शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे पडेल महागात; जावे लागेल तुरुंगात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 13:28 IST

Amravati : जिल्ह्यातील ३ हजार ग्राहकांची वीज कापली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महावितरण कार्यालयाने थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांनी वीज बिल भरलेले नाही, अशांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वेळा वीज तोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ग्राहकांकडून हल्ला केल्याच्या घटना घडतात. मागील दोन महिन्यांत जिल्ह्यात अशा चार घटना घडल्या असून, दोघांविरुद्ध एफआयआर करण्यात आल्याची माहिती महावितरण कार्यालयाने दिली.

महावितरणने थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. फेब्रुवारीच्या २० दिवसांत बिल भरण्यास सहकार्य न करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील ३ हजार ८८ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. एकूण थकबाकी आणि पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय या ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार नाही. आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटच्या कालावधीत वसुलीचे महावितरणन कंपनीसमोर आहे. वाढत्या थकबाकीमुळे महावितरण कंपनीला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

दोन महिन्यांत महावितरणच्या ४ कर्मचाऱ्यांवर हल्लेजिल्ह्यात मागील दोन महिन्यांमध्ये वीज बिलाच्या वसुलीदरम्यान चार ते पाच कर्मचाऱ्यांवर ग्राहकांनी, तसेच नातेवाइकांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. यासंदर्भात काहींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात महावितरणची थकबाकी कितीजानेवारी अखेर जिल्ह्यातील कृषी ग्राहक, पाणीपुरवठा व पथदिव्यांचे ग्राहक वगळून परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे ११० कोटी ७५ लाखांचा समावेश आहे. यामध्ये फेब्रुवारी महिन्यात ३८ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहे.

परिमंडळात २३१ कोटीची थकबाकीअमरावती परिमंडळा अंतर्गत अमरावती व यवतमाळ असे दोन जिल्हे येतात. या दोन्ही जिल्ह्यात महावितरण कंपनीची २३१ कोटी ५२ लाख रूपयांची थकबाकी वीज ग्राहकांकडे आहे.

काय होऊ शकते हल्लेखोरांवर कारवाई?जर वीज कर्मचाऱ्यावर वीजपुरवठा खंडित केल्याप्रकरणी हल्ला करण्यात आल्यास संबंधित ग्राहकांवर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो.

हल्लेखोरांवर काय कारवाई करण्यात आली आहे.वीज कनेक्शन तोडल्यामुळे कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी संबंधित ग्राहकांच्या विरोधात पोलिस कारवाई करण्यात आली आहे.

हल्ल्याचे मुख्य कारण काय?

  • वीज का तोडली : वीज कर्मचाऱ्यांवरील सर्वाधिक हल्ले हे वीज तोडल्यामुळे होते. वारंवार सूचना देऊनही वीज बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते.
  • वारंवार वीज जाणे: उन्हाळ्याच्या ३ दिवसांमध्ये वारंवार वीज जाण्याच्या तक्रारी वाढतात. त्यामुळे यातून होणाऱ्या ग्राहकांमध्ये मनस्ताप वाढून कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याच्या घटना घडतात.
  • वाढीव वीज बिल : महावितरणकडून अनेक वेळा फॉल्टी मीटरमुळे वाढीव वीज बिल देण्यात येत असल्याच्या तक्रारी ग्राहकांच्या असतात. यातूनही अनेकवेळा रोष व्यक्त केला जातो.

"ज्या वीज ग्राहकांकडे बिल थकीत आहे, अशांकडून बिल वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी देखील वीज तोडणीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी वीज बिल भरून सहकार्य करावे."- दीपक देवहाते, अधीक्षक अभियंता 

टॅग्स :electricityवीजAmravatiअमरावती