शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयी राहण्यास कर्मचाऱ्यांची टाळाटाळ

By admin | Updated: November 10, 2014 22:37 IST

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी या आरोग्य केंद्रात उपस्थित राहण्याऐवजी सतत भातकुली येथील आरोग्य केंद्रात उपस्थित राहात असल्याने येथील रूग्णांचे हाल होत आहेत.

आसरा (भातकुली): येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी या आरोग्य केंद्रात उपस्थित राहण्याऐवजी सतत भातकुली येथील आरोग्य केंद्रात उपस्थित राहात असल्याने येथील रूग्णांचे हाल होत आहेत. शिक्षक, डॉक्टर, तलाठी, ग्रामसेवक, लाईनमन यापैकी कोणीही कायमस्वरूपी मुख्यालयी राहात नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत.राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले आहे. असे असूनही बहुतांश ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. आरोग्य विभागही यास अपवाद नाही. अनेक ठिकाणी डॉक्टरच नेमून दिलेल्या रूग्णालयात राहात नसल्याने रूग्णांना हेलपाटे घ्यावे लागतात. शेवटी आर्थिक ताण सहन करून खासगी दवाखान्यांमधून उपचार करून घ्यावे लागतात. आसरा गावात तर हे चित्र अधिकच विदारकपणे समोर आले आहे. या गावात दोन तलाठी आहेत. परंतु हे तलाठी केवळ २६ जानेवारी आणि १५ आॅगस्ट या दोन दिवशीच गावकऱ्यांच्या दृष्टीस पडतात. इतर दिवशी यांचा पत्ता नसतो. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक महत्वाच्या कामांसाठी महिनोन्गणती प्रतीक्षा करावी लागते. या कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे ग्रामस्थांचे मात्र हाल होत आहेत. सद्यस्थितीत एक कोतवाल गावचा कारभार पाहात आहे. आसरा येथील ग्रामसेवकांना भातकुलीचा कार्यभारदेखील सोपविण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना भातकुलीत येणे-जाणे करावे लागते. परिणामी त्यांना आसरा गावातील समस्यांकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे आसार गाववासीयांच्या अडचणी रखडल्या आहेत. विद्युत कर्मचाऱ्यांचीही तीच गत आहे. आसरा येथे स्थायी स्वरूपात राहणारा एकही वीज कर्मचारी नाही. त्यामुळे ऐनवेळी, रात्री-बेरात्री विजेची समस्या उदभवल्यास नागरिकांना एक तर अंधारात रात्र काढावी लागते किंवा शहरात जाऊन लाईनमन आणावा लागतो. शिक्षक, डॉक्टर, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी कुणीही आसरा येथे कायमस्वरूपी राहात नसल्याने येथील ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. समस्या नेमकी मांडावी तरी कुणापुढेय असा प्रश्न त्यांच्या समक्ष उपस्थित झाला आहे. आसरा गावात ग्रामपंचायत कार्यालयानजीकच्या एका खोलीत पोलीस चौकी, आसरा असा फलक बऱ्याच दिवसांपासून लागलेला आहे. परंतु याठिकाणी एकही पोलीस कर्मचारी आजवर ग्रामस्थांना आढळून आलेला नाही. या पोलीस चौकीला नेहमीच कुलूप असते. गावात आपातकालिन स्थिती उदभवल्यास बाहेरून कुमक येईपर्यंत वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही. याबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणतीच दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये रोष वाढीस लागला आहे. गावातील समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. याबाबत कोणाकडे तक्रार करावी, अशा पेचात ग्रामवासी अडकले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सर्वच विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी.