या, प्रश्नांना सामोरे जाताना हताश होऊन शेतकरी जीवनयात्रा संपवत आहे.

ठळक मुद्देरवि राणांचा निर्धार : संपूर्ण कर्जमाफी द्या, अन्यथा बेमुदत जेलभरो आंदोलन

ऑनलाईन लोकमतअमरावती : सततची नापिकी, अस्मानी संकट, शेतमालाला हमीभाव नाही, कर्जाचा डोंगर, शासन-प्रशासनाकडून सातत्याने अन्याय अशा विविध समस्या, प्रश्नांना सामोरे जाताना हताश होऊन शेतकरी जीवनयात्रा संपवत आहे. त्यामुळे आता शासनाने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतमालाला हमी भाव द्यावा, अन्यथा शासनविरोधात आरपारची लढाई लढू, असा संकल्प आमदार रवि राणा यांनी गुरूवारी पत्रपरिषेदतून केला.शेतकरी हितासाठी २४ तास न्यायालयीन कोठडीची शिक्षा भोगल्यानंतर आ. राणा आणि २७ शेतकऱ्यांना न्यायालयाने बुधवारी सुटका केली. त्यानंतर आज आ. रवि राणा व नवनीत राणा यांनी संयुक्त पत्रपरिषदेतून शेतकरी हितासाठी आता थेट शासनासोबत लढाई करण्याचा संकल्प केला. यापूर्वी सन २०१२ मध्ये शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलो. आता सन २०१८ मध्येसुद्धा शेतकरी हितासाठी रस्त्यावर उतरेन. केंद्र सरकारने नुकतेच अर्थसंकल्पात शेतकरी बळकटीकरणासाठी ११ लाख कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात एकूणच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी आग्रही मागणी केली जाणार आहे. त्याकरिता नवनीत राणा यांच्या मार्गदर्शनात युवा स्वाभिमानचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांचा व्यथा त्यांच्या पुढ्यात मांडू, असे आ. राणा म्हणाले. सध्या शेतकरी चहुबाजुने संकटात सापडला असून त्यांना जगण्याची नवी उमेद मिळावी, यासाठी शेतमालाला दुप्पट हमीभाव, संपूर्ण कर्जमाफी हाच पर्याय आहे. यापुढे शेतकरी कर्जमाफीसाठी शासनाकडे साकडे घालू, अन्यथा सन २०१२ ची जेलभरो आंदोलनाची पुनरावृतीही लवकरच यावर्षी सन २०१८ मध्ये दिसेल. शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी ‘करो या मरो’ची लढाई लढू. शेतकऱ्यांच्या हितासाठी एक दिवस नव्हे, तर १० दिवस कारागृहात राहू, असा एल्गार आ. राणांनी घेतला. विधिमंडळातील सर्वपक्षीय आमदारांना शेतकरी हितासाठी एकत्रित आणणार, असेही आ. राणा म्हणाले.दरम्यान, त्यांनी तुरुंगात न्यायालयीन कोठडीच्या शिक्षेचे घालविलेल्या २४ तासांचे आपबितीचे अनुभव कथन केले. पत्रपरिषदेला नवनीत राणा, संजय हिंगासपुरे, अयुब खान, शैलेंद्र कस्तुरे, सुमती ढोेके, अनूप अग्रवाल, पराग चिमोटे, सचिन भेंडे, विलास वाडेकर, सिद्धार्थ बनसोड, दिनेश टेकाम, मयुरी कावरे, मीनल डकरे, जया तेलखेडे आदी उपस्थित होते.न्यायाधीशांचा शेतकऱ्यांप्रती सकारात्मक भाव असावाशेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भातील आंदोलनात काही चुका झाल्यास दंड किंवा शिक्षा सुनावताना न्यायाधीशांनी त्यांच्याप्रती सकारात्मक भाव ठेवावा. शेतकरी आंदोलनप्रकरणी तिवसा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावलेला दंड आणि शिक्षा ही अन्यायकारक असल्याबाबत वरिष्ठ न्यायालयात शेतकऱ्यांच्या भावना कळविली जाईल, असेही आ. राणा म्हणाले.मुख्यमंत्री नव्हे शेतकरी महत्त्वाचाअपक्ष आमदार म्हणून राज्य सरकारसोबत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी स्नेहभाव आहे. मुख्यमंत्री शेतकऱ्यांप्रती सकारात्मक असून संपूर्ण कर्जमाफीकडे त्यांची वाटचाल आहे. मात्र, शासनाकडून शेतकºयांचे प्रश्न सुटत नसल्यास मला मुख्यमंत्री नव्हे, तर शेतकरी महत्त्वाचा असेल, अशी ठाम भूमिका आ.राणांनी घेतली.