शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जलसंकट टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 23:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पावसाच्या दमदार ‘कमबॅक’ मुळे जिल्ह्यावरील कोरड्या दुष्काळाचे संकट टळले आहे. अमरावती जिल्ह्यातील तीन मंडळांमध्ये अतिवृष्टी झालअसून हवामान खात्याने पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. अमरावतीकरांना पाणीपुरवठा करणाºया उर्ध्व वर्धा धरणातही सातत्याने पावसाचा येवा सुरूच असल्याने दुपारी दोन वाजेपर्यंत या धरणात ९४ टक्के पाण्याची नोंद करण्यात ...

ठळक मुद्देपावसाचे ‘कमबॅक’ : तीन तालुक्यांत अतिवृष्टी; सतर्कतेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पावसाच्या दमदार ‘कमबॅक’ मुळे जिल्ह्यावरील कोरड्या दुष्काळाचे संकट टळले आहे. अमरावती जिल्ह्यातील तीन मंडळांमध्ये अतिवृष्टी झालअसून हवामान खात्याने पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. अमरावतीकरांना पाणीपुरवठा करणाºया उर्ध्व वर्धा धरणातही सातत्याने पावसाचा येवा सुरूच असल्याने दुपारी दोन वाजेपर्यंत या धरणात ९४ टक्के पाण्याची नोंद करण्यात आली. अशीच स्थिती राहिल्यास येत्या ४८ तासांत धरणाचे दरवाजे उघडण्याचे संकेत धरण प्रशासनाने दिले आहेत.मंगळवार व बुधवारी नागपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जांब व वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे अप्पर वर्धा धरणात जलसाठा वाढला आहे. त्याअनुषंगाने नदी काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. आठवडाभरापूर्वी सिंभोरा धरणातील अत्यल्प पाणीसाठ्याने मजिप्रासह नागरिक आणि शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळविले होते. त्यामुळेच यावर्षी धरण शंभर टक्के भरेल की नाही, याची शाश्वती नसल्याने पाणीकपातीचे धोरण अवलंबिले जात होते. मात्र, पण बुधवारी नागपूर जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे काटोल तालुक्यातील जांब व वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे धरणाची पातळी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सिंभोरा ते कोंडण्यपूर पर्यंतच्या नदीकाठावरील गावांसह तसेच वर्धा जिल्ह्यातील देऊरवाडापर्यंतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी सांगितले.मध्यप्रदेशवर कमी दाबाचे क्षेत्रअमरावती : अमरावती तालुक्यातील शिराळा मंडळात ८५ मि.मी. तर अचलपूर तालुक्यातील अचलपूर मंडळात १००.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. अचलपूरात अतिवृष्टी झाली आहे. परतवाडा मंडळात ७३.३ मि.मी. व वरूड तालुक्यातील पुसला मंडळात ७५मि.मी.पाऊस झाला आहे. खोलगट भागातील रहिवाशांना व नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मध्यप्रदेशवर ठळकपणे कमी दाबाचे क्षेत्र राहणार असून चक्राकार वारे वाहणार आहेत. मध्य महाराष्ट्र, गुजरात, कोकणवर चक्राकार वारे असून कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच गोवा ते कर्नाटक कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे.नागपूर जिल्ह्यात बुधवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली असून जांब व वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे अप्पर वर्धा धरण ९४ टक्के भरले आहे. पाऊस असाच सुरु राहिल्यास दोन दरवाजे उघडले जातील. नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.- प्रमोद पोटफोडे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभागबहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडणार असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर शुक्रवारपासून चार दिवस विखुरलेला पाऊस राहणार आहे.- अनिल बंड,हवामान तज्ज्ञ अमरावती. 

पाणलोेटक्षेत्रात ७२१ मिमि पाऊसअप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत ७२१ मि.मी. पाऊस झाला आहे. १५ आॅक्टोबरपर्यंत वार्षिक ९०० मि.मी.पाऊस अपेक्षित आहे. पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे २४ तासांत जलसाठ्यात ७ टक्यांनी वाढ झाली आहे. संभाव्य पाणीटंचाईची समस्या आता दूर झाली आहे. नागपूर जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी ५३ मि.मी. पाऊस झाल्याची माहिती आहे. अप्परवर्धा धरणाचा जलसाठा समाधानकारक असल्याने आता शहरात पाणीटंचाई भेडसावणार नाही.नागरिकांना मिळणार दिलासापावसाच्या प्रदीर्घ दडीमुळे अप्परवर्धा धरणातील जलस्तर खालावला होता. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई निस्तरण्यासाठी जीवन प्राधिकरण व महापालिकेच्या अधिकाºयांनी यासंदर्भात बैठक घेऊन शहरात काही ठिकाणी दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला होता. तसेच सिंचनाच्या पाण्यातही कपात केली होती. मात्र आता धरण ९४ टक्के भरल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. हवामान विभागाने दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याने येत्या ४८ तासांत अप्परवर्धा धरणाचे दोन दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे.२४ तासांत २०.५ मिमीगेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २०.५ मिमी पाऊस पडला. यातही प्रामुख्याने उर्ध्व वर्धा प्रकल्प क्षेत्रातील मोर्शी तालुक्यात ४२.४ व वरूड तालुक्यात ४८.१ मिमी पाऊस पडला. तसेच मध्यप्रदेशात देखील दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने उर्ध्व वर्धा प्रकल्पात पाण्याचा येवा वाढला आहे.प्रकल्पांमधील जलसाठाशहानूर प्रकल्पात ४१.५३ टक्के, चंद्रभागा ६३.५९ टक्के सपन ७०.३४ टक्के जलसाठा आहे. चांदूरबाजारमधील पूर्णा प्रकल्यात ९२ टक्के पाणी असून तीन गेट १० सें.मी.ने उघडले आहेत.