शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

बच्चू कडूंची पहिली निवडणूक ‘विमाना’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 23:01 IST

निवडणुकीदरम्यान त्यांच्याकडे जिवाभावाची पहिल्या फळीतील नि:स्वार्थी कार्यकर्ता मंडळी होती. ती राबराब राबली. १९९९ च्या निवडणुकीची मतमोजणी अमरावतीला पार पडली. पहाटेच्या सुमारास या निवडणुकीचा निकाल आला तेव्हा या जिवाभावाच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते. आपला उमेदवार हरला म्हणून रडणारे ते कार्यकर्ते प्रसिद्धी माध्यमांसह अमरावतीकरांच्या नजरेतून सुटले नव्हते.

ठळक मुद्देजीवाभावाची मैत्री : पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांची संख्या घटली

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चू कडू यांनी पहिल्यांदा १९९९ ला ‘विमाना’वर निवडणूक लढवली होती. बच्चू कडूंची ही पहिली निवडणूक. या निवडणुकीत त्यांचे विमान उडता-उडता थोडक्यात माघारले. केवळ २ हजार २२१ मतांनी ही निवडणूक ते हरलेत.निवडणुकीदरम्यान त्यांच्याकडे जिवाभावाची पहिल्या फळीतील नि:स्वार्थी कार्यकर्ता मंडळी होती. ती राबराब राबली. १९९९ च्या निवडणुकीची मतमोजणी अमरावतीला पार पडली. पहाटेच्या सुमारास या निवडणुकीचा निकाल आला तेव्हा या जिवाभावाच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते. आपला उमेदवार हरला म्हणून रडणारे ते कार्यकर्ते प्रसिद्धी माध्यमांसह अमरावतीकरांच्या नजरेतून सुटले नव्हते.यानंतर बच्चू कडू २००४ मध्ये परत निवडणूक रिंगणात उतरले आणि त्याच कार्यकर्त्यांनी त्यांना निवडून आणले. सध्या बच्चू कडू चौथ्यांदा निवडणूक जिंकलेत खरे; पण पहिल्या दोन निवडणुकीतील त्या पहिल्या फळीतील जिवाभावाच्या कार्यकर्त्यांची संख्या घटली. पहिल्या फळीतील अपवादात्मक चार-दोन कार्यकर्ते वगळता, या निवडणुकीत नवे कार्यकर्ते बघायला मिळालेत. किंबहुना आमदारकीच्या व्यापात बच्चू कडूंचेही त्या पहिल्या फळीतील जिवाभावाच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.बच्चू कडू केव्हा, कोणते आंदोलन करतील, कोणता गनिमी कावा मांडतील, याचा नेम नाही. अशातही बच्चूभाऊंचा शब्द अंतिम मानणारे आणि घरच्या शिदोरीवर आंदोलनात उडी घेणारे ते पहिल्या फळीतील कार्यकर्ते, २२ सप्टेंबर २००८ पासून बच्चू कडू यांनी नागरवाडी येथे सपत्नीक केलेले अन्नत्याग आंदोलन, अन्नत्यागानंतर जलत्याग, वेळ पडल्यास जीवन त्यागाची घोषणा करताच त्या जिवाभावाच्या कार्यकर्त्याच्या मनातील कालवाकालव शब्दापलीकडची हीच बच्चू कडूंची जमेची बाजू. चौथ्यांदा विजयी ठरलेल्या बच्चू कडू यांना आता त्या पहिल्या फळीतील जीवाभावाच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. त्यांना मानसन्मानाने परत आपलेसे करण्याची हीच खरी वेळ आहे. जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांसमवेत मेळ बसवून बच्चू कडूंनी त्यांना सोबत ठेवणेही तेवढेच गरजेचे आहे.नेहमीच सत्तेसोबतबच्चू कडू निवडून येताच त्यांनी मतदारसंघाच्या विकासाकरिता सत्तापक्षासोबत राहणे पसंत केले. सत्तापक्षाला त्यांनी पाठिंबा दिला असला तरी स्वत:च्या भूमिकेशी त्यांनी कधीही तडजोड केलेली नाही. २००४ मध्ये राष्टÑवादी पक्षासोबत, २००९ मध्ये काँग्रेससोबत, २०१४ मध्ये भाजपसोबत, तर आता २०१९ मध्ये ते शिवसेनेसोबत आहेत.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू