शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

बच्चू कडूंची पहिली निवडणूक ‘विमाना’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 23:01 IST

निवडणुकीदरम्यान त्यांच्याकडे जिवाभावाची पहिल्या फळीतील नि:स्वार्थी कार्यकर्ता मंडळी होती. ती राबराब राबली. १९९९ च्या निवडणुकीची मतमोजणी अमरावतीला पार पडली. पहाटेच्या सुमारास या निवडणुकीचा निकाल आला तेव्हा या जिवाभावाच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते. आपला उमेदवार हरला म्हणून रडणारे ते कार्यकर्ते प्रसिद्धी माध्यमांसह अमरावतीकरांच्या नजरेतून सुटले नव्हते.

ठळक मुद्देजीवाभावाची मैत्री : पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांची संख्या घटली

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चू कडू यांनी पहिल्यांदा १९९९ ला ‘विमाना’वर निवडणूक लढवली होती. बच्चू कडूंची ही पहिली निवडणूक. या निवडणुकीत त्यांचे विमान उडता-उडता थोडक्यात माघारले. केवळ २ हजार २२१ मतांनी ही निवडणूक ते हरलेत.निवडणुकीदरम्यान त्यांच्याकडे जिवाभावाची पहिल्या फळीतील नि:स्वार्थी कार्यकर्ता मंडळी होती. ती राबराब राबली. १९९९ च्या निवडणुकीची मतमोजणी अमरावतीला पार पडली. पहाटेच्या सुमारास या निवडणुकीचा निकाल आला तेव्हा या जिवाभावाच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते. आपला उमेदवार हरला म्हणून रडणारे ते कार्यकर्ते प्रसिद्धी माध्यमांसह अमरावतीकरांच्या नजरेतून सुटले नव्हते.यानंतर बच्चू कडू २००४ मध्ये परत निवडणूक रिंगणात उतरले आणि त्याच कार्यकर्त्यांनी त्यांना निवडून आणले. सध्या बच्चू कडू चौथ्यांदा निवडणूक जिंकलेत खरे; पण पहिल्या दोन निवडणुकीतील त्या पहिल्या फळीतील जिवाभावाच्या कार्यकर्त्यांची संख्या घटली. पहिल्या फळीतील अपवादात्मक चार-दोन कार्यकर्ते वगळता, या निवडणुकीत नवे कार्यकर्ते बघायला मिळालेत. किंबहुना आमदारकीच्या व्यापात बच्चू कडूंचेही त्या पहिल्या फळीतील जिवाभावाच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.बच्चू कडू केव्हा, कोणते आंदोलन करतील, कोणता गनिमी कावा मांडतील, याचा नेम नाही. अशातही बच्चूभाऊंचा शब्द अंतिम मानणारे आणि घरच्या शिदोरीवर आंदोलनात उडी घेणारे ते पहिल्या फळीतील कार्यकर्ते, २२ सप्टेंबर २००८ पासून बच्चू कडू यांनी नागरवाडी येथे सपत्नीक केलेले अन्नत्याग आंदोलन, अन्नत्यागानंतर जलत्याग, वेळ पडल्यास जीवन त्यागाची घोषणा करताच त्या जिवाभावाच्या कार्यकर्त्याच्या मनातील कालवाकालव शब्दापलीकडची हीच बच्चू कडूंची जमेची बाजू. चौथ्यांदा विजयी ठरलेल्या बच्चू कडू यांना आता त्या पहिल्या फळीतील जीवाभावाच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. त्यांना मानसन्मानाने परत आपलेसे करण्याची हीच खरी वेळ आहे. जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांसमवेत मेळ बसवून बच्चू कडूंनी त्यांना सोबत ठेवणेही तेवढेच गरजेचे आहे.नेहमीच सत्तेसोबतबच्चू कडू निवडून येताच त्यांनी मतदारसंघाच्या विकासाकरिता सत्तापक्षासोबत राहणे पसंत केले. सत्तापक्षाला त्यांनी पाठिंबा दिला असला तरी स्वत:च्या भूमिकेशी त्यांनी कधीही तडजोड केलेली नाही. २००४ मध्ये राष्टÑवादी पक्षासोबत, २००९ मध्ये काँग्रेससोबत, २०१४ मध्ये भाजपसोबत, तर आता २०१९ मध्ये ते शिवसेनेसोबत आहेत.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू