शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

क्र ांती मोर्चातून बहुजनांचा हुंकार

By admin | Updated: December 26, 2016 00:19 IST

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसह दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्यकांच्या न्याय,

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अ‍ॅट्रॉसिटी कायदा कठोर करा अमरावती : अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसह दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्यकांच्या न्याय, हक्कासाठी रविवारी क्रांती मोर्चाद्वारे बहुजनांनी हुंकार दिला. मोर्चातील सहा महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या नावे पाठविले. येथील संविधान सन्मान समितीच्यावतीने बहुजन क्रांती मोर्चाला छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दुपारी दीड वाजता प्रारंभ करण्यात आला. स्थानिक सायन्सस्कोर मैदानातून निघालेला मोर्चा पुढे राजकमल चौक, जयस्तंभ चौक, इर्विन चौक, गर्ल्स हायस्कूल चौकातून पुढे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चाचे संयोजक राहुल मोहोड, जोगेंद्र मोहोड, कृष्णा गणवीर, सुनील गजभिये, किरण गुडधे, अमोल इंगळे, प्रभाकर घोडेस्वार, उत्तमराव भैसने, महेश तायडे आदींनी मोर्चाला संबोधित केले. इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. घोषणांनी आसमंत दणाणला अमरावती : मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचल्यानंतर तहसीलदार सुरेश बगळे यांनी मोर्चातील काही महिला, पुरूषांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन सादर करण्यासाठी गेले. यावेळी काही मोर्चेकरांनी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:हून मोर्चासमोर येऊन निवेदन स्वीकारावे, अशी मागणी केली. परंतु पोलिसांनी सहा महिला व पुरूषांचे शिष्टमंडळाने निवेदन सादर करण्यासाठी जावे, अशी भूमिका घेतली. त्यानंतर दुपारी चार वाजताच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांना विविध १९ मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी गित्ते यांना निलिमा पवार, स्हेनल आमटे, माया भिवगडे, संगीता मिसरे, प्रणाली खोब्रागडे, अनू वानखडे या महिलांच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर करून बहुजनांच्या मागण्या मांडल्यात. यावेळी ‘एकच पर्व, बहुजन सर्व व अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी झालीच पाहिजे’ आदी नारेबाजी केली. यावेळी बळवंत वानखडे, वसू महाराज, प्रशांत कांबळे, केशव वानखडे, सुदाम बोरकर, प्रमोद गवई, सतीश भालेराव उपस्थित होते.