शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

आवागड-माखला रस्ता उठला आदिवासींच्या जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 05:00 IST

रस्त्यावर होणाऱ्या शेवाळ, मातीच्या थराने दुचाकीस्वाराचे घसरून अपघात होत आहेत. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने याकडे जातीने लक्ष द्यावे, अशी मागणी या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे नाल्यातील पाण्याची आवक अचानक वाढल्याने रस्ता खरडून व वाहून गेला आहे. खरडलेल्या रस्त्यातून दुचाकीस्वार जीव धोक्यात टाकून प्रवास करीत आहेत. या अपघात होत आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : तालुक्यातील अतिदुर्गम माखला-आवागड रस्ता यावर्षी पावसाळ्यात जवळपास दोन किमीपर्यंत खचलेला होता. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणारा हा रस्ता पुन्हा परतीच्या पावसाने धोकादायक बनला आहे.  रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत आल्याने दरडीचे दगड रस्त्यावर आले आहेत. तीन पुलांखालून वाहणारे पाणी पाइप माती-दगडाने बंद झालेला आहे. परिणामी पुलावरून सतत पाणी वाहत आहे. त्यामुळे रस्त्यावर होणाऱ्या शेवाळ, मातीच्या थराने दुचाकीस्वाराचे घसरून अपघात होत आहेत.जिल्हा परिषद बांधकाम विभागाने याकडे जातीने लक्ष द्यावे, अशी मागणी या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे नाल्यातील पाण्याची आवक अचानक वाढल्याने रस्ता खरडून व वाहून गेला आहे. खरडलेल्या रस्त्यातून दुचाकीस्वार जीव धोक्यात टाकून प्रवास करीत आहेत. या अपघात होत आहेत. 

नऊ गावातील दळणवळणाचा प्रमुख मार्ग अतिदुर्गम अशा भागातील येणारा हा रस्ता आठ ते नऊ गावांना एकमेकांशी तसेच तालुका मुख्यालय तथा प्राथमिक आरोग्य केंद्राशी जोडणारा आहे. हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे. अतिवृष्टीने तालुक्यातील अनेक रस्ते पूर्णत: खराब झाले आहेत. माखला-आवागड रस्ता दुरुस्तीची मागणी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पीयूष मालवीय यांनी केली आहे. पालकमंत्री याविषयी सकारात्मक असल्या तरी व्याघ्र प्रकल्पामुळे कामात अडथळे येत आहेत. 

महिनाभर बंद होता रस्तापावसाळा सुरू होताच माखला परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने हा रस्ता जवळपास एक महिना बंद होता. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या प्रयत्नाने तात्पुरती दुरुस्ती करून रस्ता पूर्ववत केला तरी तो कायमस्वरूपी न झाल्याने अपघाताला आमंत्रण देणारा ठरला आहे. 

माखला-अवागड रस्ता तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी प्रशासनाला निवेदनाद्वारे केली आहे. व्याघ्र प्रकल्प आणि त्याचे जाचक नियम आदिवासींच्या जिवावर उठणारे ठरत आहेत. रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.- पीयूष मालवीय,उपाध्यक्ष, युवक कांग्रेस, मेळघाट

 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक