शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

बी.एड्.,एम.एड्.पदवी आता दोन वर्षांची

By admin | Updated: January 5, 2015 22:56 IST

कला, विज्ञान व वाणिज्य शाखेत तीन वर्षे पदवी संपादन करुन केवळ एक वर्षाची बी.एड. पदवी प्राप्त केली की झाले शिक्षक...! ही रुढ पद्धत येत्या शैक्षणिक वर्षापासून थांबणार आहे.

अमरावती : कला, विज्ञान व वाणिज्य शाखेत तीन वर्षे पदवी संपादन करुन केवळ एक वर्षाची बी.एड. पदवी प्राप्त केली की झाले शिक्षक...! ही रुढ पद्धत येत्या शैक्षणिक वर्षापासून थांबणार आहे. आता शिक्षक होणे सोपे राहणार नाही. कारण बी.एड., एम.एड. व बी.पी.एड. या पदव्या जूनपासून दोन वर्षाच्या होत आहेत. भावी शिक्षकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी राष्ट्रीय शिक्षणशास्त्र परिषदेने (एनसीटीई) येत्या शैक्षणिक वर्षापासून हा बदल अमलात आणण्याचे ठरविले आहे. १९९३ नंतर प्रथम परिषदेने अशा प्रकारे बदल केले आहेत.राष्ट्रीय शिक्षण शास्त्र परिषदेने याचा निर्णय जाहीर केला असून, भारत सरकारच्या राजपत्रात याची अधिसूचना प्रसिध्द झाली आहे. राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण समिती (एनसीटीई), मानव संसाधन आणि विकास खाते (एमएचआरडी) यांनी हा प्रस्ताव ठेवला होता. जूनपासून राज्यात ३३८ बी.एड. महाविद्यालयांमध्ये आता दोन वर्षासाठी यंदा प्रवेश मिळणार आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रम चार वर्षे आणि एमबीबीएस अभ्यासक्रम पाच वर्षाचा असतो. या पार्श्वभूमीवर बी.एड. अभ्यासक्रमाचे गांभीर्य अनुभवण्यासाठी शिक्षणतज्ज्ञांनी हा निर्णय घेतला आहे. तीन वर्षाची पदवी आणि त्यानंतर दोन वर्षांचा बी.एड. अभ्यासक्रम म्हणजेच आता शिक्षक होण्यासाठी पदवीसह पाच वर्षे लागणार आहेत. (प्रतिनिधी)