शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडूंची पहिली निवडणूक ‘विमाना’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 23:01 IST

निवडणुकीदरम्यान त्यांच्याकडे जिवाभावाची पहिल्या फळीतील नि:स्वार्थी कार्यकर्ता मंडळी होती. ती राबराब राबली. १९९९ च्या निवडणुकीची मतमोजणी अमरावतीला पार पडली. पहाटेच्या सुमारास या निवडणुकीचा निकाल आला तेव्हा या जिवाभावाच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते. आपला उमेदवार हरला म्हणून रडणारे ते कार्यकर्ते प्रसिद्धी माध्यमांसह अमरावतीकरांच्या नजरेतून सुटले नव्हते.

ठळक मुद्देजीवाभावाची मैत्री : पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांची संख्या घटली

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चू कडू यांनी पहिल्यांदा १९९९ ला ‘विमाना’वर निवडणूक लढवली होती. बच्चू कडूंची ही पहिली निवडणूक. या निवडणुकीत त्यांचे विमान उडता-उडता थोडक्यात माघारले. केवळ २ हजार २२१ मतांनी ही निवडणूक ते हरलेत.निवडणुकीदरम्यान त्यांच्याकडे जिवाभावाची पहिल्या फळीतील नि:स्वार्थी कार्यकर्ता मंडळी होती. ती राबराब राबली. १९९९ च्या निवडणुकीची मतमोजणी अमरावतीला पार पडली. पहाटेच्या सुमारास या निवडणुकीचा निकाल आला तेव्हा या जिवाभावाच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते. आपला उमेदवार हरला म्हणून रडणारे ते कार्यकर्ते प्रसिद्धी माध्यमांसह अमरावतीकरांच्या नजरेतून सुटले नव्हते.यानंतर बच्चू कडू २००४ मध्ये परत निवडणूक रिंगणात उतरले आणि त्याच कार्यकर्त्यांनी त्यांना निवडून आणले. सध्या बच्चू कडू चौथ्यांदा निवडणूक जिंकलेत खरे; पण पहिल्या दोन निवडणुकीतील त्या पहिल्या फळीतील जिवाभावाच्या कार्यकर्त्यांची संख्या घटली. पहिल्या फळीतील अपवादात्मक चार-दोन कार्यकर्ते वगळता, या निवडणुकीत नवे कार्यकर्ते बघायला मिळालेत. किंबहुना आमदारकीच्या व्यापात बच्चू कडूंचेही त्या पहिल्या फळीतील जिवाभावाच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.बच्चू कडू केव्हा, कोणते आंदोलन करतील, कोणता गनिमी कावा मांडतील, याचा नेम नाही. अशातही बच्चूभाऊंचा शब्द अंतिम मानणारे आणि घरच्या शिदोरीवर आंदोलनात उडी घेणारे ते पहिल्या फळीतील कार्यकर्ते, २२ सप्टेंबर २००८ पासून बच्चू कडू यांनी नागरवाडी येथे सपत्नीक केलेले अन्नत्याग आंदोलन, अन्नत्यागानंतर जलत्याग, वेळ पडल्यास जीवन त्यागाची घोषणा करताच त्या जिवाभावाच्या कार्यकर्त्याच्या मनातील कालवाकालव शब्दापलीकडची हीच बच्चू कडूंची जमेची बाजू. चौथ्यांदा विजयी ठरलेल्या बच्चू कडू यांना आता त्या पहिल्या फळीतील जीवाभावाच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. त्यांना मानसन्मानाने परत आपलेसे करण्याची हीच खरी वेळ आहे. जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांसमवेत मेळ बसवून बच्चू कडूंनी त्यांना सोबत ठेवणेही तेवढेच गरजेचे आहे.नेहमीच सत्तेसोबतबच्चू कडू निवडून येताच त्यांनी मतदारसंघाच्या विकासाकरिता सत्तापक्षासोबत राहणे पसंत केले. सत्तापक्षाला त्यांनी पाठिंबा दिला असला तरी स्वत:च्या भूमिकेशी त्यांनी कधीही तडजोड केलेली नाही. २००४ मध्ये राष्टÑवादी पक्षासोबत, २००९ मध्ये काँग्रेससोबत, २०१४ मध्ये भाजपसोबत, तर आता २०१९ मध्ये ते शिवसेनेसोबत आहेत.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू