शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

बच्चू कडू यांना हवे सामाजिक न्याय मंत्रालय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2022 19:03 IST

Amravati News महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत घरठाव केल्यानंतर आता त्यांची नजर सामाजिक न्याय व अपंग कल्याण मंत्रालयावर आहे.

ठळक मुद्दे चांदूर बाजार येथील कार्यक्रमात दिले संकेत

अमरावती : महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत घरठाव केल्यानंतर आता त्यांची नजर सामाजिक न्याय व अपंग कल्याण मंत्रालयावर आहे. मंगळवारी अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी तसे संकेतही दिले आहेत.

कॅबिनेट मंत्री किंवा विशिष्ट खात्याचा आपण आग्रह धरला नसला तरी अपंगांच्या सेवेसाठी सामाजिक न्याय विभागाची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. रुग्ण आणि अपंगांची सेवा हाच समाजकार्याचा पिंड असल्याने आपण राजकारणात आलो. सामाजिक न्याय विभागाची संधी मिळाल्यास जनसेवेचा हा रथ अधिक जोमाने हाकता येईल, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

चांदूर बाजार तालुका प्रहार जनशक्ती पक्षाकडून आयोजित कार्यक्रमात त्यांनी गेल्या १५ दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर प्रकाश टाकला. माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा जेव्हा आठ खासदारांच्या बळावर देशाचे पंतप्रधान होऊ शकतात, तर भविष्यात प्रहारचा मुख्यमंत्री का होऊ शकत नाही, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आपण एकनाथ शिंदे यांच्यामुळेच महाविकास आघाडीत सामील झालो होतो. त्यामुळे आताही आपण त्यांच्यासोबतच आहोत. शिवसेनेतील गटबाजीमुळे उद्धव ठाकरे यांचे जहाज बुडताना दिसत होते. तेव्हा सेनेसह अपक्ष आमदारांनी शिंदे यांना साथ दिली. त्यामुळेच शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू