शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

बँका शासनालाही जुमानेनात

By admin | Updated: June 29, 2017 00:26 IST

शेतकऱ्यांचे दीड लाखांपर्यंतचे थकीत कर्ज शासनाने माफ केल्याने नव्याने पीककर्ज मिळण्यास थोडा अवधी लागणार आहे.

निरंकुश कारभार : एकाही शेतकऱ्याला मिळाले नाही तात्पुरते कर्ज लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकऱ्यांचे दीड लाखांपर्यंतचे थकीत कर्ज शासनाने माफ केल्याने नव्याने पीककर्ज मिळण्यास थोडा अवधी लागणार आहे. या पार्श्वभूमिवर यंदाच्या खरिपाची तयारी करण्यास शेतकऱ्यांना बँकांनी तातडीचे १० हजार रूपयांचे कर्ज पुरवावे, असे आदेश शासनाने १४ जूनला दिले. यातील अटी, शर्तींवर वादंग झाल्याने पुन्हा २० जूनला शुद्धीपत्रक काढण्यात आले. यालाही आठवडा उलटून सुद्धा एकाही बँकेने एकाही शेतकऱ्याला अद्याप १० हजारांचे तातडीचे कर्ज दिलेले नाही. मस्तवाल बँका शासनाला जुमानत नसतील तर यावर अंकुश कुणाचा, असा शेतकऱ्यांचा संतप्त सवाल आहे.कर्जमाफीची चर्चा सुरू असताना मंत्रीमंडळाची बैठक झाली. यावेळी आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊन नव्याने कर्ज मिळण्यास थोडा अवधी लागणार आहे. मात्र, तोंडावर येऊन ठेपलेल्या खरिपाची तयारी करण्यास शेतकऱ्यांना १० हजारांचे तातडीचे कर्ज बँकांनी उपलब्ध करून द्यावे आणि या कर्जाची हमी शासन घेईल, अशी ग्वाही राज्य शासनाने दिली होती. कर्जवाटप कोणाला करावे, याच्या मार्गदर्शक सूचना बँकाना दिल्या. मात्र, या अटी व शर्ती जाचक असल्याने यावर ठिकठीकाणी आंदोलने झालीत. अखेर आठवडाभरात शासनाने पहिल्या परिपत्रकात दुरूस्ती करून नव्याने २० जुनला शुद्धीपत्रक काढले. याविषयी सर्व बँकाना अवगत करण्यात आले. मात्र, यानंतरही एकाही बँकेने थकीत शेतकऱ्यांना कर्ज देण्यात स्वारस्य दाखविले नाही. थकीत शेतकऱ्यांना तातडीचे कर्ज उपलब्ध करून देताना कोऱ्या कागदावरील शपथपत्र मागितले जात आहे. मात्र, बँकानी या शपथपत्राचा नमुना शेतकऱ्यांना दिलेला नाही किंवा शेतकऱ्यांनी सादर केलेले शपथपत्र स्वीकारलेले नाही. असे आदेश नसल्याचे सांगून बँका शेतकऱ्यांची बोळवण करीत आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांची बँक म्हणविणाऱ्या जिल्हा बँकेने देखील ७० कोटींचे जुने चलन बदलवून देण्याची अट घातली आह. शासनाने सहकारी बँकाची ही मागणी मान्य केल्यानंतर मात्र कर्जवाटपास निधी नसल्याचे सांगून त्यांनी हात वर केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. बँकाच्या या असहकार्यामुळे शेतकरी मात्र अडचणीत सापडला आहे. या संदर्भात लीड बँकेच्या व्यवस्थापकांशी संपर्क केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. खरीप पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढेनाजिल्ह्यातील बँकाना यंदा खरीपासाठी १५९२ कोटी ५४ लाखांचे लक्ष्यांक असतांना बँकानी सद्यस्थितीत २७ हजार १४३ शेतकऱ्यांना २७० कोटी १७ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. वाटपाची ही केवळ १७ टक्केवारी आहे.यामध्ये राष्टीयकृत बँकानी १० टक्के, ग्रामिण बँकानी नऊ टक्के तर जिल्हा बँकेव्दारा ३३ टक्के कर्जवाटप करण्यात आले आहे.आरबीआयचे निर्देश नाहीतशेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी तात्पुरते कर्ज द्यावे, याबाबतचा शासनाचा निर्णय व जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र असताना सुद्धा राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना माघारी पाठवित आहेत. यासंदर्भात आरबीआयचे पत्र वा निर्देश नसल्याचे कारण सांगण्यात येत आहे. त्यामुळे शासन, प्रशासनाला न जुमानणाऱ्या बँकावर अंकुश कुणाचा, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.जिल्ह्यात ३.३३ लाख थकीत कर्जदारएकूण ४.१५ लाख खातेदारांपैकी १.६७ लाख शेतकरी थकबाकीदार आहेत. यात जिल्हा बँकेचे ३५,८३३, राष्ट्रीयीकृत बँकेचे १,३१,०९१ व ग्रामीण बँकेचे ५०२ शेतकरी थकबाकीदार आहेत. या शेतकऱ्यांचे दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आहे. कर्जमाफी झाल्याने शासनाव्दारे देण्यात येणाऱ्या रकमेमधूनही १० हजारांची कर्जकपातीचे आदेश असताना बँका शेतकऱ्यांना माघारी पाठवित आहेत.