शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

वीज कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे पडेल महागात; जावे लागेल तुरुंगात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 13:28 IST

Amravati : जिल्ह्यातील ३ हजार ग्राहकांची वीज कापली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महावितरण कार्यालयाने थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांनी वीज बिल भरलेले नाही, अशांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वेळा वीज तोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ग्राहकांकडून हल्ला केल्याच्या घटना घडतात. मागील दोन महिन्यांत जिल्ह्यात अशा चार घटना घडल्या असून, दोघांविरुद्ध एफआयआर करण्यात आल्याची माहिती महावितरण कार्यालयाने दिली.

महावितरणने थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. फेब्रुवारीच्या २० दिवसांत बिल भरण्यास सहकार्य न करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील ३ हजार ८८ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. एकूण थकबाकी आणि पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय या ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार नाही. आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटच्या कालावधीत वसुलीचे महावितरणन कंपनीसमोर आहे. वाढत्या थकबाकीमुळे महावितरण कंपनीला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

दोन महिन्यांत महावितरणच्या ४ कर्मचाऱ्यांवर हल्लेजिल्ह्यात मागील दोन महिन्यांमध्ये वीज बिलाच्या वसुलीदरम्यान चार ते पाच कर्मचाऱ्यांवर ग्राहकांनी, तसेच नातेवाइकांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. यासंदर्भात काहींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात महावितरणची थकबाकी कितीजानेवारी अखेर जिल्ह्यातील कृषी ग्राहक, पाणीपुरवठा व पथदिव्यांचे ग्राहक वगळून परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे ११० कोटी ७५ लाखांचा समावेश आहे. यामध्ये फेब्रुवारी महिन्यात ३८ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहे.

परिमंडळात २३१ कोटीची थकबाकीअमरावती परिमंडळा अंतर्गत अमरावती व यवतमाळ असे दोन जिल्हे येतात. या दोन्ही जिल्ह्यात महावितरण कंपनीची २३१ कोटी ५२ लाख रूपयांची थकबाकी वीज ग्राहकांकडे आहे.

काय होऊ शकते हल्लेखोरांवर कारवाई?जर वीज कर्मचाऱ्यावर वीजपुरवठा खंडित केल्याप्रकरणी हल्ला करण्यात आल्यास संबंधित ग्राहकांवर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो.

हल्लेखोरांवर काय कारवाई करण्यात आली आहे.वीज कनेक्शन तोडल्यामुळे कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी संबंधित ग्राहकांच्या विरोधात पोलिस कारवाई करण्यात आली आहे.

हल्ल्याचे मुख्य कारण काय?

  • वीज का तोडली : वीज कर्मचाऱ्यांवरील सर्वाधिक हल्ले हे वीज तोडल्यामुळे होते. वारंवार सूचना देऊनही वीज बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते.
  • वारंवार वीज जाणे: उन्हाळ्याच्या ३ दिवसांमध्ये वारंवार वीज जाण्याच्या तक्रारी वाढतात. त्यामुळे यातून होणाऱ्या ग्राहकांमध्ये मनस्ताप वाढून कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याच्या घटना घडतात.
  • वाढीव वीज बिल : महावितरणकडून अनेक वेळा फॉल्टी मीटरमुळे वाढीव वीज बिल देण्यात येत असल्याच्या तक्रारी ग्राहकांच्या असतात. यातूनही अनेकवेळा रोष व्यक्त केला जातो.

"ज्या वीज ग्राहकांकडे बिल थकीत आहे, अशांकडून बिल वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी देखील वीज तोडणीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी वीज बिल भरून सहकार्य करावे."- दीपक देवहाते, अधीक्षक अभियंता 

टॅग्स :electricityवीजAmravatiअमरावती