शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

मीटर आहे पण ते नावालाच, तशीच धावते ऑटोरिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 16:41 IST

अमरावती महानगरात जवळपास सर्वच ऑटोरिक्षांना मीटर बसविले आहे. मात्र, ते नावापुरतेच असून, मीटरने कोणताही प्रवासी ना भाडे देतो, ना ऑटोरिक्षा चालक मीटर चालू करतात. जवळपास सर्वच मार्गांवर किमीप्रमाणे ऑटोरिक्षांचे भाडे निश्चित आहे.

ठळक मुद्देमहानगरात बहुतांश मार्गांवरील भाडे निश्चितच

अमरावती : मुंबई, पुणे या बड्या शहरांच्या तुलनेत अमरावती महानगरात जवळपास सर्वच ऑटोरिक्षांना मीटर बसविले आहे. मात्र, ते नावापुरतेच असून, मीटरने कोणताही प्रवासी ना भाडे देतो, ना ऑटोरिक्षा चालक मीटर चालू करतात. जवळपास सर्वच मार्गांवर किमीप्रमाणे ऑटोरिक्षांचे भाडे निश्चित आहे.

अमरावती महानगरात पाच हजार ऑटोरिक्षा असल्याची नोंद येथील प्रादेशिक परिवहन विभागात करण्यात आली आहे. ऑटोरिक्षा पॉसिंगच्या वेळी प्रत्येक ऑटोला मीटर असतेच. त्याशिवाय आरटीओ ऑटोरिक्षाचे पॉसिंग करीत नाही. मात्र, शहरात ऑटोरिक्षाला मीटर असताना ते केवळ शोभेची वास्तू ठरली आहे. ऑटोरिक्षाने कोणत्याही भागाचा प्रवास करायचा असल्यास प्रतिव्यक्तीनिहाय भाडे ठरले आहे. किंबहुना ऑटोरिक्षा स्पेशल प्रवास करायचा असल्यास तसे भाडे आकारले जाते. प्रवाशांना परवडले तर ते ऑटोरिक्षाने प्रवास करतात. अन्यथा भाडेतत्त्वावर ऑटोने ये-जा करतात. मात्र, अमरावती महानगराच्या कोणत्याही मार्गाने ऑटाेरिक्षाने प्रवास करायचे ठरविल्यास कोणीही मीटरने भाडे देत नाही वा ऑटोरिक्षा चालक मीटरने भाडे घेत नाही.

प्रवास अंतरानुसार ठरते भाडे

शहर असो वा ग्रामीण कुठेही ऑटोरिक्षाने प्रवास करायचा असल्यास अंतरानुसार ऑटोरिक्षांचे भाडे ठरविण्यात आले आहे, तसेच महानगरातही विशिष्ट मार्ग, रस्ते, काही ठिकाणावर ये-जा करण्यासाठी ऑटोरिक्षाचे भाडे आकारले जाते. मीटरने कोणीही भाडे देत नाही.

रिक्षामीटर शोभेलाच

शहरात प्रत्येक ऑटोरिक्षाला मीटर बसविण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन नियमावलीनुसार ऑटोरिक्षांचे भाडे हे मीटरनुसार आकारणे अपेक्षित आहे. मात्र, अमरावतीकर जनतेला ऑटोरिक्षाला मीटर असते हे माहितीच नाही, ही वस्तुस्थिती आहे. मार्ग, ठिकाणानुसार निश्चित भाडे दिले की ऑटोरिक्षाने प्रवास केला जातो.

शेअर रिक्षा सर्वात मोठी डोकेदुखी

ऑटो रिक्षात मीटर असले तरी कोणताही चालक मीटरने भाडे आकारत नाही. त्यामुळे शेअर रिक्षाने प्रवास करणे महागडे आहे. प्रति प्रवासी भाडे आकारणीनुसार प्रवास करायचा असल्यास ऑटो रिक्षात पूर्णपणे प्रवासी गोळा करेपर्यंत थांबावे लागते. ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे.

येथे करा तक्रार

ऑटो रिक्षा असो वा शहर बस, एसटी संदर्भात काही तक्रार असल्यास प्रवाशांना येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात ०७२१/ २६६२०३२ या क्रमांकावर तक्रार नोंदवावी. तसेच आरटीओच्या संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. 

‘‘ मुंबई येथून बडनेरा रेल्वे स्थानकावर आलो असता विद्यापीठात जायचे होते. मात्र, ऑटोरिक्षा चालकाला मीटर सुरू कर असे म्हटले. पण, मीटरने नव्हे तर, २०० रुपये भाडे लागेल, असे रिक्षा चालक म्हणाला. त्यानुसार भाडे द्यावे लागले.

- प्रशांत वाघमारे, प्रवासी.

शहरात प्रत्येक ऑटोरिक्षाला मीटर बसविले आहे. त्याशिवाय ऑटोरिक्षाची पॉसिंग होत नाही. मात्र, प्रवासी परवडेल त्यानुसार ऑटाेरिक्षाने प्रवास करतात. मुंबई, पुण्यासारखी येथे ऑटोरिक्षा मीटरची सक्ती करता येत नाही.

- सिद्धार्थ ठोके, आरटीओ, अमरावती.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षा