शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

बाल आरोग्याला ‘विषाणूजन्य तापा’चा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 22:08 IST

ताप, सर्दी व खोकल्याने चिमुरड्यांना वेढल्याचे शासकीय आकडेवारीवरून सिद्ध होत आहे.

ठळक मुद्देखबरदारी घेणे एकमेव उपाय; दरदिवसाला दहा ते पंधरा रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ताप, सर्दी व खोकल्याने चिमुरड्यांना वेढल्याचे शासकीय आकडेवारीवरून सिद्ध होत आहे. बालकांना व्हायरल फिव्हर (विषाणूजन्य) तापाचा विळखा आवळत आहे. दरदिवसाला दहा ते पंधरा रूग्ण शासकीय रूग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल होत आहेत. ही आकडेवारी केवळ शासकीय दवाखान्यांची असून खासगी रूग्णालयातील रूग्णांची संख्या यापेक्षा अधिक असू शकते. केवळ खबरदारी घेणे, हाच यावरील उपाय असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.वातावरणातील बदलामुळे निर्माण होणाºया हवेतील विषाणूंमुळे बाल आरोग्य धोक्यात आले आहे. केवळ लहानांनाच नव्हे तर ज्येष्ठांना देखील विषाणूजन्य तापाची बाधा होत असल्याचे चित्र आहे. सर्दी, खोकला आणि ताप अशा लक्षणांसह आढळणारा हा आजार तब्बल आठवडाभर ठाण मांडून राहतो. पावसाळ्यात साधारणत: सर्दी, खोकला व तापाची लक्षणे सर्वाधिक आढळून येतात.यंदा पावसाळा वेळेवर सुरू झाला नाही. पावसाने मोठी दडी दिली. त्यामुळे वातावरणातही बदल झालेत.खबरदारी घेणे एकमेव उपाय; दरदिवसाला दहा ते पंधरा रुग्ण२३ दिवसात ९५६ तापाचे रुग्णजुलैच्या २३ दिवसांत विषाणूजन्य तापाने बाधित तब्बल ९५६ रूग्णांना इर्विनमध्ये दाखल करण्यात आले. यामध्ये ४५० बालरूग्णांचा समावेश आहे. ही शासकीय आकडेवारी असून खासगी क्षेत्रातही हिच स्थिती आहे. शासकीय रूग्णालयांमध्ये ७६६ रूग्णांची तपासणी केल्यानंतर १८१ टायफॉईडबाधित रूग्ण आढळून आलेत.वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य तापाचा प्रादुर्भाव वाढला आहे. स्वच्छतेची काळजी, पोषक आहार घेणे, रोेगप्रतिकारक क्षमता वाढविणे गरजेचे आहे. योग्य काळजी घेऊनच बचाव करता येऊ शकतो.-नीलेश पवार, बालरोगतज्ज्ञ