शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

३६ वर्षांपासून गॅस एजन्सीसाठी एकाकी लढा; अद्यापही न्यायापासून वंचितच 

By गणेश वासनिक | Updated: May 26, 2024 17:26 IST

'ट्रायबल'ची गॅस एजन्सी बिगर आदिवासीच्या घशात, राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग तक्रार

अमरावती : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडची 'गॅस एजन्सी' अनुसूचित जमातीसाठी राखीव होती. सदर गॅस एजन्सी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खऱ्या आदिवासीला डावलून बिगर आदिवासी व्यक्तीशी संगनमत करून जातवैधता प्रमाणपत्र नसतानाही धुळे जिल्ह्यातील शिरूड येथील श्यामकांत जाधव या बिगर आदिवासीच्या घशात गॅस एजन्सी घातली आहे.

अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेले ‘पेट्रोल पंप’ बिगर आदिवासींनी हडपल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर आता 'गॅस एजन्सी'ही बिगर आदिवासीनी हडपल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ३६ वर्षांपूर्वी ऑइल सिलेक्शन बोर्ड, नवी दिल्ली यांनी हॉटेल सिरॉक, बांद्रा, मुंबई येथे गॅस एजन्सीसाठी मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीस दोनच उमेदवार उपस्थित होते. त्यामध्ये ऑइल सिलेक्शन बोर्डाने बाळकृष्ण मते यांची निवड प्रथम क्रमांकाने केली होती. मात्र, त्यांना डावलून दोन नंबरवर असलेल्या श्यामकांत जाधव यांना जातवैधता प्रमाणपत्र नसतानाही गॅस एजन्सी दिली आहे. अन्यायग्रस्त असलेले मते हे ३६ वर्षांपासून सातत्याने तक्रार करीत असून आजपर्यंत बीपीसीएलने कोणतीही कारवाई केलेली नाही.

सुनावणीविनाच अपील निकालीठाणे जिल्ह्यातील शहापूर तहसीलदार यांच्याकडे मते यांनी जातप्रमाणपत्राच्या नस्तीची मागणी केली. ती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. याबाबत माहिती आयुक्त कोकण विभाग यांच्याकडे अपील केले असता त्यांनी सदरचे अपील सुनावणीविनाच निकाली काढले.

न्याय हरवला आहे३६ वर्षांपासून बाळकृष्ण मते हे बीपीसीएल कंपनी, राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग, नवी दिल्ली, पेट्रोलियममंत्री, पंतप्रधान कार्यालय व पोर्टल, केंद्रीय आदिवासी विकासमंत्री, सचिव, आदिवासी विकास विभाग आदिवासी आयुक्त पुणे, माहिती आयुक्त कोकण भवन मुंबई, केंद्रीय गुप्तचर विभाग, लाचलुचपत विभाग ठाणे, ठाणे व पुणे येथील जातपडताळणी समिती कार्यालये आदी ठिकाणी सतत पाठपुरावा करूनही अद्याप न्याय मिळालेला नाही. न्याय हरवला आहे.

राष्ट्रीय आयोगात सुनावणी नाही.बीपीसीएलने दखल न घेतल्याने बाळकृष्ण मते यांनी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग, नवी दिल्ली यांच्याकडे तक्रार केली. आयोगाने'बीपीसीएल'ला फक्त नोटीस दिली. आयोगाचे चार अध्यक्ष बदलले; पण अद्याप सुनावणी घेतली नाही आणि कोणतीही कारवाई केली नाही.

प्रस्तावच नाही तर वैधता कशी ?श्यामकांत जाधव यांनी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती ठाणे यांना संदर्भ क्र.१९६/२००२/ जावक क्रमांक नाही. ३१ मार्च २००२ रोजी एज्युकेशन सोसायटी अंबरनाथ यांचे लेटरपॅडवर कार्यवाहक श्रीकांत देशपांडे यांच्या सहीने जाधव यांनी नोकरीसाठी अर्ज केला असल्याने त्यांचा प्रस्ताव अनुसूचित जमाती पडताळणी समिती ठाणे यांच्याकडे पाठविला. तो प्रस्ताव ठाणे समितीने आवक नं. ८९२ दि ९ फेब्रवारी २००२ ने दाखल करून घेतलेला आहे. सदर संस्थेकडे मते यांनी चौकशी केली असता या शाळेत श्यामकांत जाधव नावाची व्यक्ती नसून संस्थेने असा कोणताही प्रस्ताव ठाणे येथील पडताळणी समितीकडे पाठविला नाही असे संस्थेने ३ मे २०१८ रोजी मते यांना कळविले आहे.