शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

भयंकर! दिवसभरात १२ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 05:00 IST

जिल्ह्यात २ एप्रिलला शहरातील हाथीपुरा भागात पहिल्या संक्रमिताचा मृत्यू झाला होता. त्यांचा अहवाल ४ एप्रिलला पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने हा जिल्ह्यातला पहिला संक्रमित रुग्ण अन् कोरोनाचा पहिला मृत्यू ठरला. त्यानंतरच्या दोन आठवड्यांत या भागात ६ होमडेथ झाल्यात. या सर्व वयस्क व्यक्तींच्या मृत्यूपश्चात त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.

ठळक मुद्देकहर : पाच महिन्यांत १७५, जिल्ह्यात २.३४ टक्के प्रमाण, आवळतोय मृत्यूचा फास

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताच आहे. या आठवड्यात संक्रमितांचे चार उच्चांक झाले असतानाच उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू होण्याचेही प्रमाण वाढले आहे. दरम्यान, गुरुवारी १२ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. आतापर्यंतही ही सर्वाधिक मृत्यूसंख्या आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत तब्बल ४० रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यत १७५ संक्रमितांचा मृत्यू झाला. हे प्रमाण आता २.३४ टक्क्यांपर्यत आहे.जिल्ह्यात २ एप्रिलला शहरातील हाथीपुरा भागात पहिल्या संक्रमिताचा मृत्यू झाला होता. त्यांचा अहवाल ४ एप्रिलला पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने हा जिल्ह्यातला पहिला संक्रमित रुग्ण अन् कोरोनाचा पहिला मृत्यू ठरला. त्यानंतरच्या दोन आठवड्यांत या भागात ६ होमडेथ झाल्यात. या सर्व वयस्क व्यक्तींच्या मृत्यूपश्चात त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. महापालिका हद्दीत ऑगस्टपर्यंत झालेल्या संक्रमितांच्या मृत्यंूच्या कारणांचे पृथ:करण करण्यात आले असता सर्वाधिक मृत्यू ५० ते ७० या वयोगटातील रुग्णांचे व त्यांना कोरोनाच्या संसर्गासह इतरही आजार असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आलेले आहे.जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अहवालानुसार जिल्ह्यात शासकीय व खासगी अशा २१ हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु आहेत. या सर्व ठिकाणी आयसीयूचे २०२ बेड, व्हेंटीलेटरसाठी १०५ बेड व ऑक्सीजनचे २०० बेडची सुविधा असल्याचे सांगण्यात आले. आता पीडीएमसी , सुपरस्पेशालिटी व जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सीजन टँक लावण्यात येणार आहे.सप्टेंबरच्या दहा दिवसात ४० रुग्णांचा मृत्यूजिल्ह्यात सप्टेंबरमध्ये कोरोनाचा ब्लास्ट झालेला आहे. यामध्ये १ तारखेला मृत्यूची संख्या १३५ होती. यामध्ये ४ मृत्यू, २ तारखेला १ मृत्यू, ३ तारखेला ४ मृत्यू, ४ तारखेला ७ मृत्यू, ५ तारखेला ३ मृत्यू, ६ तारखेला ३ मृत्यू, ७ तारखेला ५ मृत्यू, ८ तारखेला २ मृत्यू, ९ तारखेला ३ मृत्यू व १० तारखेला १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या संक्रमितांची संख्या १७५ वर पोहोचली आहे.अशी आहे गुरुवारची मृत्यू संख्याजिल्ह्यात गुरुवारी ज्या १२ व्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये सर्वाधिक कमी २७ वर्षांचा युवक एसआरपीएफ कॅम्प येथील व सर्वाधिक वयस्क शोभा नगरातील ७३ वर्षाचे वृद्ध आहेत. चांदूर रेल्वे तालुक्यातील कवठा येथे ५० वर्षीय, साईनगरात ७२ वर्षीय, भाजीबाजारात ६२ वर्षीय, रुख्मणी नगरात ६८ वर्षीय, कंवरनगरात ६७ वर्षीय, वरुड तालुक्यातील लोणी येथे ४८ वर्षीय, भातकुली येथे ६० वर्षीय व अमरनगरात ६१ वर्षीय पुरुष तसेच सोनल कॉलनीत ७० वर्षीय व रविनगरात ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याDeathमृत्यू