शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

वनीकरणात ३०० आरएफओंची दैनावस्था; लिपिक कार्यालय नाही, मग्रारोहयों कामांची सक्ती, वेतनाचे वांदे

By गणेश वासनिक | Updated: April 28, 2023 17:53 IST

राजपत्रित वनाधिकारी मात्र अवस्था चपराशासारखी

अमरावती : राज्यातील सामाजिक वनीकरणात कार्यरत ३५० वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची सध्या दैनावस्था असून, शेकडो वनाधिकाऱ्यांना कार्यालय नाही किंवा लिपिक नाही. अशा अवस्थेत या अधिकाऱ्यांना कारकुनी कामे करावी लागतात. मग्रारोहयोच्या कामांची सक्ती केली जाते. मात्र, अनुदान वर्षानुवर्षे मिळत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांना चपराशी ते वनाधिकारी अशी भूमिका पार पाडावी लागते.

राज्याच्या वनविभागात प्रादेशिक, वन्यजीव, सामाजिक वनीकरण अशा विंगमध्ये ९०० वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यरत आहेत. सामाजिक वनीकरण ग्रामविकास विभागातून वनविभागात समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर या ठिकाणी ३००च्या आसपास वनपरिक्षेत्र अधिकारी देण्यात आले. मात्र, या सर्व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना सामाजिक वनीकरण विभागात काम करताना प्रादेशिक, वन्यजीव विभागाच्या तुलनेत दुय्यम स्थान मिळत असल्याने चांगले वनाधिकारी या ठिकाणी काम करण्यास उत्सुक नसतात. कारण, शासनाच्या धोरणामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी या ठिकाणी येताच बदलीचा मार्ग पत्करतात. याला वनविभागाची अनास्था करणीभूत मानली जाते. आयएफएस लॉबी सामाजिक वनीकरणात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना सुविधा देण्यात ‘फेल’ ठरली आहे.

उच्चप्रतीच्या रोपवाटिका मात्र पैसा नाही

सामाजिक वनीकरण उच्च प्रतीच्या रोपवाटिका मग्रारोहयोअंतर्गत तयार करतात. स्थानिक मजुरांना या माध्यमातून रोजगार दिला जातो. राज्य योजनेतून रोपवाटिका घेण्यासंदर्भात मागणी असताना आयएफएस लॉबी वनाधिकाऱ्यांना केवळ मग्रारोहयोतून रोपे तयार करण्याची सक्ती करतात. महसूल विभाग मग्रारोहयोच्या कामामुळे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना छळतात. त्यामुळे तहसीलदारापासून उपजिल्हाधिकारी वनाधिकाऱ्यांवर दबाब ठेवतात. आयएफएस अधिकारी मात्र मूग गिळून बसतात. रोपवाटिकेतील खत, माती, रेतीचे दर अनुक्रमे ५४० व १२८० रूपये असून हे दर गेल्या २० वर्षांपासून जैसे थे आहे. यात बदल करण्यासाठी वरिष्ठ वनाधिकारी पुढाकार घेताना दिसून येत नाही.वर्ग २ चे अधिकारी, काम चपराशी पदाचे

प्रादेशिकसह सामाजिक वनीकरण विभागात कार्यरत वनपरिक्षेत्र अधिकारी राजपत्रित व वर्ग २ चे पद असून त्यांना कार्यालय प्रमुखाचा दर्जा असताना अनेक ठिकाणी हक्काचे कार्यालय नाही. सामाजिक वनीकरणाच्या ३५० वनपरिक्षेत्र कार्यालयात लिपिक, लेखापाल नाही. कार्यालय प्रमुख असताना प्रत्येक कार्यालयास लिपिक देणे नियम असताना राज्याच्या वनबलप्रमुखांनी आतापर्यंत शासनाच्या वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी चपराशी ते वनाधिकारी अशी भूमिका पार पाडताना दिसून येते. मग्रारोहयोची कामे करण्यासाठी संगणक चालकसुद्धा मिळत नाही.

यंदा कामे रखडली, वेतनाचे वांधे

सामाजिक वनीकरण विभागात रोपवनाच्या कामाकरिता निधी न मिळाल्यामुळे सध्या कामे नाहीत. कारण, सामाजिक वनीकरण विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि वनबलप्रमुख यांच्यातील कलगीतुरा हे प्रमुख कारण मानले जाते. त्यामुळे सामाजिक वनीकरणात यंदा मग्रारोहयोची कामे करण्याची वेळ आली. सामाजिक वनीकरणात कार्यरत वनपरिक्षेत्र अधिकारी ते वनरक्षक यांना कधीच वेळेत वेतन मिळत नाही. कारण या विभागात वेतनासाठीसुद्धा अनुदान मिळत नाही. परिणामी तीन- तीन महिने वेतन रखडलेले असते.

टॅग्स :forest departmentवनविभागAmravatiअमरावती