शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

वीज कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे पडेल महागात; जावे लागेल तुरुंगात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 13:28 IST

Amravati : जिल्ह्यातील ३ हजार ग्राहकांची वीज कापली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महावितरण कार्यालयाने थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांनी वीज बिल भरलेले नाही, अशांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वेळा वीज तोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ग्राहकांकडून हल्ला केल्याच्या घटना घडतात. मागील दोन महिन्यांत जिल्ह्यात अशा चार घटना घडल्या असून, दोघांविरुद्ध एफआयआर करण्यात आल्याची माहिती महावितरण कार्यालयाने दिली.

महावितरणने थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. फेब्रुवारीच्या २० दिवसांत बिल भरण्यास सहकार्य न करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील ३ हजार ८८ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. एकूण थकबाकी आणि पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय या ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार नाही. आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटच्या कालावधीत वसुलीचे महावितरणन कंपनीसमोर आहे. वाढत्या थकबाकीमुळे महावितरण कंपनीला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

दोन महिन्यांत महावितरणच्या ४ कर्मचाऱ्यांवर हल्लेजिल्ह्यात मागील दोन महिन्यांमध्ये वीज बिलाच्या वसुलीदरम्यान चार ते पाच कर्मचाऱ्यांवर ग्राहकांनी, तसेच नातेवाइकांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. यासंदर्भात काहींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात महावितरणची थकबाकी कितीजानेवारी अखेर जिल्ह्यातील कृषी ग्राहक, पाणीपुरवठा व पथदिव्यांचे ग्राहक वगळून परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे ११० कोटी ७५ लाखांचा समावेश आहे. यामध्ये फेब्रुवारी महिन्यात ३८ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहे.

परिमंडळात २३१ कोटीची थकबाकीअमरावती परिमंडळा अंतर्गत अमरावती व यवतमाळ असे दोन जिल्हे येतात. या दोन्ही जिल्ह्यात महावितरण कंपनीची २३१ कोटी ५२ लाख रूपयांची थकबाकी वीज ग्राहकांकडे आहे.

काय होऊ शकते हल्लेखोरांवर कारवाई?जर वीज कर्मचाऱ्यावर वीजपुरवठा खंडित केल्याप्रकरणी हल्ला करण्यात आल्यास संबंधित ग्राहकांवर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो.

हल्लेखोरांवर काय कारवाई करण्यात आली आहे.वीज कनेक्शन तोडल्यामुळे कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी संबंधित ग्राहकांच्या विरोधात पोलिस कारवाई करण्यात आली आहे.

हल्ल्याचे मुख्य कारण काय?

  • वीज का तोडली : वीज कर्मचाऱ्यांवरील सर्वाधिक हल्ले हे वीज तोडल्यामुळे होते. वारंवार सूचना देऊनही वीज बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते.
  • वारंवार वीज जाणे: उन्हाळ्याच्या ३ दिवसांमध्ये वारंवार वीज जाण्याच्या तक्रारी वाढतात. त्यामुळे यातून होणाऱ्या ग्राहकांमध्ये मनस्ताप वाढून कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याच्या घटना घडतात.
  • वाढीव वीज बिल : महावितरणकडून अनेक वेळा फॉल्टी मीटरमुळे वाढीव वीज बिल देण्यात येत असल्याच्या तक्रारी ग्राहकांच्या असतात. यातूनही अनेकवेळा रोष व्यक्त केला जातो.

"ज्या वीज ग्राहकांकडे बिल थकीत आहे, अशांकडून बिल वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी देखील वीज तोडणीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी वीज बिल भरून सहकार्य करावे."- दीपक देवहाते, अधीक्षक अभियंता 

टॅग्स :electricityवीजAmravatiअमरावती