शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
6
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
7
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
8
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
9
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
10
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
11
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
12
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
13
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
14
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
15
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
16
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
17
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
18
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
19
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
20
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा

उन्हामुळे होरपळल्या केळीच्या बागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 01:27 IST

काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाच्या पानांच्या झिरमाळ्या झाल्या आहेत. त्यात गेल्या आठवड्यापासून तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढल्यामुळे केळीची पाने होरपळून गेली आहेत. या दुहेरी संकटाने केळी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

ठळक मुद्देतापमान ४३ अंशावर : सिंचन व्यवस्था कोलमडली

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाच्या पानांच्या झिरमाळ्या झाल्या आहेत. त्यात गेल्या आठवड्यापासून तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढल्यामुळे केळीची पाने होरपळून गेली आहेत. या दुहेरी संकटाने केळी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.यंदा मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यात तापमानाचा पारा वर चढत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत किमान तापमानातही वाढ झाल्याने रात्री बºयाच उशिरापर्यंत उष्ण वारे वाहतात. केळी पिकांसाठी हे प्रतिकूल वातावरण आहे. पिकास पाणी दिले तरी फाटलेल्या पानांमुळे उन्ह थेट जमिनीवर पडत आहे. बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. भिजविलेली जमीन तात्काळ कोरडी होत आहे. केळी पीक निसवण्याच्या अवस्थेत आहे. काही भागांत निसवण सुरू झाली आहे. परंतु, उन्हामुळे पाने होरपळून गेल्यामुळे उत्पादनात मोठी घट येणार आहे.ओलितासाठी जमिनीखाली पाणीच नसल्याने तालुक्यातील बागायतदार शेतकऱ्यांच्या बागा धोक्यात आल्या असून, जवळपास एक महिना तापमानाचा वरवंटा शेष असताना आजच संत्राबागा व्हेंटिलेटरवर आहेत. भरपूर पाण्याची गरज पुरी होणार नसल्याने बहुतांश बागा संपणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे .‘मे’ च्या उत्तरार्धात उन्हाचे चटके तीव्रयावर्षी बागांचे भविष्य धोक्यात असल्याचे चित्र समोर दिसत आहे. मेच्या उत्तरार्धात उन्हाचे चटके अधिक तीव्रपणे जाणवायला लागलेत. पाऊस यायला अद्यापही एक महिना शिल्लक आहे. आजच संत्राबागा पिवळ्या पडत आहेत. केळी हे पीक तर संवेदनशील आहे. या पिकाची उन्हाळ्यात काळजी घ्यावी लागते. यावर्षी पाणीच नाही आणि वरून सूर्य आग ओकत आहे. यामुळे केळीच्या बागा नष्ट होणार असल्याचा धोका व्यक्त होत आहे.१४ हजार हेक्टर क्षेत्रात ओलिततालुक्यात पेरणीयोग्य असलेल्या ४२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे १४ हजार हेक्टरवर ओलित आहे. देवगाव, खोडगाव, दहिगाव, चिंचोना, पळसखेळ, सावरपाणी, हिरापूर, कारला, तुरखेड या भागात संत्री, केळी व पानपिंपरी या पिकांच्या बागा आहेत. तीन वर्षांपासून पाऊस अत्यल्प झाल्याने भूपातळी कोरडीच राहिली. एखाद्या भागात पाणी असल्याचे समजताच त्या शेतकऱ्याला पैसे देऊन व तेथे बोअरवेल करून आठ ते दहा किलोमीटरवरून पाणी आणले जात आहे. जमिनीच्या पोकळीत असलेले पाणी संपले की, हेही थांबेल.