शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

आवागड-माखला रस्ता उठला आदिवासींच्या जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 05:00 IST

रस्त्यावर होणाऱ्या शेवाळ, मातीच्या थराने दुचाकीस्वाराचे घसरून अपघात होत आहेत. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने याकडे जातीने लक्ष द्यावे, अशी मागणी या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे नाल्यातील पाण्याची आवक अचानक वाढल्याने रस्ता खरडून व वाहून गेला आहे. खरडलेल्या रस्त्यातून दुचाकीस्वार जीव धोक्यात टाकून प्रवास करीत आहेत. या अपघात होत आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : तालुक्यातील अतिदुर्गम माखला-आवागड रस्ता यावर्षी पावसाळ्यात जवळपास दोन किमीपर्यंत खचलेला होता. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणारा हा रस्ता पुन्हा परतीच्या पावसाने धोकादायक बनला आहे.  रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत आल्याने दरडीचे दगड रस्त्यावर आले आहेत. तीन पुलांखालून वाहणारे पाणी पाइप माती-दगडाने बंद झालेला आहे. परिणामी पुलावरून सतत पाणी वाहत आहे. त्यामुळे रस्त्यावर होणाऱ्या शेवाळ, मातीच्या थराने दुचाकीस्वाराचे घसरून अपघात होत आहेत.जिल्हा परिषद बांधकाम विभागाने याकडे जातीने लक्ष द्यावे, अशी मागणी या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे नाल्यातील पाण्याची आवक अचानक वाढल्याने रस्ता खरडून व वाहून गेला आहे. खरडलेल्या रस्त्यातून दुचाकीस्वार जीव धोक्यात टाकून प्रवास करीत आहेत. या अपघात होत आहेत. 

नऊ गावातील दळणवळणाचा प्रमुख मार्ग अतिदुर्गम अशा भागातील येणारा हा रस्ता आठ ते नऊ गावांना एकमेकांशी तसेच तालुका मुख्यालय तथा प्राथमिक आरोग्य केंद्राशी जोडणारा आहे. हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे. अतिवृष्टीने तालुक्यातील अनेक रस्ते पूर्णत: खराब झाले आहेत. माखला-आवागड रस्ता दुरुस्तीची मागणी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पीयूष मालवीय यांनी केली आहे. पालकमंत्री याविषयी सकारात्मक असल्या तरी व्याघ्र प्रकल्पामुळे कामात अडथळे येत आहेत. 

महिनाभर बंद होता रस्तापावसाळा सुरू होताच माखला परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने हा रस्ता जवळपास एक महिना बंद होता. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या प्रयत्नाने तात्पुरती दुरुस्ती करून रस्ता पूर्ववत केला तरी तो कायमस्वरूपी न झाल्याने अपघाताला आमंत्रण देणारा ठरला आहे. 

माखला-अवागड रस्ता तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी प्रशासनाला निवेदनाद्वारे केली आहे. व्याघ्र प्रकल्प आणि त्याचे जाचक नियम आदिवासींच्या जिवावर उठणारे ठरत आहेत. रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.- पीयूष मालवीय,उपाध्यक्ष, युवक कांग्रेस, मेळघाट

 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक