शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

विद्यार्थ्यांचे खाते उघडण्यास बँकेची ना !

By admin | Updated: April 10, 2017 00:22 IST

विद्यार्थ्यांच्या पुस्तकांचे पैसे विद्यार्थ्यांच्या बँके खात्यातच जमा करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला.

बँक आॅफ इंडियाचा प्रताप : विद्यार्थ्यांची गैरसौयअमरावती : विद्यार्थ्यांच्या पुस्तकांचे पैसे विद्यार्थ्यांच्या बँके खात्यातच जमा करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. त्याकरिता शिक्षक विद्यार्थ्यांना बँक खाते काढण्यासाठी सक्ती करीत आहे. पण काही विद्यार्थी बँक आॅफ इंडियाच्या गाडगेनगर शाखेत खाते काढण्यासाठी गेले असता त्यांना वाईट अनुभव आला. सकाळी या, नाहीतर खाते उघडण्यात येणार नाही. असे अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांच्या पालकांना सांगण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे तापत्या उन्हात त्या विद्यार्थ्यांना आल्यापावली परत जाण्याची वेळ आली. विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. उन्हाचा पारा वाढल्यामुळे शाळांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आल्या असून जिल्हयातील शाळा सकाळच्या सत्रात सुरु करण्यात आल्या आहेत. १ ते ९ व्या वर्गाच्या पर्यंत विद्यार्थ्यांच्या पुस्तकांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी मुख्यध्यापकांनी विद्यार्थ्यांना त्वरित बँक खाते काढण्याचा सल्ला दिला. परंतु काही विद्यार्थ्यांची शाळा दुपारी १ वाजेपर्यंत असल्याने व बँक आॅफ इंडियाच्या गाडगेनगरची शाखाची ही दुपारी २ वाजेपर्यंत सुरु असल्याने विद्यार्थ्यांना शाळेतून जाण्यास विलंब होतो. त्यामुळे गुरुवारीे दुपारी १.४५ वाजता काही विद्यार्थ्यानी खाते काढण्यासाठी पालकांसमवेत गाडगे नगर येथील बँक आॅफ इंडियामध्ये गेले होते. पण त्यांना येथील शाखा प्रथम कर्मचाऱ्यांकडून व नंतर शाखा व्यवस्थापकांकडून सकारात्मक वागणूक मिळाली नाही. व शाळेच वेळ काहीही असो बँकेच्या वेळेतच खाते काढण्यात येईल याकरीता सकाळी ९ वाजता या असे ठणकाविण्यात आले. पण सर्व शाळांची वेळ ही सकाळचीच असल्याने अनेक विद्यार्थी या वेळेत बँकेत येऊ शकत नाही. व विद्यार्थ्यांच्या परीक्षासुध्दा सुरु आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांशी व त्यांच्या पालकांशी बँक अधिकाऱ्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे त्यांची निराशा होत आहे. त्यामुळे बँकांनी विद्यार्थ्यांचे बँक खाते त्वरीत काढण्यात यावे व त्यांना नाहक त्रास होणार नाही. याची काळजी घेतली पाहिजे. व याकाळात विद्यार्थ्यांचे खाते काढण्यासाठी बँकांनी स्वतंत्र व्यवस्था करावी जेणेकरुन विद्यार्थ्यांना व पालकांना त्रास होणार नाही, अशी मागणी पालकांनी केली आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता बँकेचे आॅनलाईन लिंकींग असल्यामुळे आम्ही काहीही करू शकत नाही. विद्यार्थ्यांनी बँकेच्या वेळेतच खाते काढण्यासाठी यावे, अन्यथा इतर बँकेत जावे, असे मत येथील शाखा व्यवस्थापकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)