शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बापटांचे अधिकाऱ्यांना अभय का ?

By admin | Updated: June 13, 2016 01:29 IST

अन्न व नागरिक सुरक्ष़ा व अन्न पुरवठा मंत्री ना. गिरीश बापटांचे येथील एफडीएच्या अधिकाऱ्यांना अभय का,

कारवाई शून्य : तिसऱ्यांदा येऊनही कारवाईचे आदेश नाही. संदीप मानकर अमरावती अन्न व नागरिक सुरक्ष़ा व अन्न पुरवठा मंत्री ना. गिरीश बापटांचे येथील एफडीएच्या अधिकाऱ्यांना अभय का, हा विषय आता चर्चीला जात आहे. अमरावतीकरांचे आरोग्य धोकयात असताना ना. बापट तिसऱ्यांदा अमरावती मध्ये येऊनही कुठलेही कारवार्इंचे आदेश दिले नाही. त्यामुळे त्याचे अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना अभय का, असा प्रश्न चर्चिला जात आहे. अंबानगरीत आंबे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर करून घराघरांत मृत्युची विक्री सुरू आहे. या संदर्भात 'लोकमत'ने अनेकदा स्टिंग करून ही बाब लोकदरबारात मांडली. त्यासंदर्भात बापटांच्या निदर्शनास आणून दिले. परंतु तपास करू. यानंतरच कारवाई करण्यात येईल, अशी थातूर-माथूर भूमिका ना. बापटांनी घेतली आहे. संपूर्ण अंबानगरीच्या लोकांचे आरोग्य धोक्यात असताना एफडीए गप्प का, असा प्रश्नही निर्माण होत आहे. बापटांना गुटख्याच्या मुद्यावर छेडले असता हे आपल्या विभागाशी संबंधित असल्यामुळे सावध भूमिका घेतली. ते म्हणाले, राज्यात गुटखा बंदी आहे. पण इतर राज्यांतून गुटखा हा महाराष्ट्रात येतो. आम्ही एफडीएला आयपीसीची कलम ३२८ लावण्याची परवानगी न्यायालयाला मागितली. पण ते उच्च न्यायालयाने नाकारली आहे. यासंदर्भात शासानाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जर हे कलम लावण्याची परवानगी मिळाली तर कायद्यात कडक तरतूद होणार आहे. त्यामुळे अन्न विभागाला गुटखा रोखण्यास मदत होईल. तोपर्यंत कारवाईही होते. पण आमचे हात बांधले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे जरी खरे असले तरी अमरावतीच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात असताना एफडीएने कुठलीही कारवाई न करणे व अन्न मंत्री ना. गिरीश बापट व एफडीए आयुक्त हर्षदीप कांबळे यांचे अधिकाऱ्यांना अभय असणे हे सामाजिक बांधिलकीला न पटणारी बाब आहे. जर आंबे व इतर फळांमधून कार्बाईडसारखे घातक रसायनिक द्रव्य विकले जात असतील तर अशा फळ विक्रेत्यांवर तातडीने कारवाई व्हायला हवी. हे एफडीएची त्या विभागाच्या आयुक्तांची व संबंधित मंत्र्यांची नैतिक जबाबदारी आहे. या जबाबदारीतून जर ते आपली सुटका करण्याचा प्रयत्न करत असतील तर नागरिकांनी त्यांना का माफ करायचे, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे. आंब्यामधून विकले जाते विषविदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अमरावती जिल्ह्याचे सुपुत्र बापट हे होय. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कार्बाईडचा वापर करून आंब्यामधून विष विकले जात असताना ना.बापट अंबानगरीत महिनाभरात तीन वेळा आले आहेत. आंबे कार्बाईडने पिकवून अंबानगरीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे त्यांना पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिले. पण बापटांना यासंदर्भात कुठलीही भूमिका घेतली नाही. आपण या विभागाचे मंत्री असताना आपल्याला अमरावतीकरांच्या आरोग्याशी काही एक घेणेदेणे नसल्याचे त्यांच्या बोलण्यातून लक्षात आले. त्यामुळे बापटांचे एफडीएच्या अधिकाऱ्यांना अभय का, अशी नागरिकांमध्ये चर्चा होती.