शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

उन्हामुळे होरपळल्या केळीच्या बागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 01:27 IST

काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाच्या पानांच्या झिरमाळ्या झाल्या आहेत. त्यात गेल्या आठवड्यापासून तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढल्यामुळे केळीची पाने होरपळून गेली आहेत. या दुहेरी संकटाने केळी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

ठळक मुद्देतापमान ४३ अंशावर : सिंचन व्यवस्था कोलमडली

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाच्या पानांच्या झिरमाळ्या झाल्या आहेत. त्यात गेल्या आठवड्यापासून तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढल्यामुळे केळीची पाने होरपळून गेली आहेत. या दुहेरी संकटाने केळी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.यंदा मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यात तापमानाचा पारा वर चढत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत किमान तापमानातही वाढ झाल्याने रात्री बºयाच उशिरापर्यंत उष्ण वारे वाहतात. केळी पिकांसाठी हे प्रतिकूल वातावरण आहे. पिकास पाणी दिले तरी फाटलेल्या पानांमुळे उन्ह थेट जमिनीवर पडत आहे. बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. भिजविलेली जमीन तात्काळ कोरडी होत आहे. केळी पीक निसवण्याच्या अवस्थेत आहे. काही भागांत निसवण सुरू झाली आहे. परंतु, उन्हामुळे पाने होरपळून गेल्यामुळे उत्पादनात मोठी घट येणार आहे.ओलितासाठी जमिनीखाली पाणीच नसल्याने तालुक्यातील बागायतदार शेतकऱ्यांच्या बागा धोक्यात आल्या असून, जवळपास एक महिना तापमानाचा वरवंटा शेष असताना आजच संत्राबागा व्हेंटिलेटरवर आहेत. भरपूर पाण्याची गरज पुरी होणार नसल्याने बहुतांश बागा संपणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे .‘मे’ च्या उत्तरार्धात उन्हाचे चटके तीव्रयावर्षी बागांचे भविष्य धोक्यात असल्याचे चित्र समोर दिसत आहे. मेच्या उत्तरार्धात उन्हाचे चटके अधिक तीव्रपणे जाणवायला लागलेत. पाऊस यायला अद्यापही एक महिना शिल्लक आहे. आजच संत्राबागा पिवळ्या पडत आहेत. केळी हे पीक तर संवेदनशील आहे. या पिकाची उन्हाळ्यात काळजी घ्यावी लागते. यावर्षी पाणीच नाही आणि वरून सूर्य आग ओकत आहे. यामुळे केळीच्या बागा नष्ट होणार असल्याचा धोका व्यक्त होत आहे.१४ हजार हेक्टर क्षेत्रात ओलिततालुक्यात पेरणीयोग्य असलेल्या ४२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे १४ हजार हेक्टरवर ओलित आहे. देवगाव, खोडगाव, दहिगाव, चिंचोना, पळसखेळ, सावरपाणी, हिरापूर, कारला, तुरखेड या भागात संत्री, केळी व पानपिंपरी या पिकांच्या बागा आहेत. तीन वर्षांपासून पाऊस अत्यल्प झाल्याने भूपातळी कोरडीच राहिली. एखाद्या भागात पाणी असल्याचे समजताच त्या शेतकऱ्याला पैसे देऊन व तेथे बोअरवेल करून आठ ते दहा किलोमीटरवरून पाणी आणले जात आहे. जमिनीच्या पोकळीत असलेले पाणी संपले की, हेही थांबेल.