शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

अवकाळीचा ६.३२ लाख हेक्टरला फटका; ६७२ कोटींची मागणी, विभागीय आयुक्तांचा प्रस्ताव

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: January 3, 2024 18:57 IST

२६ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरदरम्यान पिकांचे नुकसान

गजानन मोहोड, अमरावती: नोव्हेंबरमधील अवकाळी पावसाने पश्चिम विदर्भात ११.१० लाख शेतकऱ्यांच्या ६.३२ लाख हेक्टरमधील खरीप, रब्बी, भाजीपाला व फळपिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेले आहे. पाचही जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना शासन मदतीसाठी विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी ६७१.९२ कोटींची मागणी शासनाकडे केली.

२६ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२३ दरम्यान अवकाळी पावसाची रिपरिप सुरू होती. यामध्ये सर्वाधिक २,१६,९७३ हेक्टरमध्ये कपाशीचे नुकसान झालेले आहे. अवकाळीमुळे फुटलेला कापूस बोंडातच भिजल्याने कापसाची प्रतवारी खराब झालेली आहे. याशिवाय अकोला जिल्ह्यात ३१५ हेक्टरमधील गहू जमीनदोस्त झाला. तसेच १.५४ लाख हेक्टरमधील तुरीचा फुलोरा गळला आहे.

रब्बी हंगामातील १.१७ लाख हेक्टरमधील हरभरादेखील अवकाळीने बाधित झाला. शिवाय सात हजार हेक्टरमधील ज्वारीचे नुकसान झालेले आहे. इतर काही पिकांचे ३२०० हेक्टर, असे एकूण ८.८३ लाख शेतकऱ्यांच्या जिरायती पिकांचे पाच लाख हेक्टरमध्ये नुकसान झालेले आहे. यासाठी ४२३.७६ कोटींच्या निधीची मागणी विभागीय आयुक्तांद्वारा शासनाकडे करण्यात आली.

टॅग्स :Amravatiअमरावती