शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

लाभ मिळेपर्यंत बँक व्यवस्थापकाची खुर्ची जप्त

By admin | Updated: February 26, 2016 00:34 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी, कर्ज पुरवठा व अन्य बँकिंग सुविधा मिळेपर्यंत ‘खुर्ची’ तारण ठेवण्याची नामुष्की आसेगाव पूर्णा येथील इंडियन बँकेच्या शाखा व्यवस्थापनावर ओढवली.

बच्चू कडू यांचे आंदोलन : बँक व्यवस्थापनाकडून माफीनामाआसेगाव पूर्णा : शेतकऱ्यांना कर्जमाफी, कर्ज पुरवठा व अन्य बँकिंग सुविधा मिळेपर्यंत ‘खुर्ची’ तारण ठेवण्याची नामुष्की आसेगाव पूर्णा येथील इंडियन बँकेच्या शाखा व्यवस्थापनावर ओढवली.आ.बच्चू कडू यांनी शेकडो शेतकऱ्यांसह गुरुवारी आसेगाव गाठून इंडियन बँकेच्या शाखा व्यवस्थापकाची खुर्ची बाहेर काढून आंदोलन केले. ठिय्या आंदोलन करत लेखी आश्वासन घेतल्यानंतर आंदोलनाला मूर्तरुप आले.इंडियन बँकेने ५ वर्षांपासून पीक कर्जाचा लाभ घेतलेल्या एकाही शेतकऱ्याला व्याजमाफीचा लाभ दिला नाही. शासनाकडून व्याजाच्या रकमेचा भरणा बँकेत करण्यात येत असताना या शेतकऱ्यांकडून व्याजाची वसुली करण्यात आली. त्या पार्श्वभूमिवर गुरुवारी आ.कडू यांनी शाखा व्यवस्थापकाची खुर्चीच ‘तारण’ ठेवली आणि शाखा व्यवस्थापकानेसुद्धा मागण्यांची पूर्तता आम्ही करत नाही, तोपर्यंत स्वेच्छेने खुर्ची जप्त करून देत आहोत, असे लिहून दिले.दोन दिवसांपूर्वी आ. कडू यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह ठिय्या आंदोलनाचे पत्र अग्रणी बँक, पोलीस अधीक्षक व इंडियन बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला दिले होते. त्यानुसार गुरुवारी आ. कडू शेकडो शेतकऱ्यांसह या बँकेत पोहोचले. यावेळी राजेश वाटाणे, राजेश सोलव, प्रशांत नागापुरे, रामदास कैथवास, अजय तायडे, बसवंत कनोजे आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)शेतकऱ्यांची माफीसन २०१३-१४ च्या पीककर्ज व्याजमाफीचा लाभ शेतकऱ्यांना न दिल्यामुळे बँक व्यवस्थापकाने आ. कडू यांच्यासह शेतकऱ्यांची जाहीर माफी मागितली. त्यांना व्याजासह रक्कम एक महिन्यात परत करण्यात येईल. याशिवाय १ लाखापर्यंतचे पीककर्जाला तत्काळ व्याजमाफी देण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. याशिवाय श्रावणबाळ/संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानातून कुठल्याही प्रकारची कपात करण्यात येणार नाही. शेतकऱ्यांना तातडीने कर्जपुरवठा करण्याची हमी मिळाल्यानंतर आंदोलन संपविण्यात आले.