शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बापटांचे अधिकाऱ्यांना अभय का ?

By admin | Updated: June 13, 2016 01:29 IST

अन्न व नागरिक सुरक्ष़ा व अन्न पुरवठा मंत्री ना. गिरीश बापटांचे येथील एफडीएच्या अधिकाऱ्यांना अभय का,

कारवाई शून्य : तिसऱ्यांदा येऊनही कारवाईचे आदेश नाही. संदीप मानकर अमरावती अन्न व नागरिक सुरक्ष़ा व अन्न पुरवठा मंत्री ना. गिरीश बापटांचे येथील एफडीएच्या अधिकाऱ्यांना अभय का, हा विषय आता चर्चीला जात आहे. अमरावतीकरांचे आरोग्य धोकयात असताना ना. बापट तिसऱ्यांदा अमरावती मध्ये येऊनही कुठलेही कारवार्इंचे आदेश दिले नाही. त्यामुळे त्याचे अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना अभय का, असा प्रश्न चर्चिला जात आहे. अंबानगरीत आंबे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर करून घराघरांत मृत्युची विक्री सुरू आहे. या संदर्भात 'लोकमत'ने अनेकदा स्टिंग करून ही बाब लोकदरबारात मांडली. त्यासंदर्भात बापटांच्या निदर्शनास आणून दिले. परंतु तपास करू. यानंतरच कारवाई करण्यात येईल, अशी थातूर-माथूर भूमिका ना. बापटांनी घेतली आहे. संपूर्ण अंबानगरीच्या लोकांचे आरोग्य धोक्यात असताना एफडीए गप्प का, असा प्रश्नही निर्माण होत आहे. बापटांना गुटख्याच्या मुद्यावर छेडले असता हे आपल्या विभागाशी संबंधित असल्यामुळे सावध भूमिका घेतली. ते म्हणाले, राज्यात गुटखा बंदी आहे. पण इतर राज्यांतून गुटखा हा महाराष्ट्रात येतो. आम्ही एफडीएला आयपीसीची कलम ३२८ लावण्याची परवानगी न्यायालयाला मागितली. पण ते उच्च न्यायालयाने नाकारली आहे. यासंदर्भात शासानाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जर हे कलम लावण्याची परवानगी मिळाली तर कायद्यात कडक तरतूद होणार आहे. त्यामुळे अन्न विभागाला गुटखा रोखण्यास मदत होईल. तोपर्यंत कारवाईही होते. पण आमचे हात बांधले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे जरी खरे असले तरी अमरावतीच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात असताना एफडीएने कुठलीही कारवाई न करणे व अन्न मंत्री ना. गिरीश बापट व एफडीए आयुक्त हर्षदीप कांबळे यांचे अधिकाऱ्यांना अभय असणे हे सामाजिक बांधिलकीला न पटणारी बाब आहे. जर आंबे व इतर फळांमधून कार्बाईडसारखे घातक रसायनिक द्रव्य विकले जात असतील तर अशा फळ विक्रेत्यांवर तातडीने कारवाई व्हायला हवी. हे एफडीएची त्या विभागाच्या आयुक्तांची व संबंधित मंत्र्यांची नैतिक जबाबदारी आहे. या जबाबदारीतून जर ते आपली सुटका करण्याचा प्रयत्न करत असतील तर नागरिकांनी त्यांना का माफ करायचे, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे. आंब्यामधून विकले जाते विषविदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अमरावती जिल्ह्याचे सुपुत्र बापट हे होय. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कार्बाईडचा वापर करून आंब्यामधून विष विकले जात असताना ना.बापट अंबानगरीत महिनाभरात तीन वेळा आले आहेत. आंबे कार्बाईडने पिकवून अंबानगरीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे त्यांना पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिले. पण बापटांना यासंदर्भात कुठलीही भूमिका घेतली नाही. आपण या विभागाचे मंत्री असताना आपल्याला अमरावतीकरांच्या आरोग्याशी काही एक घेणेदेणे नसल्याचे त्यांच्या बोलण्यातून लक्षात आले. त्यामुळे बापटांचे एफडीएच्या अधिकाऱ्यांना अभय का, अशी नागरिकांमध्ये चर्चा होती.