शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

बगाजी सागरची सुरक्षा रामभरोसे

By admin | Updated: August 14, 2015 01:02 IST

दोन जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देऊन दोन शहरांची तहान भागविणाऱ्या बगाजी सागर धरणाची सुरक्षा मात्र रामभरोसेच आहे.

केवळ चार रक्षक : अपघात घडल्यास जबाबदार कोण ?धामणगाव रेल्वे : दोन जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देऊन दोन शहरांची तहान भागविणाऱ्या बगाजी सागर धरणाची सुरक्षा मात्र रामभरोसेच आहे. सद्यस्थितीत केवळ चार खासगी सुरक्षा रक्षक या साडेदहा किलोमीटर लांबीच्या धरणाचे रक्षण करीत असल्याचे चित्र आहे. निम्म लोअर वर्धा प्रकल्पाची मुहूर्तमेढ १९७६ मध्ये रोवण्यात आली. बगाजी सागर धरणाच्या निर्मितीकरिता अमरावती जिल्ह्यातील २९ गावांना पुनर्वसित व्हावे लागले़ कोट्यवधी रूपयांची कसदार जमीन शेतकऱ्यांनी या धरणाकरिता त्याकाळी अल्प किमतीत शासनाला दिली. या धरणाचे पाणी अमरावती जिल्ह्यातील काही गावांना मिळते तर पुलगाव व देवळी या दोन्ही शहरांची तहान मुख्यत्वे या धरणातून भागविली जाते. देवळी तालुक्याकरिता तर हे धरण वरदान ठरले आहे़ सिंचनासाठी वर्षभर पाणी देण्याची क्षमता या धरणात आहे़ धरणाची २५३ मिलियन मीटर जलक्षमता असून जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापासून वर्धा जिल्ह्याच्या पूर्व टोकला १० किलोमीटर अंतराची भिंत उभारण्यात आली आहे़ धरणाचे ३१ दरवाजे उघडल्यानंतर पर्यटकांची गर्दी वाढते़ मात्र, सुरक्षेचे उपाय अपूर्ण आहेत.