शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

उन्हामुळे होरपळल्या केळीच्या बागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 01:27 IST

काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाच्या पानांच्या झिरमाळ्या झाल्या आहेत. त्यात गेल्या आठवड्यापासून तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढल्यामुळे केळीची पाने होरपळून गेली आहेत. या दुहेरी संकटाने केळी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

ठळक मुद्देतापमान ४३ अंशावर : सिंचन व्यवस्था कोलमडली

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाच्या पानांच्या झिरमाळ्या झाल्या आहेत. त्यात गेल्या आठवड्यापासून तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढल्यामुळे केळीची पाने होरपळून गेली आहेत. या दुहेरी संकटाने केळी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.यंदा मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यात तापमानाचा पारा वर चढत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत किमान तापमानातही वाढ झाल्याने रात्री बºयाच उशिरापर्यंत उष्ण वारे वाहतात. केळी पिकांसाठी हे प्रतिकूल वातावरण आहे. पिकास पाणी दिले तरी फाटलेल्या पानांमुळे उन्ह थेट जमिनीवर पडत आहे. बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. भिजविलेली जमीन तात्काळ कोरडी होत आहे. केळी पीक निसवण्याच्या अवस्थेत आहे. काही भागांत निसवण सुरू झाली आहे. परंतु, उन्हामुळे पाने होरपळून गेल्यामुळे उत्पादनात मोठी घट येणार आहे.ओलितासाठी जमिनीखाली पाणीच नसल्याने तालुक्यातील बागायतदार शेतकऱ्यांच्या बागा धोक्यात आल्या असून, जवळपास एक महिना तापमानाचा वरवंटा शेष असताना आजच संत्राबागा व्हेंटिलेटरवर आहेत. भरपूर पाण्याची गरज पुरी होणार नसल्याने बहुतांश बागा संपणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे .‘मे’ च्या उत्तरार्धात उन्हाचे चटके तीव्रयावर्षी बागांचे भविष्य धोक्यात असल्याचे चित्र समोर दिसत आहे. मेच्या उत्तरार्धात उन्हाचे चटके अधिक तीव्रपणे जाणवायला लागलेत. पाऊस यायला अद्यापही एक महिना शिल्लक आहे. आजच संत्राबागा पिवळ्या पडत आहेत. केळी हे पीक तर संवेदनशील आहे. या पिकाची उन्हाळ्यात काळजी घ्यावी लागते. यावर्षी पाणीच नाही आणि वरून सूर्य आग ओकत आहे. यामुळे केळीच्या बागा नष्ट होणार असल्याचा धोका व्यक्त होत आहे.१४ हजार हेक्टर क्षेत्रात ओलिततालुक्यात पेरणीयोग्य असलेल्या ४२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे १४ हजार हेक्टरवर ओलित आहे. देवगाव, खोडगाव, दहिगाव, चिंचोना, पळसखेळ, सावरपाणी, हिरापूर, कारला, तुरखेड या भागात संत्री, केळी व पानपिंपरी या पिकांच्या बागा आहेत. तीन वर्षांपासून पाऊस अत्यल्प झाल्याने भूपातळी कोरडीच राहिली. एखाद्या भागात पाणी असल्याचे समजताच त्या शेतकऱ्याला पैसे देऊन व तेथे बोअरवेल करून आठ ते दहा किलोमीटरवरून पाणी आणले जात आहे. जमिनीच्या पोकळीत असलेले पाणी संपले की, हेही थांबेल.