शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

लघुउद्योगास वीज जोडणी देण्यास टाळाटाळ

By admin | Updated: March 18, 2015 00:20 IST

स्वयंरोजगारासाठी शासन बेरोजगारांना प्रोत्साहित करत अनेक योजना सुरू करीत आहेत.

नांदगाव खंडेश्वर : स्वयंरोजगारासाठी शासन बेरोजगारांना प्रोत्साहित करत अनेक योजना सुरू करीत आहेत. मात्र शासनाचेच काही विभागाच्या असहकार्याने मुळ उद्देशालाच खिळ बसत असल्याचा प्रकार नांदगाव खंडेश्वर येथे घडला आहे. लघूउद्योगासाठी वीज जोडणीनाकारणाऱ्या बेरोजगारांनी १८ मार्चपासून अमरावतीच्या विद्युत भवन कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.लाखावर रक्कमेचा भरणा केल्यावर वीज जोडणी देण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांना परिवाराचा चरितार्थ चालविणे कठीण झाले आहे. कर्जाचे हप्ते सुरू झालेत. परिणामी लघूउद्योजकांनी १८ मार्चपासून अमरावती विद्युत भवन कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचे पत्र दिले आहे. नांदगाव खंडेश्वर येथील बेरोजगार युवक सुशील शेंडे व मयुर मंडलीक यांनी पंतप्रधान स्वयंरोजगार योजने अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्राद्वारा जैविक कोळसा (व्हाईट कोल) लघूउद्योगाकरीता प्रस्ताव सादर केला. त्यांना सेंट्रल बँक आॅफ इंडियाने पतपुरवठा केला. कारखान्यासाठी आवश्यक शेड, मशिनरी, धर्मकाटा आदीची उभारणी त्यांनी केली. १६ सप्टेंबर २०१४ ला प्रकल्पास वीज जोडणीसाठी अर्ज सादर केला. वीज कंपनीच्या मागणीनुसार १२ जानेवारी २०१५ ला १,११,३०० रूपयांचा भरणा देखील मात्र अद्यापपर्यंत त्यांना वीज जोडणी न देता टाळाटाळ करण्यात येत आहे. वारंवार पाठपुरावा करून जोडणी करण्यात येत नसल्याने त्यांनी १८ मार्चपासून अमरावती येथील विद्युत भवनासमोर उपोषणाला बसण्याचा ईशारा दिला आहे. यासंदर्भात वीज कंपनीचे सहाय्यक अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. (प्रतिनिधी)