शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

बी.एड्.,एम.एड्.पदवी आता दोन वर्षांची

By admin | Updated: January 5, 2015 22:56 IST

कला, विज्ञान व वाणिज्य शाखेत तीन वर्षे पदवी संपादन करुन केवळ एक वर्षाची बी.एड. पदवी प्राप्त केली की झाले शिक्षक...! ही रुढ पद्धत येत्या शैक्षणिक वर्षापासून थांबणार आहे.

अमरावती : कला, विज्ञान व वाणिज्य शाखेत तीन वर्षे पदवी संपादन करुन केवळ एक वर्षाची बी.एड. पदवी प्राप्त केली की झाले शिक्षक...! ही रुढ पद्धत येत्या शैक्षणिक वर्षापासून थांबणार आहे. आता शिक्षक होणे सोपे राहणार नाही. कारण बी.एड., एम.एड. व बी.पी.एड. या पदव्या जूनपासून दोन वर्षाच्या होत आहेत. भावी शिक्षकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी राष्ट्रीय शिक्षणशास्त्र परिषदेने (एनसीटीई) येत्या शैक्षणिक वर्षापासून हा बदल अमलात आणण्याचे ठरविले आहे. १९९३ नंतर प्रथम परिषदेने अशा प्रकारे बदल केले आहेत.राष्ट्रीय शिक्षण शास्त्र परिषदेने याचा निर्णय जाहीर केला असून, भारत सरकारच्या राजपत्रात याची अधिसूचना प्रसिध्द झाली आहे. राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण समिती (एनसीटीई), मानव संसाधन आणि विकास खाते (एमएचआरडी) यांनी हा प्रस्ताव ठेवला होता. जूनपासून राज्यात ३३८ बी.एड. महाविद्यालयांमध्ये आता दोन वर्षासाठी यंदा प्रवेश मिळणार आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रम चार वर्षे आणि एमबीबीएस अभ्यासक्रम पाच वर्षाचा असतो. या पार्श्वभूमीवर बी.एड. अभ्यासक्रमाचे गांभीर्य अनुभवण्यासाठी शिक्षणतज्ज्ञांनी हा निर्णय घेतला आहे. तीन वर्षाची पदवी आणि त्यानंतर दोन वर्षांचा बी.एड. अभ्यासक्रम म्हणजेच आता शिक्षक होण्यासाठी पदवीसह पाच वर्षे लागणार आहेत. (प्रतिनिधी)