शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा आवाज कातरलेला...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
2
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
3
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; महिलांनी केला छांगुर गँगचा पर्दाफाश
4
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
5
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
6
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
7
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
8
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर १५० देश..; इतके टक्के शुल्क लादण्याची तयारी, भारतावर किती?
10
लव्ह मॅरेज केलं अन् कंगाल झाला; पैसा मिळवण्यासाठी तरुणाने 'असा' मार्ग निवडला, जो थेट तुरुंगात घेऊन गेला!
11
'मुंबईत मराठीतून नमाज पठण करा'; नितेश राणेंवर असदुद्दीन ओवेसींचा पलटवार; म्हणाले...
12
"हाताचे बाहुले बनण्याच्या बदल्यात..."; प्रकाश आंबेडकरांचा आनंदराज आंबेडकरांना खरमरीत प्रश्न
13
मार्क झुकरबर्गविरोधात खटला सुरू; ८ अब्ज डॉलर्सचं आहे प्रकरण, काय आहे कारण?
14
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
15
Video - अग्निकल्लोळ! इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, ५० जणांचा होरपळून मृत्यू
16
एका भाजी विक्रेत्याच्या भांडणाने पेटले इस्रायल-सीरिया युद्ध; आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू...
17
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
18
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
19
IND vs ENG: "जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी अनलकी" माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड असे का म्हणाले? वाचा
20
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'

बँका बंद, शेतकरी वेठीला

By admin | Updated: May 19, 2015 00:40 IST

खरीप हंगाम तोंडावर आला आहे, शेती मशागत, पेरणीपूर्व कामे, बी-बियाणे-खते यांची लगबग सुरू झाली आहे.

खरीप हंगाम तोंडावर : उलाढाल थांबली, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडीअमरावती : खरीप हंगाम तोंडावर आला आहे, शेती मशागत, पेरणीपूर्व कामे, बी-बियाणे-खते यांची लगबग सुरू झाली आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांची खरीप पीक कर्जाची धावपळ सुरू होते. यंदा मात्र नापिकीमुळे प्रचंड आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी बँक कर्मचाऱ्यांचा संप व व्यवस्थापनाची ताठर भूमिका यामुळे वेठीला धरल्या जात आहे. शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाणारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखांचे कामकाज तब्बल आठ दिवसापासून बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. मागील २०१४-१५ च्या हंगामात ५० पैस्याच्या आत जिल्ह्याची पैसेवारी असल्याने शासनाने टंचाई स्थिती जाहिर केली. जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना ४३४९४ लाख रूपयांचे कर्जवाटप केले होते.दुष्काळी परिस्थितीमुळे या कर्जाचे तीन वर्षात समान हप्त्यात पुनर्गठन करून नव्याने खरीपाचे पीक कर्ज द्यावे असे शासनाचे आदेश आहेत. खरीपाच्या पीक कर्जावरील तीन महिन्याचे व्याज शासनाद्वारा शेतकऱ्यांना माफ करण्यात आले. यंदाच्या हंगामात खरीपाचे पीक कर्जाची प्रक्रिया बँकेचे कामकाज बंद असल्यामुळे रखडली आहे. २०१५-१६ च्या खरीप-रबी हंगामासाठी जिल्हा बँकेला दिले आहे. बँकेला कर्ज वाटपासाठी कोरडवाहू कापसाला दर हेक्टरी ३५ ते ४४ हजारापर्यंत पीक कर्जदर जिल्हा तांत्रिक गट समितीने मंजूर केले आहे.बागायती कापसाकरिता ४० ते ४९ हजार, संकरीत ज्वार १९ ते २२ हजार, तूर २४ ते २६ हजार, सोयाबीन ३० ते ३५ हजार, मूग २० ते २४ हजार, उडीद २० ते २४ हजार असे दर निश्चित केले आहे. जिल्हा बँकेने १५ एप्रिल २०१५ पर्यंत २५ हजार ९७१ शेतकऱ्यांना २ कोटी १८ लाख ८५ हजाराचे वाटप केले आहे. खरे तर शेतकऱ्यांच्या खरीप पीक कर्जाची सुरुवात मे अखेरपासून सुरू होते. यंदा मात्र शेतकऱ्यांच्या बँकेने त्यांना वेठीस धरले आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांना दिलगिरी, भूमिका मात्र ताठरचजिल्हा बँक कर्मचाऱ्यांचा ११ मे पासून संप सुरू आहे, आठ दिवस झाले सर्व कामांचे कामकाज ठप्प, संघटना मागे हटायला तयार नाही, बँकेचे व्यवस्थापन तडजोडीस तयार नाही, दोन्ही बाजूंच्या भूमिका ताठरच आहे. यामध्ये शेतकरी, शिक्षक, ठेवीदार पिचल्या जात आहे. एक मात्र या दोन्ही बाजूकडून होते ती म्हणजे शेतकऱ्यांची दिलगिरी. जिल्हा बँकेत व्यवस्थापनाची मंगळवारी बैठक होत आहे. याविषयीच्या सूचना त्यांना दिल्या आहे. संपाविषयी या बैठकीत चर्चा होईल. शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांना त्वरीत पीक कर्ज द्यावे अशा सूचना सोमवारच्या बैठकीत दिल्या आहेत. - गौतम वालदेजिल्हा उपनिबंधक(सहकारी संस्था)